शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

पाणीदार गावांनी मार्गदर्शकांची भूमिका बजवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:35 IST

सातारा : दरवेळी कोणीतरी येईल आणि मदत करेल, या आशेवर राहण्यापेक्षा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांतील ग्रामस्थांनी स्वत:च ...

सातारा : दरवेळी कोणीतरी येईल आणि मदत करेल, या आशेवर राहण्यापेक्षा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांतील ग्रामस्थांनी स्वत:च हातात कुदळ घेऊन जलसंधारणाचे काम सुरू केले. त्यामुळे दरवर्षी जानेवारी महिन्यात टॅँकरची मागणी करणारी गावं आता पाणीदार तर झाली आहेत. या गावांनी आता एवढ्यावरच न थांबता इतर गावांना मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी व्यक्त केली.

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यातील वेळू, न्हावी बुद्रुक व खटाव तालुक्यातील वरूड या पाणीदार झालेल्या गावांचा दौरा जिल्हाधिकाऱ्यांनी केला. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी स्मिता पाटील, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, पाणी फाऊंडेशनचे मार्गदर्शक अविनाश पोळ, प्रदेश समन्वयक आबा लाड उपस्थित होते. वेळू गावामध्ये ग्रामस्थांनी लोकसहभागातून राबविलेला तलाव जोड प्रकल्प, अटल आनंद घनवन योजनेची वृक्षारोपण, न्हावी बुद्रुक येथील मियावाकी जंगल, वरूड येथील जलसंधारणाची कामे व पीक पद्धतीची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. विनय गौड यांनी वेळू येथील बोअरवेलचा हातपंप मारला असता एक हात पंपामध्ये पाणी येत आहे. हे पाहून आश्चर्य व्यक्त केले.

यावेळी अविनाश पोळ व आबा लाड यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या समृद्ध गाव योजनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी पाऊस पडेल, तेव्हा पाणी साठवून ठेवण्यासाठी यंत्रणा तयार ठेवणे गरजेचे आहे. या जाणिवेतून चर खणणे, शेततळी, तलाव जोडणे, विहिरी असे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्याचे परिणाम ग्रामस्थांना प्रत्यक्ष भूजल पातळीत झालेल्या पाण्याच्या वाढीतून, विहिरींमध्ये दिसणाऱ्या पाण्याच्या पातळीवरून दिसू लागले आहेत. आगामी काळात कमी पाण्यावर जास्त उत्पन्न वाढवणारी पिके घेणे, परिसरातील जंगलाचे क्षेत्र वाढीसाठी वृक्षारोपण, सकस चारा उपलब्ध होण्यासाठी दर्जेदार गवतांची लागवड आदी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. तसेच उत्पादन केलेल्या माल बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करण्यात येणार आहे, असे सांगितले.

यावेळी पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक राहुल भाेसले, दयानंद निकम, जितेंद्र शिंदे, अजित जगदाळे, यशदाचे मास्टर ट्रेनर स्वप्नील शिंदे, मंडल कृषी अधिकारी सुजित शिंदे, पाणीपुरवठा विभागाचे पांढरे, यांत्रिक विभागाचे संग्राम पाटील, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.