शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

लोणंद येथील सोना अलॉयज देणार ऑक्सिजनरूपी संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लोणंद : महाराष्ट्रातील ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असताना ऊर्जामंत्री डॉ. नितीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणंद : महाराष्ट्रातील ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असताना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारामुळे राज्याला लवकरच दररोज किमान १५ टन प्राणवायू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी लोणंदची सोना अलॉयज या पोलाद निर्मिती करणाऱ्या कंपनीने पुढाकार घेतला आहे.

कारखान्यात रोज १० ते १५ टन ऑक्सिजन निर्मितीसाठी विजेचा जोडभार वाढवून मागितल्यानंतर अवघ्या चोवीस तासांत तो मंजूर करून त्याची अंमलबजावणी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. वर्षांनुवर्षे लोखंडासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणंद येथील सोना अलॉयजने साताऱ्यासह महाराष्ट्राला प्राणवायूची संजीवनी देण्यासाठी ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात केली आहे. काही महिने हा उद्योग अडचणीत असल्याने त्याने विजेचा जोडभार कमी केला होता. मात्र, राज्याला ऑक्सिजनची गरज असल्याने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उद्योगांना ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत 'सोना अलॉयजने त्यांच्या कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून अतिरिक्त किमान १५ टन ऑक्सिजन निर्मिती करण्याची तयारी दाखविली. यासाठी ८०० केव्हीएचा भार वाढवून मागितला होता.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या माध्यमातून हा विषय समोर येताच राऊत यांनी यास तत्काळ मंजुरी दिली. यामुळे आता दररोज दीड ते दोन हजार सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. पश्चिम महाराष्ट्राला नवसंजीवनी देण्याचे काम सोना अलायज कंपनी करणार आहे.

नवीन प्रकल्प सुरू करण्यास लागणारा कालावधी पाहता आहे त्या उद्योगाला संजीवनी दिली तर तातडीने ऑक्सिजन निर्मिती शक्य होईल. या हेतूने सोना अलायजने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या माध्यमातून गुरुवारी महावितरणचे साताऱ्याचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड व बारामतीचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, ग्राहक हा २२० केव्ही वाहिनीवर असल्याने मुंबई मुख्यालयाच्या अखत्यारित होता. या विषयाची तत्काळ दखल घेत ऑक्सिजनची निकड पाहता कंपनीला आठशे केव्हीए इतका जोडभार आहे. त्या स्थितीत मंजूर करून वीज जोडभार जोडून देण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले.

ऑक्सिजन निर्मितीला रविवार, दि. २५ पासून सुरुवात होत आहे.

ऑक्सिजनची गरज पाहता प्रकल्पाची तातडीने चाचणी घेऊन उत्पादन सुरू करत आहे, अशी माहिती कंपनीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रदीप राऊत यांनी दिली.