शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

पालक ऊसतोडीला जाताच मुले दौंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:14 IST

कºहाड : ऊसतोड मजुरांची तीन अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता झाली. त्यांच्या आर्इंनी आक्रोश केला. बापानी पोलीस स्टेशन गाठलं. अपहरणाचा ...

कºहाड : ऊसतोड मजुरांची तीन अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता झाली. त्यांच्या आर्इंनी आक्रोश केला. बापानी पोलीस स्टेशन गाठलं. अपहरणाचा गुन्हाही दाखल केला. आणि पोलिसांच्या तपासात ती तीन्ही मुलं त्यांच्याच एका नातेवाईकांकडे दौंडमध्ये आढळली. कºहाड शहर पोलिसांनी तातडीने तपास केल्यामुळे मुलांचा शोध लागला. आणि पालकांचा जिव भांड्यात पडला.जालना जिल्ह्णातील मानेपुरी गावातील काही ऊसतोड मजूर कºहाड तालुक्यातील केसे गावात मजुरीसाठी आले आहेत. गावातील नविन गावठाणात भैरवनाथ मंदिराजवळ झोपड्यांमध्ये या कुटूंबांचे वास्तव्य आहे. संबंधित कुटूंबांतील पुरूष आणि महिला दररोज सकाळी ऊसतोडीसाठी जातात. रात्री उशिरा ते झोपडीकडे परत येतात. दिवसभर झोपडीत त्यांची मुलेच असतात. अशातच २९ जानेवारी कुटूंबातील दशरथ रोहिदास पवार (वय १४), बारीक अशोक ठाकरे (८) व गोरख बबन बर्डे (१६) ही मुले अचानक बेपत्ता झाली. संबंधित मुलांच्या आर्इंनी आक्रोश सुरू केला. मजुरांसह आसपासच्या ग्रामस्थांनी गावात तसेच आसपासच्या परिसरात मुलांचा शोध घेतला. काही नातेवाईकांनाही फोनवरून संपर्क केला. मात्र, मुले सापडली नाहीत. ३१ जानेवारी रोजी रोहिदास अंबादास पवार (वय ४०) यांनी कºहाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला.पोलीस उपनिरीक्षक भारत चंदनशिव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. बेपत्ता असलेल्या मुलांपैकी गोरख बर्डे या मुलाकडे मोबाईल होता. मात्र, तो बंद लागत होता. पोलिसांनी अधिक तपास केला असता मुले दौंडमध्ये असल्याचे समोर आले. पोलीस पथक तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यावेळी गोरख बर्डे या मुलाचा भाऊ दौंडमध्ये राहत असल्याचे व संबंधित तीन्ही मुले त्याच्याकडे गेली असल्याचे समोर आले. तिघांना ताब्यात घेऊन कºहाड शहर पोलीस ठाण्यात आणले. रविवारी सकाळी संबंधित मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.साठवलेल्या पैशातून केला प्रवासदशरथ, बारीक आणि गोरख या तिन्ही मुलांकडे साठवलेले थोडे थोडे पैसे होते. तसेच गोरखकडे मोबाईल होता. साठवलेले पैसे या तिघांनी एकत्र करून दौंडला जायचा बेत आखला. घरात सांगीतलं तर जाऊ देणार नाहीत, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे घरात कोणाला काहीही न सांगता ते एसटीने दांैडला गेल्याचे तपासातून समोर आल्याचे उपनिरीक्षक भारत चंदनशिव यांनी सांगीतले.