शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

एकत्रित टोल वसुलीला विरोधच...

By admin | Updated: September 16, 2016 23:46 IST

महाबळेश्वरात जनआंदोलनाचा निर्णय : नगरपालिका, वन विभागाचा वाद; जनहित याचिका दाखल करण्याचीही तयारी

महाबळेश्वर : वन विभागाने वेण्णा लेक येथे एकत्रित टोल घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्याने महाबळेश्वर येथे संतापाची तीव्र लाट उसळली आहे. हुकूमशाही पद्धतीने शासकीय यंत्रणा अन्यायकारक आदेश शहरावर लादत असेल तर लोकशाही मार्गाने मोठे जनआंदोलन उभारून या एकत्रित टोल वसुलीला तीव्र विरोध करू, असा निर्णय नगरपरिषद व शहरातील विविध सेवाभावी संघटना, सर्व पक्षीय पदाधिकारी व नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला. एकीकडे आंदोलनाची तयारी सुरू असताना या झिजीया टोल विरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची तयारीही सुरू करण्याचा निर्णय याच बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे भविष्यात वन विभाग विरुद्ध महाबळेश्वर असा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. ब्रिटिश काळापासून येथील विविध पॉइंटची देखभाल दुरुस्ती व सुशोभीकरण ही कामे पालिकेच्या वतीने करण्यात येत होती. वन विभागाने या सर्व पॉइंटवर मालकी हक्क सांगून पॉइंटची देखभाल दुरुस्ती व सुशोभीकरणास पालिकेला विरोध केला. देखभाल दुरुस्ती अभावी या पॉइंटची दुरवस्था होऊ लागली. त्यामुळे सर्व पॉइंट हे असुरक्षित बनले होते. याच गोष्टीचा फायदा घेऊन वन विभागाने शासन निर्णयाचा आधार घेऊन पॉइंटच्या देखभाल दुरुस्तीसाठी उपद्रव शुल्क आकारण्यास प्रारंभ केला. या शुल्क वसुलीसाठी पाच वन व्यवस्थापन समित्यांची स्थापना केली. प्रथम एका वाहनास दहा रुपये असे असलेले शुल्क मागील एक वर्षापूर्वी प्रत्येकी दहा रुपये असे करण्यात आले. अशा प्रकारे पालिकेचा प्रति व्यक्ती २० रुपये आणि वन विभागाचे प्रत्येक ठिकाणी दहा रुपये अशी टोल वसुली येथे सुरू होती. कोणी किती टोल घ्यावा यावर गेली दोन वर्षे पालिका व वन विभाग यांच्यामध्ये खल सुरू होता. यातून मार्ग निघत नसल्याने हा विषय जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला. जिल्हाधिकारी यांनी वन विभागाला पाठबळ देण्याची भूमिका घेतली. जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयाविरोधात शहरात तीव्र असंतोष पसरला आहे. नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस उपनगराध्यक्ष संतोष आखाडे, माजी नगराध्यक्ष किसनराव शिंदे, युसुफ शेख, अर्बन बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब कोंढाळकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे, बँकेचे संचालक समीर सुतार, गोपाळ लालबेग, रमाकांत शिंदे, शंकर ढेबे, अमित कोमटी, सुनील गद्रे, सलीम बागवान, रामचंद्र हिरवे, विशाल तोष्णीवाल, तुकाराम बावळेकर, जावेद खारखंडे, मनसेचे संजय पिसाळ, रोहित ढेबे, रवींद्र हिरवे आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी) (संबंधित वृत्त हॅलो २ वर) रास्ता रोको; गाव बंदचाही इशारा...बैठकीच्या प्रारंभी नगरसेवक कुमार शिंदे यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. टोल एकत्रिकरणाबाबत पालिकेची काय भूमिका आहे ते स्पष्ट केले. या नंतर सर्व नागरिकांनी आपली मते मांडण्यास प्रारंभ केला. काही काळ नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार करून नगरसेवकांना धारेवर धरले होते. परंतु संतप्त झालेल्या नागरिकांना नगरसेवक कुमार शिंदे, संतोष शिंदे, संदीप साळुंखे, प्रकाश पाटील, विमल पार्टे, अफजल सुतार, डॉ. भांगडीया यांनी समाधानकारक उत्तरे दिली. जिल्हा प्रशासन पालिकेच्या अधिकारवर गदा आणून गळचेपी करीत आहे. तसेच पालिकेच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासून पालिकेचे खच्चीकरण करण्यात येत आहे, असे सांगण्यात आले. या भूमिकेवर बैठकीत सर्वांचेच एकमत झाले. याच बैठकीत वन विभागाच्या या टोल एकत्रिकरणास तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रथम लोकशाही व सनदशिरमार्गाने विरोध करण्यात येईल. तरीही जिल्हा प्रशासनाने दंडेली सुरू केली तर रास्ता रोको करून गाव बंद आंदोलन करू, असा निर्णय घेण्यात आला.