शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

गुंडगिरी मोडून काढणे ही आमची परंपरा

By admin | Updated: November 16, 2016 23:04 IST

उदयनराजे भोसले : आदरयुक्त दहशतीबद्दल समाज सांगेल ते प्रायश्चित्त घेण्यास तयार

उदयनराजे भोसले : आदरयुक्त दहशतीबद्दल समाज सांगेल ते प्रायश्चित्त घेण्यास तयारसातारा : सातारा शहरात असलेली गुंडगिरी मोडून काढण्याची आणि सुशासन राखणे ही आमच्या कुटुंबाची परंपरा आहे.आमच्या आदरयुक्त दहशतीबद्दल, समाज सांगेल ते प्रायश्चित्त आम्ही घेण्यास केव्हाही तयार आहोत. आमचे विरोधक मात्र आमच्या नैतिक वचकाची धडकी घेवून गर्भगळीत झाले आहेत. उसनं अवसान आणुन, कथित दहशत संपवण्याचा, न वाजणारा ढोल उर फाटेपर्यंत बडवत आहेत. असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी विरोधकांवर केला.सातारा विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधवी संजोग कदम आणि प्रभाग क्रमांक १० मधील साविआचे मनोज शेंडे, संगिता आवळे या उमेदवारांच्या प्रचार प्बैठकीत नागरिकांशी सुसंवाद साधताना उदयनराजे बोलत होते.ते म्हणाले, ‘सर्वसामान्य रिक्शावाले आणि नागरीक यांना तत्कालीन होणाऱ्या दंडेलशाहीच्या त्रासापासून सुटका करणारे फक्त एकच व्यक्तीमत्व म्हणजे दिवंगत दादामहाराज उर्फ प्रतापसिंहमहाराज हेच होते. त्यांच्या पश्चात गल्लोगल्लीच्या तथाकथित दंगेखोरांवर आमचा नैतिक वचक समाजावर अन्याय होवू नये म्हणून कायम राहीला आहे आणि यापुढेही राहणार आहे.कोणत्याही निवडणुकीत, प्रचारात कोणताही विधायक मु्द्या नसला की आमची दहशत आहे हा हमखास राखुन ठेवलेला मुद्दा बाहेर काढला जातो. त्यामुळे दहशत हा शब्दच सातारा जिल्ह्यात बोथट झाला आहे. आमची जर दहशत असती तर आम्ही खुलेआम जनतेमध्ये मिसळलो नसतो. कायम स्वत:ला स्वसंरक्षणात ठेवून बाउंसर घेवून वावरलो असतो. दहशतवाद करणाऱ्यास अनेक शत्रु तयार होत असतात आणि दहशतीखाली केलेल्या अन्यायामुळे समाजात अशा व्यक्तीविषयी चीड असते. आम्ही मात्र केव्हाही, कधीही आणि कुठेही जाण्यास तयार असतो. नागरीकांच्या मदतीला धावून जात असतो, असे धावून जाणे हीच जर दहशत असेल तर ती दहशतीची संकल्पना आम्हाला मान्य आहे.याउलट आम्ही भ्रष्टपणा कधीच केला नाही, भ्रष्टाचार करण्याची संधी सुध्दा मिळु नये म्हणून आमच्या स्वत:च्या सहभागाने कधीही सहकारी संस्था काढल्या नाहीत. मात्र, त्याचबरोबर अनेक संस्थांमध्ये आमचे नेतृत्व आहे. अनेक संस्थांच्या निर्मितीमध्ये आमचे योगदान आहे. अनेक संस्थांना आम्ही आमच्या पध्दतीने लागेल ते सहकार्य करीत असतो. मात्र संस्था काढायच्या त्या माध्यमातुन निधी उभारायचा, सरकारी अनुदाने घ्यायची, पुन्हा संस्था डबघाईला आली म्हणून ती मोडीत काढून त्या संस्थेचा हवातसा वापर करायचा हे आमच्या नैतिकतेमध्ये बसत नाही. अशा संस्थांमध्ये असलेल्या कामगार वर्गास किती पगार दिला जातो हा एक संशोधनाचा विषय आहे. असेही खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. (प्रतिनिधी)समाजहिताची दहशत आम्हास मान्य...उदयनराजे म्हणाले, कामगारांना आमचे पडेल ते काम करा अशी वागणुक देवून कायम आर्थिक बंधनात ठेवून आर्थिक दहशतवाद माजवण्यापेक्षा, समाजाच्या हिताची असलेली दहशत आम्हास मान्य आहे. त्याकरीता समाज सांगेल ते प्रायश्चित आम्ही घेण्यास तयार आहोत तुम्ही मात्र तुमच्या आर्थिक भ्रष्टाचाराबाबत पृथ्वीतलावरील कोणते प्रायश्चित घ्याल, हा मोठा प्रश्न आहे, असेही शेवटी ते म्हणाले.