शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
4
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
5
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
6
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
7
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
8
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
9
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
10
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
11
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
12
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
13
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
14
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
15
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
16
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
17
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
18
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
19
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
20
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!

राजधानीत विरोधकांचे खेळ... राजेंचा बसणार का मेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST

असे असू शकते संभाव्य चित्र दोन्ही राजे ‘भाजप’वासी झाले तरी पालिकेची निवडणूक ते स्वतंत्र आघाड्या करून लढण्याचीच अधिक शक्यता ...

असे असू शकते संभाव्य चित्र

दोन्ही राजे ‘भाजप’वासी झाले तरी पालिकेची निवडणूक ते स्वतंत्र आघाड्या करून लढण्याचीच अधिक शक्यता आहे. कारण गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची सल अजूनही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मनात असू शकते. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. दुसरीकडे खा. उदयनराजे यांचा भाजप प्रवेश त्यांच्या काही शिलेदारांच्या पचनी पडलेला नाही. असे शिलेदार वेगळी वाट शोधण्याचा धोकाही आहे. खा. उदयनराजेंमुळे कोरेगाव मतदारसंघात आ. शशिकांत शिंदेंना विधानसभेला मोठा हादरा बसला. त्याचा वचपा म्हणून शशिकांत शिंदे यांनीदेखील पालिकेत राष्ट्रवादीचे पॅनेल उभे करण्याची घोषणा केली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये असले तरी त्यांची आजही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक आहे. त्यामुळे खासदारांच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी यंदा मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. मात्र, खा. उदयनराजे भोसले हे फासा पलटण्यात तितकेच माहीर आहेत, हेदेखील विसरून चालणार नाही.

(चौकट)

असे होते पक्षीय बलाबल

एकूण प्रभाग २०

एकूण नगरसेवक : ४०

सातारा विकास आघाडी : २२

नगर विकास आघाडी : १२

भारतीय जनता पार्टी : ६

(चौकट)

हद्दवाढीमुळे असा असेल बदल

द्विसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द

यंदा एक वार्ड एक नगरसेवक

एकूण वार्ड ४८

एकूण नगरसेवक ४८

हद्दवाढीमुळे वाढलेली लोकसंख्या ६१ हजार

(चौकट)

राजकीय समीकरण बदलले...

पालिकेच्या गेल्या निवडणुकीत खा. उदयनराजेंच्या आघाडीने सत्ता स्थापन केली, तर भाजपच्या सहा नगरसेवकांनीदेखील प्रथमच पालिकेचा उंबरठा ओलांडला. आताची परिस्थिती वेगळी आहे. दोन्ही राजे भाजपमध्ये असले तरी पालिकेची निवडणूक एकत्र येऊन व पक्षाच्या चिन्हावर लढविली जाईल, अशी शक्यता धूसर आहे. येत्या दोन-तीन महिन्यात बरीच राजकीय समीकरणे बदलणार असून, दोन्ही राजेंमध्ये सुरू असलेली पत्रकबाजी याचीच सुरुवात असल्याची चर्चा आहे.

(चौकट)

वचननामा पूर्तीसाठी पुरेपूर प्रयत्न

सत्ताधारी सातारा विकास आघाडीने गेल्या निवडणुकीत जनतेला दिलेला वचननामा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. कास धरणाची उंची, ग्रेड सेपरेटर, भुयारी गटार योजना, घरकुल योजना, रस्ते विकास, पाणी योजनांचे बळकटीकरण, दिवाबत्ती यापैकी अनेक योजनांची कामे मार्गी लावली, तर काही योजना प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीला सामोरे जाताना सत्ताधाऱ्यांना हा ‘वचननामा’ कितपत लाभदायी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.