शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
3
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
4
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
5
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
6
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
7
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
8
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
9
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
10
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
11
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
12
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
13
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
14
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
15
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!
16
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
17
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
18
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
19
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
20
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

पाणीदार गावांनी मार्गदर्शकांची भूमिका बजवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:35 IST

सातारा : दरवेळी कोणीतरी येईल आणि मदत करेल, या आशेवर राहण्यापेक्षा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांतील ग्रामस्थांनी स्वत:च ...

सातारा : दरवेळी कोणीतरी येईल आणि मदत करेल, या आशेवर राहण्यापेक्षा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांतील ग्रामस्थांनी स्वत:च हातात कुदळ घेऊन जलसंधारणाचे काम सुरू केले. त्यामुळे दरवर्षी जानेवारी महिन्यात टॅँकरची मागणी करणारी गावं आता पाणीदार तर झाली आहेत. या गावांनी आता एवढ्यावरच न थांबता इतर गावांना मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी व्यक्त केली.

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यातील वेळू, न्हावी बुद्रुक व खटाव तालुक्यातील वरूड या पाणीदार झालेल्या गावांचा दौरा जिल्हाधिकाऱ्यांनी केला. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी स्मिता पाटील, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, पाणी फाऊंडेशनचे मार्गदर्शक अविनाश पोळ, प्रदेश समन्वयक आबा लाड उपस्थित होते. वेळू गावामध्ये ग्रामस्थांनी लोकसहभागातून राबविलेला तलाव जोड प्रकल्प, अटल आनंद घनवन योजनेची वृक्षारोपण, न्हावी बुद्रुक येथील मियावाकी जंगल, वरूड येथील जलसंधारणाची कामे व पीक पद्धतीची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. विनय गौड यांनी वेळू येथील बोअरवेलचा हातपंप मारला असता एक हात पंपामध्ये पाणी येत आहे. हे पाहून आश्चर्य व्यक्त केले.

यावेळी अविनाश पोळ व आबा लाड यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या समृद्ध गाव योजनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी पाऊस पडेल, तेव्हा पाणी साठवून ठेवण्यासाठी यंत्रणा तयार ठेवणे गरजेचे आहे. या जाणिवेतून चर खणणे, शेततळी, तलाव जोडणे, विहिरी असे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्याचे परिणाम ग्रामस्थांना प्रत्यक्ष भूजल पातळीत झालेल्या पाण्याच्या वाढीतून, विहिरींमध्ये दिसणाऱ्या पाण्याच्या पातळीवरून दिसू लागले आहेत. आगामी काळात कमी पाण्यावर जास्त उत्पन्न वाढवणारी पिके घेणे, परिसरातील जंगलाचे क्षेत्र वाढीसाठी वृक्षारोपण, सकस चारा उपलब्ध होण्यासाठी दर्जेदार गवतांची लागवड आदी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. तसेच उत्पादन केलेल्या माल बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करण्यात येणार आहे, असे सांगितले.

यावेळी पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक राहुल भाेसले, दयानंद निकम, जितेंद्र शिंदे, अजित जगदाळे, यशदाचे मास्टर ट्रेनर स्वप्नील शिंदे, मंडल कृषी अधिकारी सुजित शिंदे, पाणीपुरवठा विभागाचे पांढरे, यांत्रिक विभागाचे संग्राम पाटील, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.