शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सात गावांसाठी तलाठी मात्र एकच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:38 IST

शेंद्रे : सातारा तालुक्यातील शेंद्रे महसुली मंडलात येणाऱ्या सात गावांचा भार एक वर्षापासून एकाच तलाठ्यावर आहे. परिणामी या गावातील ...

शेंद्रे : सातारा तालुक्यातील शेंद्रे महसुली मंडलात येणाऱ्या सात गावांचा भार एक वर्षापासून एकाच तलाठ्यावर आहे. परिणामी या गावातील शेतकरी व ग्रामस्थांची महसुली कामे रखडली आहेत. प्रशासनाने ग्रामस्थांची गैरसोय थांबविण्यासाठी तत्काळ ‘एक सजा, एक तलाठी’ची नेमणूक करावी, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सोनगाव तर्फ सातारा, शेळकेवाडी, आष्टे, कुमठे, भाटमरळी, मापरवाडी, शेरेवाडी या गावांचा भार एकाच तलाठ्यावर आहे. त्यामुळे या सात गावांत महसुली काम करताना तलाठी, कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या गावांतील शेतकरी व ग्रामस्थांना सात-बारा उतारा, विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले, फेरफार नोंदी, दस्त नोंदणी, वारस नोंदणी, संगणकीकृत उतारे मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. सात-बारा उतारे घेण्यासाठी लोकांना चार ते पाच किलोमीटरचा प्रवास करून, तलाठी ज्या गावात असतील, त्या गावात जाऊन उतारे घ्यावे लागत आहेत.

महसुली कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने लोकांना महसुली कामकाज करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने परिसरातील लोकांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन शेंद्रे मंडलात एक सजा एक तलाठी नियुक्त करून लोकांना होणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

चौकट

भाटमरळी सजाचे दप्तर दोन ठिकाणी

शेंद्रे मंडलातील भाटमरळी सजाचा अतिरिक्त कार्यभार सोनगाव तर्फ साताराच्या तलाठ्यांना दिला आहे. भाटमरळी सजाचे महसुली दफ्तर दोन ठिकाणी असल्याने काम करताना तलाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. भाटमरळी महसुली सजाला नवीन तलाठी मिळाल्यास भाटमरळी, कुमठे, शेरेवाडी, मापरवाडी या गावांतील ग्रामस्थांची महसुली कामे तात्काळ होण्यास मदत होईल. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन भाटमरळी महसुली सजास कायमस्वरूपी तलाठी द्यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे.

चौकट

पूर्णवेळ तलाठी उपलब्ध होत नसल्याने महसूल विभागाशी संबंधित योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येत नाही. त्यामुळे गावाच्या विकास कामांवर परिणाम होत आहे. प्रशासनाने शेंद्रे मंडलात तलाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी.

- संतोष शेळके,

माजी सरपंच, शेळकेवाडी.

फोटो :

१५शेंद्रे-तलाठी

सातारा तालुक्यातील गावात तलाठीच नसल्याने कार्यालय बंद असते. (छाया : सागर नावडकर)