शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी झाले विरोधक... अन् विरोधक आनंदले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST

सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण ऑनलाईन सभेची लाईनच चुकली. सभागृहात झालेल्या आरोप प्रत्यारोपावर सभागृहातच चर्चा झाली पाहिजे. पण, स्वत:ला तज्ज्ञ म्हणविणाऱ्या ...

सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण ऑनलाईन सभेची लाईनच चुकली. सभागृहात झालेल्या आरोप प्रत्यारोपावर सभागृहातच चर्चा झाली पाहिजे. पण, स्वत:ला तज्ज्ञ म्हणविणाऱ्या अनेकांना याचा विसरच पडलेला दिसतोय. साप साप म्हणून भुई धोपटणाऱ्यांना आपला माणूसच फुटल्याचा साक्षात्कार झाला. पण, त्यानिमित्ताने प्रशासनातील कोणी दोषी असेल तर त्यालाही शोधले पाहिजे, असे वाटले नाही. मग, ही सर्वांचीच मिलिभगत आहे का, असा प्रश्नही उपस्थित होतो.

कोरोनाच्या काळात केल्या गेलेल्या खरेदीबाबत नगरसेवक आण्णा लेवे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. प्रशासनातील चुकीच्या कामाबाबत हा आक्षेप होता. पालिकेत काही चुकीचे चालले असेल तर त्याबाबत विचारणा करण्याचा अधिकार नगरसेवकांना आहे. तोही सत्ताधारी हिरावून घेणार आहेत का, असा प्रश्न पडतो आहे. कोणी काहीही विचारायचे नाही. जे चालले आहे ते खूप चांगले चालले आहे, असाच सर्वांचा समज झालेला दिसतोय. विरोधकांची भूमिका सत्ताधाऱ्यांनीच बजावली. त्यामुळे पार्टीविरोधी काम झाल्याचा शोध काहींनी लावला आहे. उलट पार्टीची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न होता, हे दिसलेले नाही.

सभागृहात हे सर्व झालेले असताना त्यासाठी स्वतंत्र पत्रव्यवहार करून नगराध्यक्षांनाही बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. नगराध्यक्षांनी सभागृहातच या प्रश्नाचे उत्तर देणे अपेक्षित होते. त्यासाठी स्वतंत्र पत्रव्यवहाराचीही गरज नव्हती. पण, खासदार उदयनराजेंच्या कानी लागणाऱ्यांनी डाव साधलेला आहे. एका बाजूला नगराध्यक्ष आणि दुसऱ्या बाजूला आण्णा लेवे दोघांनाही शह देण्याचा प्रयत्न झाला आहे. नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एकेकाला बाजूला करण्याचा प्रयत्न असल्याचेच दिसते. पण, यामुळे पार्टीची अडचण होणार हेदेखील समजून घेतले पाहिजे. आण्णांच्या जवळच्या लोकांना टेंडर मिळाले नाही. त्यामुळे आण्णांनी प्रशासनाला धारेवर धरले, असे म्हटले असले तरी याच नगरपालिकेत लाच घेताना अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. हेदेखील विसरून चालणार नाही. त्यामुळे प्रशासनावर कोणाचा तरी वचक असला पाहिजे, अशी भावना दिसते. त्यातून पार्टीला बदनाम करण्याचा उद्देश वाटत नाही. पण, तसा समज करून देण्याचा प्रयत्न झाल्याचे मात्र दिसते.

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्टी मजबूत करण्यासाठी अनेकांची गरज लागते. सर्वांनी एकत्र येऊन सामोरे गेले तर पुढच्यांना संधी मिळत नाही. मात्र, आत्ताच फाटाफूट व्हायला लागली तर मागचे दिवस पुढे यायला वेळ लागणार नाही. सत्ताधारी असो किंवा विरोधक चुकीचे काम होऊच नये, हा प्रत्येक नगरसेवकाचा दंडक असलाच पाहिजे. त्याशिवाय प्रशासनावर वचक राहात नाही. विद्यमान मुख्याधिकारीदेखील सर्वांना सोबत घेऊन काम करणारे आहेत. त्यामुळे त्यांचाही कोणावर रोष नाही. अशा परिस्थितीत कोणावरही वैयक्तिक आरोप करत बसण्यापेक्षा सध्याच्या स्थितीत जास्तीत जास्त कामे करून सातारकरांना एका चांगल्या शहरात राहण्याचा आनंद देण्याची आवश्यकता आहे. भविष्यात साताऱ्यात समाविष्ट होणाऱ्या भागालाही हेच समाधान मिळाले पाहिजे.

आण्णा तुमचे चुकलेच...

नगरपालिकेत होत असलेल्या कामाबाबत सभागृहात प्रश्न विचारणे, ही काय कामाची पद्धत झाली का... तुम्ही त्यांना वैयक्तिक विचारले असते तर दोघांचाही फायदा झाला असता. त्यामुळे सभागृहात प्रश्न विचारून आण्णा हे तुम्ही काय साध्य केले. वैयक्तिक टीका आणि पार्टीचा दोष... त्यामुळे तुमचे हे चुकलेच.