शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

राजधानीत विरोधकांचे खेळ... राजेंचा बसणार का मेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST

असे असू शकते संभाव्य चित्र दोन्ही राजे ‘भाजप’वासी झाले तरी पालिकेची निवडणूक ते स्वतंत्र आघाड्या करून लढण्याचीच अधिक शक्यता ...

असे असू शकते संभाव्य चित्र

दोन्ही राजे ‘भाजप’वासी झाले तरी पालिकेची निवडणूक ते स्वतंत्र आघाड्या करून लढण्याचीच अधिक शक्यता आहे. कारण गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची सल अजूनही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मनात असू शकते. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. दुसरीकडे खा. उदयनराजे यांचा भाजप प्रवेश त्यांच्या काही शिलेदारांच्या पचनी पडलेला नाही. असे शिलेदार वेगळी वाट शोधण्याचा धोकाही आहे. खा. उदयनराजेंमुळे कोरेगाव मतदारसंघात आ. शशिकांत शिंदेंना विधानसभेला मोठा हादरा बसला. त्याचा वचपा म्हणून शशिकांत शिंदे यांनीदेखील पालिकेत राष्ट्रवादीचे पॅनेल उभे करण्याची घोषणा केली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये असले तरी त्यांची आजही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक आहे. त्यामुळे खासदारांच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी यंदा मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. मात्र, खा. उदयनराजे भोसले हे फासा पलटण्यात तितकेच माहीर आहेत, हेदेखील विसरून चालणार नाही.

(चौकट)

असे होते पक्षीय बलाबल

एकूण प्रभाग २०

एकूण नगरसेवक : ४०

सातारा विकास आघाडी : २२

नगर विकास आघाडी : १२

भारतीय जनता पार्टी : ६

(चौकट)

हद्दवाढीमुळे असा असेल बदल

द्विसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द

यंदा एक वार्ड एक नगरसेवक

एकूण वार्ड ४८

एकूण नगरसेवक ४८

हद्दवाढीमुळे वाढलेली लोकसंख्या ६१ हजार

(चौकट)

राजकीय समीकरण बदलले...

पालिकेच्या गेल्या निवडणुकीत खा. उदयनराजेंच्या आघाडीने सत्ता स्थापन केली, तर भाजपच्या सहा नगरसेवकांनीदेखील प्रथमच पालिकेचा उंबरठा ओलांडला. आताची परिस्थिती वेगळी आहे. दोन्ही राजे भाजपमध्ये असले तरी पालिकेची निवडणूक एकत्र येऊन व पक्षाच्या चिन्हावर लढविली जाईल, अशी शक्यता धूसर आहे. येत्या दोन-तीन महिन्यात बरीच राजकीय समीकरणे बदलणार असून, दोन्ही राजेंमध्ये सुरू असलेली पत्रकबाजी याचीच सुरुवात असल्याची चर्चा आहे.

(चौकट)

वचननामा पूर्तीसाठी पुरेपूर प्रयत्न

सत्ताधारी सातारा विकास आघाडीने गेल्या निवडणुकीत जनतेला दिलेला वचननामा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. कास धरणाची उंची, ग्रेड सेपरेटर, भुयारी गटार योजना, घरकुल योजना, रस्ते विकास, पाणी योजनांचे बळकटीकरण, दिवाबत्ती यापैकी अनेक योजनांची कामे मार्गी लावली, तर काही योजना प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीला सामोरे जाताना सत्ताधाऱ्यांना हा ‘वचननामा’ कितपत लाभदायी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.