शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

सत्ताधारी झाले विरोधक... अन् विरोधक आनंदले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST

सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण ऑनलाईन सभेची लाईनच चुकली. सभागृहात झालेल्या आरोप प्रत्यारोपावर सभागृहातच चर्चा झाली पाहिजे. पण, स्वत:ला तज्ज्ञ म्हणविणाऱ्या ...

सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण ऑनलाईन सभेची लाईनच चुकली. सभागृहात झालेल्या आरोप प्रत्यारोपावर सभागृहातच चर्चा झाली पाहिजे. पण, स्वत:ला तज्ज्ञ म्हणविणाऱ्या अनेकांना याचा विसरच पडलेला दिसतोय. साप साप म्हणून भुई धोपटणाऱ्यांना आपला माणूसच फुटल्याचा साक्षात्कार झाला. पण, त्यानिमित्ताने प्रशासनातील कोणी दोषी असेल तर त्यालाही शोधले पाहिजे, असे वाटले नाही. मग, ही सर्वांचीच मिलिभगत आहे का, असा प्रश्नही उपस्थित होतो.

कोरोनाच्या काळात केल्या गेलेल्या खरेदीबाबत नगरसेवक आण्णा लेवे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. प्रशासनातील चुकीच्या कामाबाबत हा आक्षेप होता. पालिकेत काही चुकीचे चालले असेल तर त्याबाबत विचारणा करण्याचा अधिकार नगरसेवकांना आहे. तोही सत्ताधारी हिरावून घेणार आहेत का, असा प्रश्न पडतो आहे. कोणी काहीही विचारायचे नाही. जे चालले आहे ते खूप चांगले चालले आहे, असाच सर्वांचा समज झालेला दिसतोय. विरोधकांची भूमिका सत्ताधाऱ्यांनीच बजावली. त्यामुळे पार्टीविरोधी काम झाल्याचा शोध काहींनी लावला आहे. उलट पार्टीची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न होता, हे दिसलेले नाही.

सभागृहात हे सर्व झालेले असताना त्यासाठी स्वतंत्र पत्रव्यवहार करून नगराध्यक्षांनाही बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. नगराध्यक्षांनी सभागृहातच या प्रश्नाचे उत्तर देणे अपेक्षित होते. त्यासाठी स्वतंत्र पत्रव्यवहाराचीही गरज नव्हती. पण, खासदार उदयनराजेंच्या कानी लागणाऱ्यांनी डाव साधलेला आहे. एका बाजूला नगराध्यक्ष आणि दुसऱ्या बाजूला आण्णा लेवे दोघांनाही शह देण्याचा प्रयत्न झाला आहे. नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एकेकाला बाजूला करण्याचा प्रयत्न असल्याचेच दिसते. पण, यामुळे पार्टीची अडचण होणार हेदेखील समजून घेतले पाहिजे. आण्णांच्या जवळच्या लोकांना टेंडर मिळाले नाही. त्यामुळे आण्णांनी प्रशासनाला धारेवर धरले, असे म्हटले असले तरी याच नगरपालिकेत लाच घेताना अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. हेदेखील विसरून चालणार नाही. त्यामुळे प्रशासनावर कोणाचा तरी वचक असला पाहिजे, अशी भावना दिसते. त्यातून पार्टीला बदनाम करण्याचा उद्देश वाटत नाही. पण, तसा समज करून देण्याचा प्रयत्न झाल्याचे मात्र दिसते.

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्टी मजबूत करण्यासाठी अनेकांची गरज लागते. सर्वांनी एकत्र येऊन सामोरे गेले तर पुढच्यांना संधी मिळत नाही. मात्र, आत्ताच फाटाफूट व्हायला लागली तर मागचे दिवस पुढे यायला वेळ लागणार नाही. सत्ताधारी असो किंवा विरोधक चुकीचे काम होऊच नये, हा प्रत्येक नगरसेवकाचा दंडक असलाच पाहिजे. त्याशिवाय प्रशासनावर वचक राहात नाही. विद्यमान मुख्याधिकारीदेखील सर्वांना सोबत घेऊन काम करणारे आहेत. त्यामुळे त्यांचाही कोणावर रोष नाही. अशा परिस्थितीत कोणावरही वैयक्तिक आरोप करत बसण्यापेक्षा सध्याच्या स्थितीत जास्तीत जास्त कामे करून सातारकरांना एका चांगल्या शहरात राहण्याचा आनंद देण्याची आवश्यकता आहे. भविष्यात साताऱ्यात समाविष्ट होणाऱ्या भागालाही हेच समाधान मिळाले पाहिजे.

आण्णा तुमचे चुकलेच...

नगरपालिकेत होत असलेल्या कामाबाबत सभागृहात प्रश्न विचारणे, ही काय कामाची पद्धत झाली का... तुम्ही त्यांना वैयक्तिक विचारले असते तर दोघांचाही फायदा झाला असता. त्यामुळे सभागृहात प्रश्न विचारून आण्णा हे तुम्ही काय साध्य केले. वैयक्तिक टीका आणि पार्टीचा दोष... त्यामुळे तुमचे हे चुकलेच.