शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
2
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
4
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
5
संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”
6
काजू, बदाम, पिस्ता आणि शेरनी बाई...; मतदार यादी पाहून अधिकारीही झाले थक्क! हटके नावांमागे कारण काय?
7
“भाजपाची ठोकशाही सहन करणार नाही, सत्तेचा माज उतरायला वेळ लागणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
9
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
10
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
11
"घरात चाललीय मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर...", पूजाने घेतला सोहमच्या नावाचा हटके उखाणा
12
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
13
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
14
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
15
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
16
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
17
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
18
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
19
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
20
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोड वाहतुकीला आलाय जोर!

By admin | Updated: February 27, 2015 00:21 IST

रस्त्यांची लागतेय वाट : आरटीओचे दुर्लक्ष

भुर्इंज : राज्यात नवे सरकार येताच आरटीओने बंद केलेली बेकायदेश्ीर ओव्हरलोड वाहतूक पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरु झाली आहे. नव्या सरकारचा अंदाज आल्यानेच आरटीओने पुन्हा एकदा ओव्हरलोड वाहतुकीकडे विशेष कारणाने दुर्लक्ष सुरु केले की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. डंपरमधून विशेषत: गौण खनिजाची परवानगीपेक्षा दुप्पट क्षमतेने अधिक वजनाची वाहतूक आता सर्रास होत असून त्यामुळे रस्त्यांची वाट लागत आहे. मात्र विशिष्ट हेतूने या बेकायदा वाहतुकीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उपप्रादेशिक वाहतूक कार्यालयाच्या नियमानुसार ६ चाकी वाहनांना १0 टन तर १0 चाकी वाहनांना १६ टन वजनाची वाहतूक करण्याची परवानगी आहे. मात्र अधिक फायद्याच्या हेतूने सध्या ६ चाकी वाहनांमधून १८ ते २0 टन तर १0 चाकी वाहनांमधून २८ ते ३0 टन वाहतूक केली जात आहे. विशेषत: वेळे ते सातारा मार्गावर अशाप्रकारची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु असून त्यामध्ये खडी, मुरुम, डबर, वाळू अशा गौण खनिजाचा त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. अशा प्रकारे बेकायदेशीरपणे जादा क्षमतेची वाहतूक होत असल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम महामार्गावर होत असून ठिकठिकाणी रस्त्याची चाळण होत असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात सध्या महामार्गाची झालेली दुरवस्था पाहता या रस्त्याला महामार्ग का म्हणायचे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महामार्गाची अशी अवस्था झाली असल्याने अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महामार्गाच्या या अवस्थेमुळे झालेल्या अपघातातून अनेकांना आपले जीव गमवावे लागले असून अनेकांना कायमचे जायबंदी व्हावे लागले आहे. एवढी बिकट परिस्थिती असूनही महामार्गाची दुरुस्ती केवळ दिखावा म्हणून केली जात असून महामार्गाची दुरवस्था होवू नये यासाठी ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जात नाही. किंबहुना विशिष्ट हेतूनेच या ओव्हरलोड वाहतुकीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची जोरदार चर्चा आहे. ज्या ठिकाणांहून अशा प्रकारची वाहतूक सुरु होते अश ठिकाणांची माहिती कारवाईचे अधिकार ज्यांच्याकडे आहेत त्यांना माहिती असते. अशा ठिकाणी त्यांचे नियमितपणे जाणे येणे असते. नवे सरकार येताच ते बंद झाले होते आणि त्यामुळे ओव्हरलोड वाहतूकही बंद झाली होती. पण नव्या सरकारचा अंदाज आल्याने ओव्हरलोड वाहतूकीला संबंधितांनी हिरवा कंदील दाखवला की काय? असा प्रश्न पडण्याइतपत परिस्थिती दिसून येत आहे. (प्रतिनिधी)दूरगामी विचार व्हायला हवा. ओव्हरलोड वाहतुकीचे दुष्परीणाम निश्चितच मोठया प्रमाणावर आहेत. अशा प्रकारच्या वाहतुकीमुळे रस्ते निर्मिती आणि दुरुस्तीवर केला जाणारा मोठा खर्च कुचकामी ठरतो. त्यातूनच अपघातांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे कुणाचीही भीडभाड न ठेवता बेकायदेशीरपणे आणि विशिष्ठ हेतूने सुरु असणारी ओव्हरलोड वाहतून बंद केली पाहिजे. आधी अधिक क्षमतेच्या वजनाचा भार पेलणारे रस्ते तयार करा आणि खुशाल वजन क्षमतेत वाढ करा, असे मत व्यावसायिक शेखर भोसले पाटील यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.