शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

पाणीदार गावांनी मार्गदर्शकांची भूमिका बजवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:35 IST

सातारा : दरवेळी कोणीतरी येईल आणि मदत करेल, या आशेवर राहण्यापेक्षा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांतील ग्रामस्थांनी स्वत:च ...

सातारा : दरवेळी कोणीतरी येईल आणि मदत करेल, या आशेवर राहण्यापेक्षा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांतील ग्रामस्थांनी स्वत:च हातात कुदळ घेऊन जलसंधारणाचे काम सुरू केले. त्यामुळे दरवर्षी जानेवारी महिन्यात टॅँकरची मागणी करणारी गावं आता पाणीदार तर झाली आहेत. या गावांनी आता एवढ्यावरच न थांबता इतर गावांना मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी व्यक्त केली.

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यातील वेळू, न्हावी बुद्रुक व खटाव तालुक्यातील वरूड या पाणीदार झालेल्या गावांचा दौरा जिल्हाधिकाऱ्यांनी केला. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी स्मिता पाटील, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, पाणी फाऊंडेशनचे मार्गदर्शक अविनाश पोळ, प्रदेश समन्वयक आबा लाड उपस्थित होते. वेळू गावामध्ये ग्रामस्थांनी लोकसहभागातून राबविलेला तलाव जोड प्रकल्प, अटल आनंद घनवन योजनेची वृक्षारोपण, न्हावी बुद्रुक येथील मियावाकी जंगल, वरूड येथील जलसंधारणाची कामे व पीक पद्धतीची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. विनय गौड यांनी वेळू येथील बोअरवेलचा हातपंप मारला असता एक हात पंपामध्ये पाणी येत आहे. हे पाहून आश्चर्य व्यक्त केले.

यावेळी अविनाश पोळ व आबा लाड यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या समृद्ध गाव योजनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी पाऊस पडेल, तेव्हा पाणी साठवून ठेवण्यासाठी यंत्रणा तयार ठेवणे गरजेचे आहे. या जाणिवेतून चर खणणे, शेततळी, तलाव जोडणे, विहिरी असे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्याचे परिणाम ग्रामस्थांना प्रत्यक्ष भूजल पातळीत झालेल्या पाण्याच्या वाढीतून, विहिरींमध्ये दिसणाऱ्या पाण्याच्या पातळीवरून दिसू लागले आहेत. आगामी काळात कमी पाण्यावर जास्त उत्पन्न वाढवणारी पिके घेणे, परिसरातील जंगलाचे क्षेत्र वाढीसाठी वृक्षारोपण, सकस चारा उपलब्ध होण्यासाठी दर्जेदार गवतांची लागवड आदी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. तसेच उत्पादन केलेल्या माल बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करण्यात येणार आहे, असे सांगितले.

यावेळी पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक राहुल भाेसले, दयानंद निकम, जितेंद्र शिंदे, अजित जगदाळे, यशदाचे मास्टर ट्रेनर स्वप्नील शिंदे, मंडल कृषी अधिकारी सुजित शिंदे, पाणीपुरवठा विभागाचे पांढरे, यांत्रिक विभागाचे संग्राम पाटील, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.