शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:35 IST

खटाव : बदलत्या हवामानामुळे कांदा रोपांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. खटाव ...

खटाव : बदलत्या हवामानामुळे कांदा रोपांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

खटाव तालुक्यात मध्यंतरी सतत पडलेले ढगाळ वातावरण तसेच सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे उन्हाळी कांदा रोपांवर करपा, टाका, व्होपा आदी रोगांच्या प्रादुर्भावामुळे रोपे पिवळी पडून वाळत चालली आहेत. पिके वाचविण्यासाठी सध्या शेतकरी बाजारात उपलब्ध विविध महागड्या औषधांची फवारणी करत आहेत.

गेल्यावर्षी बदलते हवामान व अवकाळी पावसामुळे पुरेशा प्रमाणात कांदा बियाणांचे उत्पादन झाले नव्हते. त्यामुळे कांदा बियाणांची टंचाई सुरुवातीला जाणवू लागली होती. त्यामुळे कांद्याच्या बियाणांचे दर गगनाला भिडले होते, अशाही परिस्थितीत मिळेल तेथून बी खरेदी करून शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी ढगाळ वातावरण, तर कधी अचानक सकाळी पडणारे धुके व धुक्यामुळे पडणारे दव यामुळे कांद्याच्या रोपांचे शेंडे पिवळे पडून रोपे करपा रोगाला बळी पडली आहेत. आधीच रोपाची कमतरता, त्यामुळे रोपाअभावी कांदा लागवडीची अनिश्चितता, त्यातच कांदा लागणीसाठी झालेला भांडवली खर्च वाया जाणार याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे. कांदा उत्पादक शेतकरी सध्या बदलत्या हवामानामुळे चिंतित आहे. पुन्हा एकदा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार याची धास्ती शेतकऱ्याला सतावत आहे.

चौकट..

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका...

सध्या कांद्याला बाजारात बऱ्यापैकी भाव सुरू असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कांद्यावर करपा रोगाचे आगमन शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके वाचविण्यासाठी रासायनिक खतांची मात्रा व महागडे कीटकनाशके तसेच बुरशीनाशकाची फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त झाला आहे.

(कोट)

कांदा पीक परतीच्या पावसामुळे आर्थिक फटका देऊन गेला. त्यामुळे कांद्याचा सध्याचा भाव पाहता यातून थोडीफार आर्थिक हालचाल होईल, अशी आशा होती; परंतु ऐनवेळी करपा रोगामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागणार आहे. कृषी विभागाच्या वतीने भेटी देऊन शेतकऱ्यांना उपाययोजना सुचवाव्यात.

-विलास जगदाळे, कांदा उत्पादक शेतकरी, खटाव

17खटाव

कॅप्शन : खटाव तालुक्यात हवामान बदलामुळे कांद्यावर पडलेल्या करपा रोगामुळे कांद्याची रोपे पिवळी पडली आहेत.