शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
3
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
4
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
5
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
6
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
7
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
8
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
9
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
10
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
11
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
12
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
13
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
14
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
15
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
16
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
17
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
18
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
19
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
20
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना

विरोधक म्हणतात...जुन्याच कढीला ऊत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:42 IST

सातारा : राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यातील विकासकामांना मोठा निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र, जुन्याच प्रकल्पांच्या घोषणा करून शासनाने जुन्या ...

सातारा : राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यातील विकासकामांना मोठा निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र, जुन्याच प्रकल्पांच्या घोषणा करून शासनाने जुन्या कढीला ऊत दिला आहे, अशी टीका विरोधक करत आहेत तर जिल्ह्यातील विकासकामांना निश्चितपणे गती मिळेल, असा दावा सत्ताधारी करत आहेत.

अर्थसंकल्पाबाबत दिलेल्या प्रतिक्रियेत आमदार जयकुमार गोरे म्हणाले की, जिल्ह्यासाठी कोणतीही तरतूद या पर्यटस्थळांना पैसे देण्यासाठी प्रस्तावित केलेली नाही. जुन्या मंदिरांसाठी पैसे दिले जाणार आहेत. मात्र, सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर येथील मंदिर, औंधची यमाई, वाईचा महागणपती आदी देवस्थानांसाठी निधीची तरतूद झालेली नाही. सातारा जिल्ह्याला शेतकऱ्यांसाठी तरतूद होणे अपेक्षित होते. ते झालेले नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत असताना नवीन कोणतीही घोषणा केलेली नाही. केंद्राच्या ज्या योजना आहेत, त्यांना स्वत:च्या नावावर खपवण्याचा उद्योग सुरू आहे. मुंबईच्या धर्तीवर दुष्काळी भागात इंडस्ट्रीयल कॉरिडॉर करणार होते, त्याचं काय झालं? शासकीय हॉस्पिटलमध्ये स्टाफ नाही. परीक्षा घेतल्या तरी अनेक लोक बेकार आहेत. त्यांना बेकार भत्ता द्यायला हवा होता, तोही दिलेला नाही. जिल्हा परिषद शाळा, शासकीय इमारती पुनर्बांधणीची आवश्यकता होती. ३ हजार कोटींचा आराखडा तयार करण्याचं काम हाती घेणार आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा नाही, असे मत गोरे यांनी व्यक्त केले.

याउलट राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे नेते मंडळी अर्थसंकल्पाबाबत समाधानी आहेत.

कोट

सातारा जिल्ह्यातील शेतकरी, बेरोजगार तसेच जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसाठी मोठ्या निधीची तरतूद या अर्थसंकल्पात होणे अपेक्षित होते. मात्र, या शासनाने ते केलेले नाही. उलट ज्या गोष्टी पूर्वीच मंजूर केलेल्या आहेत, त्यांच योजनांची पुन्हा घोषणा करून काय साधणार आहे? रुग्णालयांमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग नाही, त्यासाठी ज्यांच्या परीक्षा घेतल्या त्यांना नेमणूक दिली जात नाही. शाळा, शासकीय कार्यालयांची पडझड याकडेही दुर्लक्ष केलेले आहे.

- आमदार जयकुमार गोरे

कोट

सर्वसामान्यांसाठी हा अर्थसंकल्प नाही. जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात, त्यांना कर्जमाफी देणार होते, ते केले नाही. वर्षभरातील वाटचाल पाहिली तर बोलायचं जास्त करायचं काहीच नाही, असे चित्र बघायला मिळाले आहे. सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना फायदा होईल, असं वाटत नाही. लोकांना निराश करणारा हा अर्थसंकल्प आहे.

- विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, भाजप