शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीदार गावांनी मार्गदर्शकांची भूमिका बजवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:35 IST

सातारा : दरवेळी कोणीतरी येईल आणि मदत करेल, या आशेवर राहण्यापेक्षा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांतील ग्रामस्थांनी स्वत:च ...

सातारा : दरवेळी कोणीतरी येईल आणि मदत करेल, या आशेवर राहण्यापेक्षा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांतील ग्रामस्थांनी स्वत:च हातात कुदळ घेऊन जलसंधारणाचे काम सुरू केले. त्यामुळे दरवर्षी जानेवारी महिन्यात टॅँकरची मागणी करणारी गावं आता पाणीदार तर झाली आहेत. या गावांनी आता एवढ्यावरच न थांबता इतर गावांना मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी व्यक्त केली.

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यातील वेळू, न्हावी बुद्रुक व खटाव तालुक्यातील वरूड या पाणीदार झालेल्या गावांचा दौरा जिल्हाधिकाऱ्यांनी केला. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी स्मिता पाटील, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, पाणी फाऊंडेशनचे मार्गदर्शक अविनाश पोळ, प्रदेश समन्वयक आबा लाड उपस्थित होते. वेळू गावामध्ये ग्रामस्थांनी लोकसहभागातून राबविलेला तलाव जोड प्रकल्प, अटल आनंद घनवन योजनेची वृक्षारोपण, न्हावी बुद्रुक येथील मियावाकी जंगल, वरूड येथील जलसंधारणाची कामे व पीक पद्धतीची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. विनय गौड यांनी वेळू येथील बोअरवेलचा हातपंप मारला असता एक हात पंपामध्ये पाणी येत आहे. हे पाहून आश्चर्य व्यक्त केले.

यावेळी अविनाश पोळ व आबा लाड यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या समृद्ध गाव योजनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी पाऊस पडेल, तेव्हा पाणी साठवून ठेवण्यासाठी यंत्रणा तयार ठेवणे गरजेचे आहे. या जाणिवेतून चर खणणे, शेततळी, तलाव जोडणे, विहिरी असे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्याचे परिणाम ग्रामस्थांना प्रत्यक्ष भूजल पातळीत झालेल्या पाण्याच्या वाढीतून, विहिरींमध्ये दिसणाऱ्या पाण्याच्या पातळीवरून दिसू लागले आहेत. आगामी काळात कमी पाण्यावर जास्त उत्पन्न वाढवणारी पिके घेणे, परिसरातील जंगलाचे क्षेत्र वाढीसाठी वृक्षारोपण, सकस चारा उपलब्ध होण्यासाठी दर्जेदार गवतांची लागवड आदी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. तसेच उत्पादन केलेल्या माल बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करण्यात येणार आहे, असे सांगितले.

यावेळी पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक राहुल भाेसले, दयानंद निकम, जितेंद्र शिंदे, अजित जगदाळे, यशदाचे मास्टर ट्रेनर स्वप्नील शिंदे, मंडल कृषी अधिकारी सुजित शिंदे, पाणीपुरवठा विभागाचे पांढरे, यांत्रिक विभागाचे संग्राम पाटील, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.