शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चातील अ‍ॅट्रॉसिटी मागणीला विरोध

By admin | Updated: September 18, 2016 00:06 IST

समविचारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय : वेळप्रसंगी विरोधात ठामपणे उभे राहणार

सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन हितांच्या विचारांचे आणि बहुजनांचे पालक होते. त्यामुळे छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात जातीयवाद्यांना थारा दिला जाणार नाही. हिंदू कोड बिल आणि मंडल आयोगाला विरोध व कोपर्डीचा भावनिक विषय करून अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टला विरोध करणाऱ्या जातीय मानसिकता असणाऱ्यांचा साताऱ्यात मोर्चा निघत आहे. एकजातीय मराठा क्रांती मोर्चास आमचा विरोधच राहणार आहे,’ असे स्पष्ट मत चंद्रकांत खंडाईत यांनी व्यक्त केले. सातारा येथे समविचारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी लक्ष्मण माने, पार्थ पोळके, अ‍ॅड. वर्षा देशपांडे, अशोक गायकवाड, भगवान अवघडे, अमर गायकवाड यांच्यासह पुरोगामी पक्ष संघटनांचे जिल्हा प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. खंडाईत म्हणाले, ‘कुणबी मराठा समाज्याच्या मागणीला कोणाचा विरोध नाही. औरंगाबादसह इतर ठिकाणी आरक्षणासोबतच पुरंदरेंना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्या, ही मागणी करण्यात आली आहे. बहुजन मराठा समाज आहे त्यांना कुणबी म्हणून शासन स्तरावर आरक्षण दिले. त्यासंबंधी कोणत्या राजकारण्यांनी राजकारण केले, या सगळ्या गोष्टी अलिप्त ठेवून जातीयवादाचे बीज पेरले जात आहे.’ ‘त्याचवेळी जातीवाद करणाऱ्यांना आमचा कडाडून विरोध राहणार आहे. तसा प्रयत्न कोण करत असेल तर त्या विरोधात तेवढ्याच ताकदीने आम्ही रस्त्यावर उतरू. बहुजन समाजातील छोट्या घटकांनी दबून राहू नये. जातीयवादी लोकांच्या कोणत्याही विचाराला जिल्ह्यात थारा दिला जाणार नाही. वेळप्रसंगी त्यांच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे राहू,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. लक्ष्मण माने म्हणाले, ‘अ‍ॅट्रॉसिटी कायदा हा केंद्र सरकारच्या अखत्यारितीतील विषय आहे. त्याबाबत मराठा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सभागृहात बोलण्याची गरज असताना आज मराठा समाज ज्या पद्धतीने या कायद्याची मागणी करत आहेत. त्या मानसिकतेला आमचा विरोध आहे. याबाबत चिंता व्यक्त करून समाजामध्ये तेढ वाढू नये म्हणून कार्यकर्त्यांनी संयम पाळावा.’पार्थ पोळके म्हणाले, ‘कोपर्डीच्या प्रकरणाचे भांडवल करून अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टबाबत चुकीचा गवगवा चालू आहे. सातारा जिल्ह्यात ५ वर्षीय बालिकेवर अमानुष अत्याचार झाला. त्याबाबत मात्र मराठा समाजाने साधा निषेध मोर्चाही काढला नाही.’ अशोक गायकवाड म्हणाले, ‘जो वर्ग गरिबीने पिचलेला आहे, त्यासाठी शासनस्तरावर त्यांना आरक्षण देण्यासाठी आमचा पाठिंबा आहे. मात्र, महाराष्ट्रात मोर्चे निघत असताना दलितविरोधी धोरण कोणी राबविण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला ही जशास तसे उत्तर द्यावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रमाणे आम्ही भारतीय आहोत; पण आम्हाला कोण डिवचत असेल तर आम्ही अशा प्रवृतींचा बंदोबस्त करू. संघर्ष आम्हाला नवा नाही. संघर्षातून दलितांनी आतापर्यंत इतिहास रचला आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याला विरोध करणाऱ्यांना आम्ही थारा देणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनीकेला.’ अ‍ॅड. देशपांडे म्हणाल्या, ‘कोपर्डीच्या गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेची मागणी करत असताना मात्र खैरलांजी प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी या दृष्टिकोनातून मोर्चेकरांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. कार्यकर्त्यांनी संयमाने पुढील दिशा ठरवावी.’ (प्रतिनिधी) गायकवाड, खंडाईत यांना सर्वाधिकार...यावेळी अनेक मान्यवरांनी भूमिका मांडताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली मते नोंदविली. तसेच येत्या चार दिवसांत पुन्हा बैठक बोलविण्यात आली आहे. यापुढील बैठकीचे नियोजन आणि सर्वाधिकार अशोक गायकवाड आणि चंद्र्रकांत खंडाईत यांना एकमुखी बहाल करण्यात आले.