शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

राजधानीत विरोधकांचे खेळ... राजेंचा बसणार का मेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST

असे असू शकते संभाव्य चित्र दोन्ही राजे ‘भाजप’वासी झाले तरी पालिकेची निवडणूक ते स्वतंत्र आघाड्या करून लढण्याचीच अधिक शक्यता ...

असे असू शकते संभाव्य चित्र

दोन्ही राजे ‘भाजप’वासी झाले तरी पालिकेची निवडणूक ते स्वतंत्र आघाड्या करून लढण्याचीच अधिक शक्यता आहे. कारण गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची सल अजूनही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मनात असू शकते. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. दुसरीकडे खा. उदयनराजे यांचा भाजप प्रवेश त्यांच्या काही शिलेदारांच्या पचनी पडलेला नाही. असे शिलेदार वेगळी वाट शोधण्याचा धोकाही आहे. खा. उदयनराजेंमुळे कोरेगाव मतदारसंघात आ. शशिकांत शिंदेंना विधानसभेला मोठा हादरा बसला. त्याचा वचपा म्हणून शशिकांत शिंदे यांनीदेखील पालिकेत राष्ट्रवादीचे पॅनेल उभे करण्याची घोषणा केली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये असले तरी त्यांची आजही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक आहे. त्यामुळे खासदारांच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी यंदा मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. मात्र, खा. उदयनराजे भोसले हे फासा पलटण्यात तितकेच माहीर आहेत, हेदेखील विसरून चालणार नाही.

(चौकट)

असे होते पक्षीय बलाबल

एकूण प्रभाग २०

एकूण नगरसेवक : ४०

सातारा विकास आघाडी : २२

नगर विकास आघाडी : १२

भारतीय जनता पार्टी : ६

(चौकट)

हद्दवाढीमुळे असा असेल बदल

द्विसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द

यंदा एक वार्ड एक नगरसेवक

एकूण वार्ड ४८

एकूण नगरसेवक ४८

हद्दवाढीमुळे वाढलेली लोकसंख्या ६१ हजार

(चौकट)

राजकीय समीकरण बदलले...

पालिकेच्या गेल्या निवडणुकीत खा. उदयनराजेंच्या आघाडीने सत्ता स्थापन केली, तर भाजपच्या सहा नगरसेवकांनीदेखील प्रथमच पालिकेचा उंबरठा ओलांडला. आताची परिस्थिती वेगळी आहे. दोन्ही राजे भाजपमध्ये असले तरी पालिकेची निवडणूक एकत्र येऊन व पक्षाच्या चिन्हावर लढविली जाईल, अशी शक्यता धूसर आहे. येत्या दोन-तीन महिन्यात बरीच राजकीय समीकरणे बदलणार असून, दोन्ही राजेंमध्ये सुरू असलेली पत्रकबाजी याचीच सुरुवात असल्याची चर्चा आहे.

(चौकट)

वचननामा पूर्तीसाठी पुरेपूर प्रयत्न

सत्ताधारी सातारा विकास आघाडीने गेल्या निवडणुकीत जनतेला दिलेला वचननामा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. कास धरणाची उंची, ग्रेड सेपरेटर, भुयारी गटार योजना, घरकुल योजना, रस्ते विकास, पाणी योजनांचे बळकटीकरण, दिवाबत्ती यापैकी अनेक योजनांची कामे मार्गी लावली, तर काही योजना प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीला सामोरे जाताना सत्ताधाऱ्यांना हा ‘वचननामा’ कितपत लाभदायी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.