शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

हवामान बदलामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST

कुकुडवाड : आठवडाभरापासून धुके, ढगाळ वातावरणामुळे माण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील आठवड्यापासून कधी धुके, तर ...

कुकुडवाड : आठवडाभरापासून धुके, ढगाळ वातावरणामुळे माण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील आठवड्यापासून कधी धुके, तर कधी थंडीचा तडाखा यामुळे पडणारे दवबिंदू यामुळे कांद्याच्या लहान रोपांवर करपा रोग तसेच मर रोगांमुळे कांदा पातळ झाला आहे. कांद्याच्या पातीवर पांढरे डाग पडत आहेत. महागडी औषधे वापरूनही काही फरक पडत नाही.

मागील काही महिन्यांपासून कांद्याचा बाजार वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. कांद्याला चांगला दर मिळाला तर कर्जाचा डोंगर कमी होईल, या आशेने शेतकरी कांद्याकडे लक्ष देत आहेत; पण वातावरण साथ देत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत.

गेल्या महिन्यात वातावरण निवळत असल्याचे जाणवत होते; पण सध्या अचानक धुक्यासह ढगाळ वातावरणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. हे पाहता गतवर्षीप्रमाणे थंडी अपेक्षित असते; पण काहीच थंडी नाही. यामुळे हरबरा, ज्वारी, कांदा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकरी महागडी औषध फवारणी करताना दिसत आहे. मात्र, त्याचा परिणाम होताना दिसत नाही. नववर्षाच्या सुरुवातीच्या दिवसापासून वातावरणात चढ-उतार होताना दिसले. कधी चक्रीवादळाचा तडाखा, कधी कमी दाबाचा पट्टा, तर कधी अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी दुष्काळाचा सामना केला तर यंदा अवकाळी पावसाचा सामना केला. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागले तोपर्यंत पाऊस म्हणतो ‘मी पुन्हा येईन’ त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे. ज्यांच्याकडे कांदा साठवायला सोय आहे, त्यांना दोन पैसे मिळाले. यंदा कांदा लागवडीस सुरुवात केली; पण ऑक्टोबरमधील परतीच्या पावसाने तो पूर्णपणे सडून गेला. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला; पण होत्याचं नव्हतं झालं. केलेला खर्च पूर्णपणे वाया जाऊन लाखो रुपयांचा फटका बसला.

चौकट..

शेतकरी चांगलाच हतबल...

शेतकरी रोपे आणून कांद्याची लागवड करत आहे; पण रोगाने रोपेसुद्धा पिवळी पडत आहेत. कांद्याची पात ही पिवळी पडत असल्याने शेतकरी चांगलाच हतबल झाला आहे. या दिवसांत पिकांना थंडी पोषक आले, मात्र गेल्या काही दिवसांपासून गारवानंतर ढगाळ वातावरण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेती कोरडी होत नसल्याने तणाचा प्रादुर्भाव तर ऊन नसल्याने पिकाला पोषक वातावरण नाही. सगळीकडे शेतात तणाचा भरणा दिसत आहे म्हणून शेतकरी वैतागला आहे. आज तरी शेतकरी हवामान बदलाची वाट पाहत आहे.

२९कुकुडवाड

माण तालुक्यात कांदा पिकावर करपा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतित आहे.