शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

चौकी नावाला; कर्मचारी मिळेना गावाला !

By admin | Updated: July 14, 2017 23:03 IST

चौकी नावाला; कर्मचारी मिळेना गावाला !

माणिक डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : आगाशिवनगरला पोलिस चौकीचे स्थलांतर झाल्यापासून कायमच कुलपात बंद असते. मलकापूर शहारासाठी मंजूर असलेल्या पोलिस ठाण्यासाठी पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे स्वतंत्र पोलिस ठाण्याचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे चाळीस हजारांवर लोकसंख्येच्या गस्तीसाठी दोन बिटमध्ये चारच कर्मचारी गस्त घालत असून, शहराची सुरक्षितता सध्या रामभरोसे आहे. याचा परिणाम म्हणून शहरात दिवसेंदिवस गुंडगिरी व बेकायदा व्यवसायांना ऊत आला आहे. मलकापूर शहराची गेली दहा वर्षांत झपाट्याने वाढ झाली. २००८ मध्ये नगरपंचायत झाल्यापासून शहरात राहणाऱ्यांचा लोंढा वाढल्यामुळे शहराची लोकसंख्याही दुप्पट झाली आहे. ती आज ३२ हजारांवर गेली आहे. ज्या पद्धतीने शहरातील शैक्षणिक, विकासातील गुणात्मक व संख्यात्मक वाढ झाली तशीच या शहरातील पाठीमागील तुलनेत गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. दिवसेंदिवस शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडण्यात भरच पडत आहे. बेकायदेशीर व्यवसायाने आपली पाळेमुळे घट्ट करण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील अशांतता बिघडत असल्यामुळे तत्कालीन स्थानिक प्रशासनाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे शहरासाठी स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी केली. शहरात घडणाऱ्या घटना विचारात घेता शासन स्तरावरून मलकापूर शहरासाठी पोलिस चौकी मंजूर केली. नगरपंचायत कार्यालयासमोरील इमारत भाडेतत्त्वावर घेऊन या चौकीचे अधिकारी व नेत्यांच्या हस्ते थाटात प्रारंभही करण्यात आला. जेमतेम निवडणुकीचा कालावधी वगळता हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या दिवसच ही चौकी उघडली जाते. धूळ झटकून स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व १ मे रोजी येथे ध्वजारोहन करण्यात येते. उर्वरित कालावधीत या चौकीतील टेबलावरचा धुळीचा थर वाढतच गेला. शहरातील वाढती गुन्हेगारी विचारात घेता पुन्हा स्थानिक प्रशासनाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या सहकार्याने मलकापूर शहरासाठी २०१४ मध्ये स्वतंत्र पोलिस ठाणे मंजूर करून घेतले. २१ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचा व इमारतीचा आराखडाही तयार झाला. मात्र, तीन वर्षांत काहीच कार्यवाही झाली नाही. मलकापुरातील पोलिस चौकीचे आठ वर्षांनंतर सहा महिन्यांपूर्वी आगाशिवनगरात स्थलांतर करण्यात आले. आगाशिवनगरातही उद्घाटनानंतरही पोलिस चौकी सहा महिन्यांपासून कुलपातच बंद आहे. पोलिसांनी कामकाजासाठी एकदाही या चौकीचा वापर केलेला नाही. मलकापूरसह आसपासच्या गावातील सुमारे चाळीस ते पन्नास हजारांवर लोकसंख्येच्या परिसरात केवळ चार ते सहाच पोलिस कर्मचारी गस्त घालत असतात. अशा अपुऱ्या पोलिस फौजफाट्यामुळे क्राईमरेट दिवसेंदिवस वाढत आहे.