शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

आदेश न्यायालयाचा; श्रेयवाद याचिकाकर्त्यांचा !

By admin | Updated: February 13, 2015 00:47 IST

पाटण : भूकंपग्रस्त दाखले देण्याचा राज्य शासनाला आदेश

पाटण : आजवर लाखो भूकंपाचे धक्के सोसलेल्या पाटण तालुक्यातील जनतेला भूकंपग्रस्त असल्याचा दाखला मिळू नये, ही आश्चर्यचकित बाब आहे. हे तालुक्यातील आजी-माजी आमदारांच्या लक्षात आल्यानंतर योगायोगाने दोन्ही बाजूंकडून याबाबत उच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिकांद्वारे न्याय मागण्यात आला. न्यायालयाने दि. ११ फेबु्रवारी रोजी एकच निकाल देताना राज्य शासनाला ‘पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्तांना दाखले द्या,’ असे सुनावले. दरम्यान, न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिल्यामुळे याचिकाकर्त्यांनी ‘झाले ते माझ्यामुळेच,’ असे समजून श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.दि. ९ डिसेंबर २०११ रोजी केरळ, ता. पाटण येथील बाळासाहेब पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून भूकंपग्रस्त दाखले मिळण्यासाठी दाद मागितली. आमदार शंभूराज देसाई यांनी २०१४ ला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. बाळासाहेब पवार यांना माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही याचिका दाखल होण्यामध्ये अडीच वर्षांचा कालावधी असल्यामुळे माझ्या प्रयत्नांमुळेच आता यश आले, असे बाळासाहेब पवार यांना वाटत आहे. त्याचपद्धतीने आमदार देसाई हे सुद्धा २००४ सालापासून प्रयत्न केल्याचे विविध दाखले पुराव्यानिशी मांडत आहेत. २००४ ला प्रधान सचिव यांनी भूकंपग्रस्त दाखले देण्याच्या ठरावाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी महसूल सचिवांना आदेश दिले होते, असे आमदार शंभूराज देसाई म्हणतात. बाळासाहेब पवार म्हणतात की, २०११ मध्ये तालुक्यातील अनिता जाधव (रा. केरळ) या मुलीला भूकंपबाधित हा दाखला तहसीलदारांनी दिला होता. तिला आधिपारिचारिका म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीत दाखला रद्द ठरविला. ती मुलगी नोकरीस मुकली त्यानंतर मंत्री, मुख्यमंत्री यांच्या आदेशाचा काही उपयोग होत नाही. हे लक्षात आल्यानंतर तत्कालीन आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या सल्ल्यानुसार मी याचिका दाखल केली. (प्रतिनधी)श्रेयावाद आणखी कितीकाळ...पाटण तालुक्यातील जनतेला भूकंपग्रस्त असल्याचा दाखला देण्यासाठी उच्च न्यायालयाने नुकताच आदेश दिला आहे. असे असताना आता राजकीय श्रेयवाद चांगलाच उफाळून आला आहे. यापूर्वीही भूकंपग्रस्त दाखल्यावरून पाटण तालुक्यातील अनेकांनी आपले मते मांडली होती. त्यात आता श्रेयवाद सुरू झाला आहे. तरीही न्यायायाचा आदेश आल्याने जनतेत समाधानाचे वातावरण आहे.