शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

पाचवडमध्ये जातपंचायतीला मूठमाती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 00:48 IST

यापुढे पोलिसांत मागणार दाद : गोपाळ समाजाचा परिवर्तनाचा निर्णय

राहुल तांबोळी - भुर्इंज ‘यापुढे जातपंचायतीत नव्हे तर थेट पोलीस ठाण्यातच दाद मागायची,’ असा महत्त्वपूर्ण निर्णय पाचवड येथील गोपाळ समाज बांधवांनी शनिवारी एकमताने घेऊन ‘जातपंचायतीला मूठमाती’ देण्याचा निर्धार केला. पाचवड येथे शनिवारी झालेल्या गोपाळ समाजाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सामाजिक सुधारणेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. दरम्यान, गुरुवारी ज्या ठिकाणी हा अघोरी प्रकार घडला, त्याच जागेत परिवर्तनाचा निर्णय घेतला. पाचवड येथील गोपाळ समाजातील जातपंचायतीत बाप-लेकीला सुनावण्यात आलेल्या शिक्षेनंतर पोलिसांनी १२ तासांनंतर गुन्हा दाखल करून संबंधितांना अटक केली. या घटनेवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच विविध संघटनांनी आवाज उठवून जातपंचायतीची अनिष्ट प्रथा बंद करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर कोणी सांगण्यापूर्वीच या वस्तीतील बांधवांनी एकत्र येऊन यापुढे काही घडले तर जातपंचायतीत नाही तर पोलीस ठाण्यात दाद मागणार असल्याचे सांगितले. पाचवडच्या गोपाळ समाजात शनिवारीही भीतीचे वातावरण होते. या वस्तीतील पुरुष बँड पथकात वाजविण्याचे काम करून आपले पोट भरतात. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने अनेकजण बँड वाजविण्यासाठी बाहेर गेले होते; मात्र दोन दिवस झालेल्या त्रासामुळे या सर्वांनीच जातपंचायतीबाबत विचार करण्यास शुक़्रवारपासून सुरुवात केली. ज्या ठिकाणी गुरुवारी जातपंचायत भरली होती, त्याच ठिकाणी एकत्र येऊन जातपंचायतीला मूठमाती देण्याचा निर्णय घेतला. ‘भाऊ लई तरास झाला बघ, पोलिसांनी माणसं धरून नेल्याती. वाजवाय गेल्याशिवाय पोटाला मिळत नाय. जे पहिल्यापासून चालत आलं होतं तेच आजपतुर पुढं चालत होतं. हे चुकीचं हाय असं कुणीबी सांगाय कधी आलं नाय; पण आता हे चुकीचं असल्याचं समजू लागलंय. यापुढं असलं काय आमच्या इथं होणार नाय. जे काय असंल ते पोलिसांकडं दाद मागू; पण जातपंचायतीकडं कधीच जाणार नाय बघा,’ अशीच प्रतिक्रिया यावेळी गोपाळ बांधवांनी दिली. यावेळी सोना पवार, वसंत जाधव, संजय जाधव, गणेश पवार, प्रकाश पवार, अरुण जाधव, सागर पवार, दिलीप पवार, सचिन जाधव, सायबू जाधव, दत्तू जाधव, संतोष चव्हाण, आदी उपस्थित होते. यावेळी वस्तीत अनेक महिलांही होत्या; मात्र त्या झोपडीतून बाहेर आल्या नाहीत. झालेला निर्णय या सर्वांनी जेंव्हा महिलांना सांगितला तेव्हा त्यांनीही ‘यापुढं असलं काय नकोच,’ असे सांगून या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला. (प्रतिनिधी)