शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपाताच्या कायद्यातील प्रस्तावित बदलांना विरोध

By admin | Updated: November 11, 2014 00:06 IST

वैद्यकीय गर्भपाताच्या कायद्यात बदल करण्याचा निर्णय शासनाने घोषित केला

सातारा : वैद्यकीय गर्भपाताच्या कायद्यात बदल करण्याचा निर्णय शासनाने घोषित केला आहे. वैद्यकीय गर्भपाताचा प्रस्तावित बदलामुळे बेकायदेशीर गर्भपातात वाढ होऊन मुलींची संख्या घटेल म्हणून प्रस्तावित बदलाला विरोध करण्यासाठी राज्य महिला लोक आयोगातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.राज्य महिला लोक आयोगाच्या राज्य कार्याध्यक्ष अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, डॉक्टरांसह बीएचएमएस, बीएएमएस, आयुष आणि एएनएम यांना आरोग्य सेवक असे संबोधून परवानगी देण्यात येत आहे, याला विरोध आहे. अ‍ॅलोपॅथीचे शिक्षण घेतलेल्या, पशुचिकित्सक डॉक्टरांना परवानगी दिली तरी चालेल; परंतु ज्या ठिकाणी रक्तपेढी नाही, रक्तस्त्राव तातडीने थांबवू शकतील, अशी औषधे उपलब्ध नाहीत. तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळू शकेल, असे सुसज्ज रुग्णालय व तज्ज्ञ नाही, अशा ठिकाणी गर्भपातास परवानगी देण्यास आमची हरकत आहे. चौवीस आठवड्यापर्यंतच्या गर्भपाताला मान्यता देण्यामुळे गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीत अडसर निर्माण होईल आणि मुलींची संख्या घटेल, बेकायदेशीर गर्भपात वाढतील.गरोदरपण, बाळंतपण, गर्भपात यासर्वच गोष्टी कोणत्याही स्त्रीसाठी जोखमीच्या असतात, जीवघेण्या होऊ शकतात. त्यामुळे बारा आठवड्यांपुढील वीस आठवड्यांपर्यंतची परवानगी असणारा गर्भपात हा अपायकारक आहे. ती मर्यादा चोवीस आठवड्यांपर्यंत वाढविणे म्हणजे गर्भलिंग निदान करून गर्भपात करत असलेल्या यंत्रणांना मोकळीक देण्यासारखे आहे. गर्भपाताची औषधे डॉक्टरांच्या शिफारसींशिवाय मिळणार नाहीत. याची खबरदारी घेण्यात यावी. प्रस्तावित बदल करण्यापूर्वी प्रचलित कायदा आणि नियमांची अंमलबजावणी होते का? याचा अहवाल प्रसिद्ध करावा. असेही निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)जवखेड हत्याकांडाचा निषेधजवखेड येथे घडलेल्या दलित हत्याकांडाचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. हा प्रकार महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला काळीमा फासणारा आहे. कायदे चांगले असूनही शासन, प्रशासन, पोलीस, सरकारी वकील बहुतांश वेळा पीडितांच्या बाजूने लढताना दिसत नाहीत. दलित, स्त्रिया, अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारे धर्मांध, जातीअंध, स्त्रीविरोधी प्रवृत्तींचे गुन्हे करण्याचे धाडसच होता कामा नये, यासाठी संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्टाचारमुक्त व राजकीय हस्तक्षेपाशिवाय कायद्याच्या चौकटीत राहून काम करेल याची हमी नवीन मुख्यमंत्री, नवीन शासनाने जनसामान्यांत द्यावी, अशीही मागणी केली.