शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
4
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
5
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
6
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
7
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
8
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
9
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
10
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
11
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
12
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
13
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
14
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
15
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
16
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
17
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
18
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
19
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
20
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?

गुंडगिरी मोडून काढणे ही आमची परंपरा

By admin | Updated: November 16, 2016 23:04 IST

उदयनराजे भोसले : आदरयुक्त दहशतीबद्दल समाज सांगेल ते प्रायश्चित्त घेण्यास तयार

उदयनराजे भोसले : आदरयुक्त दहशतीबद्दल समाज सांगेल ते प्रायश्चित्त घेण्यास तयारसातारा : सातारा शहरात असलेली गुंडगिरी मोडून काढण्याची आणि सुशासन राखणे ही आमच्या कुटुंबाची परंपरा आहे.आमच्या आदरयुक्त दहशतीबद्दल, समाज सांगेल ते प्रायश्चित्त आम्ही घेण्यास केव्हाही तयार आहोत. आमचे विरोधक मात्र आमच्या नैतिक वचकाची धडकी घेवून गर्भगळीत झाले आहेत. उसनं अवसान आणुन, कथित दहशत संपवण्याचा, न वाजणारा ढोल उर फाटेपर्यंत बडवत आहेत. असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी विरोधकांवर केला.सातारा विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधवी संजोग कदम आणि प्रभाग क्रमांक १० मधील साविआचे मनोज शेंडे, संगिता आवळे या उमेदवारांच्या प्रचार प्बैठकीत नागरिकांशी सुसंवाद साधताना उदयनराजे बोलत होते.ते म्हणाले, ‘सर्वसामान्य रिक्शावाले आणि नागरीक यांना तत्कालीन होणाऱ्या दंडेलशाहीच्या त्रासापासून सुटका करणारे फक्त एकच व्यक्तीमत्व म्हणजे दिवंगत दादामहाराज उर्फ प्रतापसिंहमहाराज हेच होते. त्यांच्या पश्चात गल्लोगल्लीच्या तथाकथित दंगेखोरांवर आमचा नैतिक वचक समाजावर अन्याय होवू नये म्हणून कायम राहीला आहे आणि यापुढेही राहणार आहे.कोणत्याही निवडणुकीत, प्रचारात कोणताही विधायक मु्द्या नसला की आमची दहशत आहे हा हमखास राखुन ठेवलेला मुद्दा बाहेर काढला जातो. त्यामुळे दहशत हा शब्दच सातारा जिल्ह्यात बोथट झाला आहे. आमची जर दहशत असती तर आम्ही खुलेआम जनतेमध्ये मिसळलो नसतो. कायम स्वत:ला स्वसंरक्षणात ठेवून बाउंसर घेवून वावरलो असतो. दहशतवाद करणाऱ्यास अनेक शत्रु तयार होत असतात आणि दहशतीखाली केलेल्या अन्यायामुळे समाजात अशा व्यक्तीविषयी चीड असते. आम्ही मात्र केव्हाही, कधीही आणि कुठेही जाण्यास तयार असतो. नागरीकांच्या मदतीला धावून जात असतो, असे धावून जाणे हीच जर दहशत असेल तर ती दहशतीची संकल्पना आम्हाला मान्य आहे.याउलट आम्ही भ्रष्टपणा कधीच केला नाही, भ्रष्टाचार करण्याची संधी सुध्दा मिळु नये म्हणून आमच्या स्वत:च्या सहभागाने कधीही सहकारी संस्था काढल्या नाहीत. मात्र, त्याचबरोबर अनेक संस्थांमध्ये आमचे नेतृत्व आहे. अनेक संस्थांच्या निर्मितीमध्ये आमचे योगदान आहे. अनेक संस्थांना आम्ही आमच्या पध्दतीने लागेल ते सहकार्य करीत असतो. मात्र संस्था काढायच्या त्या माध्यमातुन निधी उभारायचा, सरकारी अनुदाने घ्यायची, पुन्हा संस्था डबघाईला आली म्हणून ती मोडीत काढून त्या संस्थेचा हवातसा वापर करायचा हे आमच्या नैतिकतेमध्ये बसत नाही. अशा संस्थांमध्ये असलेल्या कामगार वर्गास किती पगार दिला जातो हा एक संशोधनाचा विषय आहे. असेही खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. (प्रतिनिधी)समाजहिताची दहशत आम्हास मान्य...उदयनराजे म्हणाले, कामगारांना आमचे पडेल ते काम करा अशी वागणुक देवून कायम आर्थिक बंधनात ठेवून आर्थिक दहशतवाद माजवण्यापेक्षा, समाजाच्या हिताची असलेली दहशत आम्हास मान्य आहे. त्याकरीता समाज सांगेल ते प्रायश्चित आम्ही घेण्यास तयार आहोत तुम्ही मात्र तुमच्या आर्थिक भ्रष्टाचाराबाबत पृथ्वीतलावरील कोणते प्रायश्चित घ्याल, हा मोठा प्रश्न आहे, असेही शेवटी ते म्हणाले.