शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
3
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
4
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
6
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
7
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
8
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
9
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
10
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
11
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
12
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
13
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
14
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
15
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
16
कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
17
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
19
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
20
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

पक्षाच्या ए. बी. फॉर्ममुळे उमेदवार तळ्यात-मळ्यात

By admin | Updated: November 2, 2016 23:09 IST

सर्वच पक्षांनी अपक्षांना दिली संधी : वडूजचं राजकारण घडतंय-बिघडतंय, नगरसेवक होण्यासाठी कायपण

वडूज : नगरपंचायतीच्या पहिल्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले असून यामध्ये भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. समोरासमोर लढतीत बहुतांशी प्रभागात सहा पेक्षा अधिक अर्ज दाखल आहेत. प्रत्येक उमेदवाराला आपणच नगरसेवक व्हावे, अशी प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्यामुळे पक्षाची उमेदवारी मिळाली तरी ठिक अन्यथा अपक्ष म्हणून फडात राहणारच, अशी उर्मी मनात ठेवून प्रत्येक उमेदवार प्रचारात दंग आहेत. त्यामुळे नेत्यांवरील निष्ठा, पक्षनिष्ठा, राजकारणातील तत्त्वांना बगलफाटा देत प्रत्येकाने सोईचे राजकारण केले आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षातर्फेअनेक अपक्षांना ही ए. बी. फॉर्म दिल्यामुळे अनेक उमेदवारांनी आपले पक्ष बदलून अपक्ष ही अर्ज ठेवले आहेत. या अचानक झालेल्या घडामोडींमुळे व पक्षाच्या ए. बी. फॉर्ममुळे उमेदवार सध्यातरी तळ्यात मळ्यात आहेत. काही ठिकाणी कोणताच पक्ष नको अशा स्वरूपाच्या नाट्यमय घडामोडी झाल्याने काहींचे अर्ज अपक्ष म्हणूनच दाखल झाले आहेत. तर नेत्यांच्या अचानक झालेल्या पक्ष प्रवेशामुळे ऐनवेळी पक्ष बदल ही झाले आहेत. काही प्रभागांत पक्षापेक्षा ज्येष्ठ नेत्यांच्या व्यक्तीनिष्ठ राजकारणाला प्राधान्य दिल्याने अपक्ष अर्ज ठेवणेच हिताचे अशा पद्धतीचे राजकारण सध्या वडूज नगरीत पाहावयास मिळत आहे. अपक्षांना पक्षाचे ए. बी. फॉर्म देऊन काही पक्षांनी स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला असल्यासारखी परिस्थिती झाली आहे. एकाच प्रभागात दोन उमेदवारांना पक्षाचे ए. बी. फॉर्र्म दिल्याने आता अर्ज कोणाचा काढायचा यासाठी ‘डोक्याला हात लावून’ बसलेली नेतेमंडळी पाहावयास मिळत आहेत. तर काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून ऐनवेळी भाजपची उमेदवारी घेण्यात धन्यता मानणारे उमेदवार ही मतदार संघात चाचपणी करताना आढळत आहेत. काही ठिकाणी काँग्रेसची उमेदवारी निश्चित असताना अचानक राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने अर्ज दाखल झाल्याने काँग्रेसच्या नेतेमंडळींची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वत: नेत्यांनाच रिंगणात उतरावे लागणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सेवानिवृत्त होईपर्यंत भाजप पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्यांनीही ऐनवेळी राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारी केल्याने सर्वच पक्षांची खिचडी झाली आहे. या सर्व प्रकारामुळे वडूजचे राजकारण घडतंय-बिघडतंय असेच म्हणावे लागेल. पहिला ‘नगरसेवक ’ होण्यासाठी अतिउत्साही उमेदवारांची पक्षाच्या अंतर्गत खेळीमुळे फार मोठी राजकीय गोची झाली आहे. हे सर्व प्रकार मतदारराजा नजरेत साठवत असून, अशा उमेदवारांना राजकीय प्रसंगी राजकीय गुदगुल्याही करत आहेत. रणांगणात उतरलेल्या उमेदवारांची आता माघार नाही, याच ब्रीद वाक्याला सामोरे जात राजकीय लढाई लढणे क्रमप्राप्त आहे. उमेदवारांची महाभातातील ‘अभिमन्यू’ सारखी अवस्था झाल्याने हार नाही तर जीत हीच मानसिकता झाली आहे. पक्षाच्या तिकिटावर की अपक्ष उमेदवारी या मन:स्थितीत ‘हसावे की रडावे’ अशी अवस्था काही उमेदवारांची झाली आहे. एकूण काम नगरपंचायतीचा पहिला नगरसेवक होण्याचा मान मिळविण्यासाठी राजकारणात ‘कायपण’ असे म्हणून स्वत:चीच समजूत काढत उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत. (प्रतिनिधी)