शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

आदेश न्यायालयाचा; श्रेयवाद याचिकाकर्त्यांचा !

By admin | Updated: February 13, 2015 00:47 IST

पाटण : भूकंपग्रस्त दाखले देण्याचा राज्य शासनाला आदेश

पाटण : आजवर लाखो भूकंपाचे धक्के सोसलेल्या पाटण तालुक्यातील जनतेला भूकंपग्रस्त असल्याचा दाखला मिळू नये, ही आश्चर्यचकित बाब आहे. हे तालुक्यातील आजी-माजी आमदारांच्या लक्षात आल्यानंतर योगायोगाने दोन्ही बाजूंकडून याबाबत उच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिकांद्वारे न्याय मागण्यात आला. न्यायालयाने दि. ११ फेबु्रवारी रोजी एकच निकाल देताना राज्य शासनाला ‘पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्तांना दाखले द्या,’ असे सुनावले. दरम्यान, न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिल्यामुळे याचिकाकर्त्यांनी ‘झाले ते माझ्यामुळेच,’ असे समजून श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.दि. ९ डिसेंबर २०११ रोजी केरळ, ता. पाटण येथील बाळासाहेब पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून भूकंपग्रस्त दाखले मिळण्यासाठी दाद मागितली. आमदार शंभूराज देसाई यांनी २०१४ ला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. बाळासाहेब पवार यांना माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही याचिका दाखल होण्यामध्ये अडीच वर्षांचा कालावधी असल्यामुळे माझ्या प्रयत्नांमुळेच आता यश आले, असे बाळासाहेब पवार यांना वाटत आहे. त्याचपद्धतीने आमदार देसाई हे सुद्धा २००४ सालापासून प्रयत्न केल्याचे विविध दाखले पुराव्यानिशी मांडत आहेत. २००४ ला प्रधान सचिव यांनी भूकंपग्रस्त दाखले देण्याच्या ठरावाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी महसूल सचिवांना आदेश दिले होते, असे आमदार शंभूराज देसाई म्हणतात. बाळासाहेब पवार म्हणतात की, २०११ मध्ये तालुक्यातील अनिता जाधव (रा. केरळ) या मुलीला भूकंपबाधित हा दाखला तहसीलदारांनी दिला होता. तिला आधिपारिचारिका म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीत दाखला रद्द ठरविला. ती मुलगी नोकरीस मुकली त्यानंतर मंत्री, मुख्यमंत्री यांच्या आदेशाचा काही उपयोग होत नाही. हे लक्षात आल्यानंतर तत्कालीन आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या सल्ल्यानुसार मी याचिका दाखल केली. (प्रतिनधी)श्रेयावाद आणखी कितीकाळ...पाटण तालुक्यातील जनतेला भूकंपग्रस्त असल्याचा दाखला देण्यासाठी उच्च न्यायालयाने नुकताच आदेश दिला आहे. असे असताना आता राजकीय श्रेयवाद चांगलाच उफाळून आला आहे. यापूर्वीही भूकंपग्रस्त दाखल्यावरून पाटण तालुक्यातील अनेकांनी आपले मते मांडली होती. त्यात आता श्रेयवाद सुरू झाला आहे. तरीही न्यायायाचा आदेश आल्याने जनतेत समाधानाचे वातावरण आहे.