शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

गर्भपाताच्या कायद्यातील प्रस्तावित बदलांना विरोध

By admin | Updated: November 11, 2014 00:06 IST

वैद्यकीय गर्भपाताच्या कायद्यात बदल करण्याचा निर्णय शासनाने घोषित केला

सातारा : वैद्यकीय गर्भपाताच्या कायद्यात बदल करण्याचा निर्णय शासनाने घोषित केला आहे. वैद्यकीय गर्भपाताचा प्रस्तावित बदलामुळे बेकायदेशीर गर्भपातात वाढ होऊन मुलींची संख्या घटेल म्हणून प्रस्तावित बदलाला विरोध करण्यासाठी राज्य महिला लोक आयोगातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.राज्य महिला लोक आयोगाच्या राज्य कार्याध्यक्ष अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, डॉक्टरांसह बीएचएमएस, बीएएमएस, आयुष आणि एएनएम यांना आरोग्य सेवक असे संबोधून परवानगी देण्यात येत आहे, याला विरोध आहे. अ‍ॅलोपॅथीचे शिक्षण घेतलेल्या, पशुचिकित्सक डॉक्टरांना परवानगी दिली तरी चालेल; परंतु ज्या ठिकाणी रक्तपेढी नाही, रक्तस्त्राव तातडीने थांबवू शकतील, अशी औषधे उपलब्ध नाहीत. तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळू शकेल, असे सुसज्ज रुग्णालय व तज्ज्ञ नाही, अशा ठिकाणी गर्भपातास परवानगी देण्यास आमची हरकत आहे. चौवीस आठवड्यापर्यंतच्या गर्भपाताला मान्यता देण्यामुळे गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीत अडसर निर्माण होईल आणि मुलींची संख्या घटेल, बेकायदेशीर गर्भपात वाढतील.गरोदरपण, बाळंतपण, गर्भपात यासर्वच गोष्टी कोणत्याही स्त्रीसाठी जोखमीच्या असतात, जीवघेण्या होऊ शकतात. त्यामुळे बारा आठवड्यांपुढील वीस आठवड्यांपर्यंतची परवानगी असणारा गर्भपात हा अपायकारक आहे. ती मर्यादा चोवीस आठवड्यांपर्यंत वाढविणे म्हणजे गर्भलिंग निदान करून गर्भपात करत असलेल्या यंत्रणांना मोकळीक देण्यासारखे आहे. गर्भपाताची औषधे डॉक्टरांच्या शिफारसींशिवाय मिळणार नाहीत. याची खबरदारी घेण्यात यावी. प्रस्तावित बदल करण्यापूर्वी प्रचलित कायदा आणि नियमांची अंमलबजावणी होते का? याचा अहवाल प्रसिद्ध करावा. असेही निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)जवखेड हत्याकांडाचा निषेधजवखेड येथे घडलेल्या दलित हत्याकांडाचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. हा प्रकार महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला काळीमा फासणारा आहे. कायदे चांगले असूनही शासन, प्रशासन, पोलीस, सरकारी वकील बहुतांश वेळा पीडितांच्या बाजूने लढताना दिसत नाहीत. दलित, स्त्रिया, अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारे धर्मांध, जातीअंध, स्त्रीविरोधी प्रवृत्तींचे गुन्हे करण्याचे धाडसच होता कामा नये, यासाठी संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्टाचारमुक्त व राजकीय हस्तक्षेपाशिवाय कायद्याच्या चौकटीत राहून काम करेल याची हमी नवीन मुख्यमंत्री, नवीन शासनाने जनसामान्यांत द्यावी, अशीही मागणी केली.