शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

पाचवडमध्ये जातपंचायतीला मूठमाती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 00:48 IST

यापुढे पोलिसांत मागणार दाद : गोपाळ समाजाचा परिवर्तनाचा निर्णय

राहुल तांबोळी - भुर्इंज ‘यापुढे जातपंचायतीत नव्हे तर थेट पोलीस ठाण्यातच दाद मागायची,’ असा महत्त्वपूर्ण निर्णय पाचवड येथील गोपाळ समाज बांधवांनी शनिवारी एकमताने घेऊन ‘जातपंचायतीला मूठमाती’ देण्याचा निर्धार केला. पाचवड येथे शनिवारी झालेल्या गोपाळ समाजाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सामाजिक सुधारणेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. दरम्यान, गुरुवारी ज्या ठिकाणी हा अघोरी प्रकार घडला, त्याच जागेत परिवर्तनाचा निर्णय घेतला. पाचवड येथील गोपाळ समाजातील जातपंचायतीत बाप-लेकीला सुनावण्यात आलेल्या शिक्षेनंतर पोलिसांनी १२ तासांनंतर गुन्हा दाखल करून संबंधितांना अटक केली. या घटनेवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच विविध संघटनांनी आवाज उठवून जातपंचायतीची अनिष्ट प्रथा बंद करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर कोणी सांगण्यापूर्वीच या वस्तीतील बांधवांनी एकत्र येऊन यापुढे काही घडले तर जातपंचायतीत नाही तर पोलीस ठाण्यात दाद मागणार असल्याचे सांगितले. पाचवडच्या गोपाळ समाजात शनिवारीही भीतीचे वातावरण होते. या वस्तीतील पुरुष बँड पथकात वाजविण्याचे काम करून आपले पोट भरतात. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने अनेकजण बँड वाजविण्यासाठी बाहेर गेले होते; मात्र दोन दिवस झालेल्या त्रासामुळे या सर्वांनीच जातपंचायतीबाबत विचार करण्यास शुक़्रवारपासून सुरुवात केली. ज्या ठिकाणी गुरुवारी जातपंचायत भरली होती, त्याच ठिकाणी एकत्र येऊन जातपंचायतीला मूठमाती देण्याचा निर्णय घेतला. ‘भाऊ लई तरास झाला बघ, पोलिसांनी माणसं धरून नेल्याती. वाजवाय गेल्याशिवाय पोटाला मिळत नाय. जे पहिल्यापासून चालत आलं होतं तेच आजपतुर पुढं चालत होतं. हे चुकीचं हाय असं कुणीबी सांगाय कधी आलं नाय; पण आता हे चुकीचं असल्याचं समजू लागलंय. यापुढं असलं काय आमच्या इथं होणार नाय. जे काय असंल ते पोलिसांकडं दाद मागू; पण जातपंचायतीकडं कधीच जाणार नाय बघा,’ अशीच प्रतिक्रिया यावेळी गोपाळ बांधवांनी दिली. यावेळी सोना पवार, वसंत जाधव, संजय जाधव, गणेश पवार, प्रकाश पवार, अरुण जाधव, सागर पवार, दिलीप पवार, सचिन जाधव, सायबू जाधव, दत्तू जाधव, संतोष चव्हाण, आदी उपस्थित होते. यावेळी वस्तीत अनेक महिलांही होत्या; मात्र त्या झोपडीतून बाहेर आल्या नाहीत. झालेला निर्णय या सर्वांनी जेंव्हा महिलांना सांगितला तेव्हा त्यांनीही ‘यापुढं असलं काय नकोच,’ असे सांगून या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला. (प्रतिनिधी)