शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मलकापुरात राजरोसपणे रस्त्यावरच पार्किंग !

By admin | Updated: September 6, 2015 20:34 IST

उपमार्ग ‘हायजॅक’ : पोलिसांचे दुर्लक्ष; ढेबेवाडी रस्त्यावर वाहनांच्या रांगा

मलकापूर : मलकापुरात इंच-इंच जागेला सोन्याचा भाव असल्यामुळे दिवसेंदिवस पार्किंग समस्या रौद्ररूप धारण करीत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांसह उपमार्ग व ढेबेवाडी रस्ता वाहनानी ‘हायजॅक’ केला आहे. उपमार्ग व ढेबेवाडी रस्त्यावर दिवसभर लांबचलांब वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. पोलीसही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. कऱ्हाड जवळील मलकापूर शहरात मूळ गावठाणासह ६५ कॉलन्यांचा ९ चौरस किलोमीटर परिसरात विस्तार वाढला आहे. महामार्ग व कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गाच्या दुतर्फा सुमारे दोन हजार व्यावसायिकांनी लहान-मोठे व्यवसाय थाटले आहेत. याशिवाय अपार्टमेंट आणि हजारो इमारती उभ्या राहिल्या आहेत. दिवसेंदिवस बांधकामांची संख्या वाढतच आहे. त्याचबरोबर शहरातील वाहनांची संख्याही वाढत आहे. ही वाढलेली वाहने उभी करण्यासाठी पार्किंगची सुविधा मात्र अपुरी पडत आहे. मलकापुरात दिवसेंदिवस पार्किंग समस्या गंभीर बनत असून, पार्किंग झोन निर्माण करण्याची गरज आहे. तशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. (प्रतिनिधी)रस्त्यावर गाडी घरात पाय... मलकापुरातील अंतर्गत रस्त्यांची रुंदी अगोदरच कमी आहे. बांधकाम करताना नाल्यापर्यंतच्या जागेचा वापर करण्यात आला आहे. भाडेकरूंसह मालकांच्या गाड्या रस्त्यावरच पार्क करून थेट घरातच पाय टाकला जातो. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या गैरसोयीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. पोलीसदादा मेहरबान शिवछावा चौक ते कोल्हपूर नाका परिसरात उपमार्गावर कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे कर्मचारी नेहमीच गस्त घालत असतात. काही वेळेला क्रेनच्या साह्याने उड्डाणपुलाखालील वाहनांवर कारवाईही करण्यात येते. शिवछावा चौकात उभे राहून दुचाकींवर कारवाई करण्याची नित्याचीच बाब आहे. मात्र केवळ २५ फुटांवरील कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकीच्या रांगेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे उपमार्गाकडेच्या व धनदांडग्यांच्या वाहनांवर पोलीस मेहरबान असल्याचे चित्र आहे.सुविधा असतानाही रस्त्यावर पार्किंगअनेक संस्थांच्या कॅम्पसमध्ये पार्किंगची स्वतंत्र सुविधा करण्यात आलेली आहे. त्या-त्या संस्थेत काम करणारे अनेक कर्मचारी शॉर्टकट रस्त्याचा वापर करण्यासाठी दुचाकीच्या रांगा दिवस दिवसभर रस्त्यावरच लावून आपली ड्यूटी बजावतात. रस्त्यावरील वाहतुकीच्या अडचणीकडे मात्र ते दुर्लक्ष करतात. सोय असूनही इतरांची गैरसोय करण्यातच ते धन्यता मानतात. एका घरात चार-चार गाड्या...सध्या नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा बदलत असल्याचे चित्र आहे. घरात व्यक्ती किती त्यापेक्षा घरात गाड्या किती यावर प्रतिष्ठा समजण्याची प्रथाच पडली आहे. त्यामुळे सध्या एका घरात चार-चार वाहने उभी असतात. ही वाहने उभी करण्यासाठी अनेक ठिकाणी पार्किंगची सुविधाही नसते.