शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

पालघर झाला, आता कऱ्हाड कधी

By admin | Updated: June 18, 2014 01:08 IST

अनेक वर्षांपासूनची मागणी : ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर कऱ्हाडकर आक्रमक

कऱ्हाड : ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर आता कऱ्हाडकरांनाही जिल्ह्याचे वेध लागले आहेत. पालघरप्रमाणेच कऱ्हाड जिल्हा व्हावा, ही दोन दशकापासुनची मागणी आता आक्रमकपणे होऊ लागली आहे. यशवंतरावांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी त्यांच्या कर्मभुमिला न्याय द्यावा आणी पालघरप्रमाणेच कऱ्हाड जिल्ह्याची घोषणा करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कऱ्हाडला कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम आहे. त्याला प्रीतीसंगत म्हणतात. असाच संगम परीसरातील काही तालुक्यांचा व्हावा आणी यशवंतरावांचे कऱ्हाड जिल्ह्याच ठिकाण व्हाव, ही सर्वसामान्य लोकांची अपेक्षा ! तसं पाहिलं तर कऱ्हाड जिल्हा होण कोणाच्याच तोट्याच नाही. उलट ते फायद्याचच आहे. नाहीतर सांगली आणी सातारा जिल्ह्यात असणाऱ्या अनेक तालुक्यांतील जनतेचा जिल्ह्याशी संबंध कमी आणी कऱ्हाडशी जास्त, अशीच स्थिती पहायला मिळते. फरक फक्त एवढाच की कऱ्हाड जिल्हा नाही. वाळवा, शिराळा, कडेगाव या सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यातील लोकांचा कऱ्हाडशी विविध कारणांनी नित्याचा संबंध आहे. पाटण, कोरेगाव, खटाव या सातारा जिल्ह्यातील लोकांचीही तीच परीस्थिती आहे. सर्व कारणांसाठी कऱ्हाड सोयीचे असेल तर मग तो जिल्हा झाल्यास सर्वांना फायद्याच आहे; पण त्यासाठी राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती महत्वाची आहे, एवढच ! गेली अनेक वर्ष पुणे आणि ठाणे जिल्ह्याचे विभाजन करावे तर कऱ्हाड स्वतंत्र जिल्हा करावा ही नागरिकांची मागणी होती. (‘लोकमत’ टीम)