शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मोर्चातील अ‍ॅट्रॉसिटी मागणीला विरोध

By admin | Updated: September 18, 2016 00:06 IST

समविचारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय : वेळप्रसंगी विरोधात ठामपणे उभे राहणार

सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन हितांच्या विचारांचे आणि बहुजनांचे पालक होते. त्यामुळे छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात जातीयवाद्यांना थारा दिला जाणार नाही. हिंदू कोड बिल आणि मंडल आयोगाला विरोध व कोपर्डीचा भावनिक विषय करून अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टला विरोध करणाऱ्या जातीय मानसिकता असणाऱ्यांचा साताऱ्यात मोर्चा निघत आहे. एकजातीय मराठा क्रांती मोर्चास आमचा विरोधच राहणार आहे,’ असे स्पष्ट मत चंद्रकांत खंडाईत यांनी व्यक्त केले. सातारा येथे समविचारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी लक्ष्मण माने, पार्थ पोळके, अ‍ॅड. वर्षा देशपांडे, अशोक गायकवाड, भगवान अवघडे, अमर गायकवाड यांच्यासह पुरोगामी पक्ष संघटनांचे जिल्हा प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. खंडाईत म्हणाले, ‘कुणबी मराठा समाज्याच्या मागणीला कोणाचा विरोध नाही. औरंगाबादसह इतर ठिकाणी आरक्षणासोबतच पुरंदरेंना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्या, ही मागणी करण्यात आली आहे. बहुजन मराठा समाज आहे त्यांना कुणबी म्हणून शासन स्तरावर आरक्षण दिले. त्यासंबंधी कोणत्या राजकारण्यांनी राजकारण केले, या सगळ्या गोष्टी अलिप्त ठेवून जातीयवादाचे बीज पेरले जात आहे.’ ‘त्याचवेळी जातीवाद करणाऱ्यांना आमचा कडाडून विरोध राहणार आहे. तसा प्रयत्न कोण करत असेल तर त्या विरोधात तेवढ्याच ताकदीने आम्ही रस्त्यावर उतरू. बहुजन समाजातील छोट्या घटकांनी दबून राहू नये. जातीयवादी लोकांच्या कोणत्याही विचाराला जिल्ह्यात थारा दिला जाणार नाही. वेळप्रसंगी त्यांच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे राहू,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. लक्ष्मण माने म्हणाले, ‘अ‍ॅट्रॉसिटी कायदा हा केंद्र सरकारच्या अखत्यारितीतील विषय आहे. त्याबाबत मराठा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सभागृहात बोलण्याची गरज असताना आज मराठा समाज ज्या पद्धतीने या कायद्याची मागणी करत आहेत. त्या मानसिकतेला आमचा विरोध आहे. याबाबत चिंता व्यक्त करून समाजामध्ये तेढ वाढू नये म्हणून कार्यकर्त्यांनी संयम पाळावा.’पार्थ पोळके म्हणाले, ‘कोपर्डीच्या प्रकरणाचे भांडवल करून अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टबाबत चुकीचा गवगवा चालू आहे. सातारा जिल्ह्यात ५ वर्षीय बालिकेवर अमानुष अत्याचार झाला. त्याबाबत मात्र मराठा समाजाने साधा निषेध मोर्चाही काढला नाही.’ अशोक गायकवाड म्हणाले, ‘जो वर्ग गरिबीने पिचलेला आहे, त्यासाठी शासनस्तरावर त्यांना आरक्षण देण्यासाठी आमचा पाठिंबा आहे. मात्र, महाराष्ट्रात मोर्चे निघत असताना दलितविरोधी धोरण कोणी राबविण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला ही जशास तसे उत्तर द्यावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रमाणे आम्ही भारतीय आहोत; पण आम्हाला कोण डिवचत असेल तर आम्ही अशा प्रवृतींचा बंदोबस्त करू. संघर्ष आम्हाला नवा नाही. संघर्षातून दलितांनी आतापर्यंत इतिहास रचला आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याला विरोध करणाऱ्यांना आम्ही थारा देणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनीकेला.’ अ‍ॅड. देशपांडे म्हणाल्या, ‘कोपर्डीच्या गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेची मागणी करत असताना मात्र खैरलांजी प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी या दृष्टिकोनातून मोर्चेकरांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. कार्यकर्त्यांनी संयमाने पुढील दिशा ठरवावी.’ (प्रतिनिधी) गायकवाड, खंडाईत यांना सर्वाधिकार...यावेळी अनेक मान्यवरांनी भूमिका मांडताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली मते नोंदविली. तसेच येत्या चार दिवसांत पुन्हा बैठक बोलविण्यात आली आहे. यापुढील बैठकीचे नियोजन आणि सर्वाधिकार अशोक गायकवाड आणि चंद्र्रकांत खंडाईत यांना एकमुखी बहाल करण्यात आले.