शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

शिरगावची दीडशे एकर जमीन अधिकाऱ्यांनी घेतली नियमबाह्य

By admin | Updated: June 5, 2015 00:13 IST

ग्रामस्थांचा आरोप : संपादन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सातारा : युती शासनाच्या काळात तारळी धरणाचे काम झाले. हे काम करण्यापूर्वीच तारळी नदीच्या डाव्या बाजूकडील बागायती पट्यातील गावांची नियमबाह्य जमीन संपादीत केली आहे. त्यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील शिरगाव या एकट्या गावाची १५० एकर जमीन तत्कालीन अधिकाऱ्यांनी घेतली आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच तत्कालिन अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांची हक्काची जमीन गेली असून ती परत मिळावी, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणींचे निवेदन शिरगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना दिले. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री विजय शिवतारेही उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, शिरगाव हे गाव बागायती आहे. या गावाला यशवंतराव चव्हाण सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित या उपसासिंचन योजनेखाली जमीन ओलिताखाली आहे. असे असताना तारळी प्रकल्पाच्या तत्कालिन कार्यकारी अभियंत्यांनी मात्र शासनाचा आदेश डावलला आहे. हे गाव लाभक्षेत्रातून १९८५ आणि १९९६ ला वगळले आहे. त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी आणि राजकीय नेत्यांनी नियम धाब्यावर बसवला आहे. त्यांनी दीडशे एकर जमीन घेतली आहे. ही जमीन ओलिताखाली आम्ही आणली आहे. त्यासाठी जिल्हा बँकेचे सुमारे तीन कोटी रूपयांचे कर्ज काढले होते. त्या कर्जाचा बोजा आजही सातबाऱ्यावर आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या स्वार्थी भूमिकेमुळे शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. पोलिसांचा धाक दाखवून जमिनीचे संपादन केले आहे. ती जमीन परत मिळावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार आहे.संभाजी थोरात, राजू यादव, रणजीत यादव, राजेंद्र घाडगे, प्रमोद यादव, प्रितम यादव, धोंडिराम यादव, धनाजी सोनवले, युवराज यादव, शंकर गायकवाड, माजी शिक्षणाधिकारी हरीभाऊ गायकवाड, उस्मान मुजावर आदींनी व्यथा पालकमंत्री यांच्याकडेही मांडल्या. (प्रतिनिधी)पालकमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश शिरगावचे ग्रामस्थ आपल्यावर झालेल्या अन्यायाचे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले होते. त्याचवेळी पालकमंत्र्यांनाही ही बाब चुकीची असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. पालकमंत्री शिवतारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. बागायत पट्यातील जमीन संपादीत झाली असल्याने शेतकऱ्यांची हक्काची जमीन गेली आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच ती जमीन परत मिळावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही शिरगाव ग्रामस्थांनी केली आहे. शिरगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली तेव्हा अपली व्यथा तीव्रपणे मांडली. तसेच त्यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यासमोरही आपली बाजू स्पष्टपणे मांडताना जमीन परत देण्याची मागणी केली.