शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अत्यंविधीला आली केवळ मूठभर माणसं!

By admin | Updated: June 16, 2014 12:20 IST

डबेवाडी येथे चार दिवसांपूर्वी विकास पवार या तरुणाचा खून झाला. त्याचे पडसाद बोगदा परिसरासह डबेवाडीतही उमटले आहेत. या घटनेला तब्बल ९७ तास उलटून गेले तरी गाव दहशतीच्या सावटाखाली वावरत आहे.

परळी : डबेवाडी येथे चार दिवसांपूर्वी विकास पवार या तरुणाचा खून झाला. त्याचे पडसाद बोगदा परिसरासह डबेवाडीतही उमटले आहेत. या घटनेला तब्बल ९७ तास उलटून गेले तरी गाव दहशतीच्या सावटाखाली वावरत आहे. एवढेच नव्हे तर गावातील एका वृद्धाचा आज (रविवारी) मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीलाही नातेवाइकांसह काही मोजकेच लोक उपस्थित राहिले. तर गावातील युवक, पाहुणेमंडळी इतर ठिकाणी अद्यापही गायब आहेत.
गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास विकास पवार (रा. मंगळवार पेठ, सातारा) याचा डबेवाडीत खून झाला. तेव्हापासून येथील युवक, दुकानदार, महिला, वयोवृद्ध दहशतीखाली वावरत आहेत. 
डबेवाडी हे वर्दळीचे ठिकाण. पण, सध्या सगळीकडे शुकशुकाट आहे. दरम्यान, रविवारी सकाळी गावातील एका वृद्धाचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीवर दहशतीचे सावट पसरले. केवळ २५ ते ३0 जण त्यांच्या अंत्यविधीला हजर होते. त्यामुळे अद्यापही गावात दहशत कायम आहे. बोगदा परिसरात काही वाहनचालकांची चौकशी केली जात असल्याची तक्रार आल्याने पोलिसांनीही तत्काळ बोगदा परिसर तसेच डबेवाडी गावात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. 
विकास पवार याच्या खून प्रकरणात असलेल्या दोन रिक्षा व त्यांच्या मालकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले होते. त्यांच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. सतीश माने याला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. २0 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर) विकास पवार 
खूनप्रकरण आम्हाला का त्रास?
■ या खून प्रकरणाशी कसलाही संबंध नसताना आमच्या गावातील मुलांना, नागरिकांना का त्रास दिला जात आहे? खुनातील संशयितांना अटक केली आहे ना? मग त्यांच्या शिक्षेसाठी कोर्टात जा, आम्हाला का त्रास देता. आमच्या गाड्या अडविता, विनाकारण लोकांना मारहाण करता, कशासाठी?, असा सवाल डबेवाडीकर उपस्थित करीत आहेत. गावात पाणी नाही
■ विकास पवार खून प्रकरणात संशयित सागर किर्वे हा डबेवाडी ग्रामपंचायतीत शिपाई आहे. गावात पिण्याचे पाणी सोडण्याचे काम त्याच्याकडे होते. त्याला अटक केल्यामुळे गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी गुपचूप विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे.
उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांमधील गुन्ह्यांचा आलेख वाढतोय. पण स्थानिक प्रशासन त्यावर लगाम लावण्यात अपयशी - अखिलेश प्रतापसिंह, काँग्रेस