शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

कपातीचे पैसे परत करण्याचे कारखान्यांना आदेश : पाटील

By admin | Updated: December 6, 2015 00:03 IST

‘बळीराजा’च्या तक्रारीची आयुक्तांकडून दखल

कऱ्हाड : ‘शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ प्रमाणे बिले अदा करण्यासाठी राज्य सरकारकाने पाच वर्षे मुदतीचे बिन व्याजी कर्ज (सॉफ्ट लोन) मंजूर केले असताना काही कारखानदार सभासदांच्या बिलातून पैसे कपात करत आहेत. ही कपात शेतकऱ्यांनी अमान्य केली आहे. दरम्यान कारखानदारांच्या या अन्याया विरोधात बळीराजा शेतकरी संघटनेने प्रादेशिक सहसंचालक साखर व सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन संबंधित साखर कारखान्यांना शेतकऱ्यांचे कपात केलेले पैसे तातडीने अदा करण्याचे आदेश केले आहेत,’ अशी माहिती बळीराजा संघटनेचे संस्थापक बी.जी.पाटील यांनी दिली आहे. कऱ्हाड येथे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकांरांशी ते बोलत होते. यावेळी बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, कऱ्हाड तालुका अध्यक्ष साजिद मुल्ला, पाटण तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, तात्यासो पाटील, दीपक पाटील आदी उपस्थित होते. बी. जी. पाटील म्हणाले, ‘राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी पंचाहत्तर टक्यांपर्यंत ‘एफआरपी’ची रक्कम शेतकऱ्यांना अदा केली होती अशा साखर कारखान्यांना ‘एफआरपी’ची उर्वरित रक्कम अदा करण्यासाठी राज्य सरकारने पाच वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज मंजूर केले आहे. परंतु इस्लामपूर येथील राजारामबापू साखर कारखाना व वाळवा येथील हुतात्मा साखर कारखाना या दोन कारखान्यांनी शासनाच्या या अनुदानातून ठेवी कपात करण्याचा ठराव करून ठेवी घेतल्या होत्या. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना शासनाच्या अनुदानातून या कारखान्यांनी प्रतिटन १४७ ते २०० रुपये वसूल करून शेतकऱ्यांना संकटात टाकले होते. या विरोधात बळीराजा शेतकरी संघटनेने प्रादेशिक सहसंचालक साखर व सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली होती. तसेच सभासद शेतकऱ्यांना आवाहन केले होते की पैसे कापून घेण्याबाबतचे संमत्तीपत्र कारखान्यांना देऊ नये. याला प्रतिसाद देत काही शेतकऱ्यांनी ही कपात अमान्य करत कारखाना व्यवस्थापनाला तसे लेखी कळविले. संघटनेच्या तक्रार अर्जाची दखल घेऊन साखर आयुक्त कोल्हापूर यांनी राजारामबापू कारखाना व हुतात्मा कारखाना यांना शेतकऱ्यांचे कपात केलेले पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत. कारखान्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर कापलेले पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राजारामबापू कारखान्याने सुमारे ७४ लाख रूपये व हुतात्मा कारखान्याने एक कोटीच्या दरम्यान पैसे शेतकऱ्यांना अदा करण्याच्या कार्यवाहीस सुरुवात केली आहे, असेही पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)