शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नुसत्या घोषणांनी कामे होत नाहीत!

By admin | Updated: March 10, 2016 23:40 IST

प्रतापराव भोसले : यशवंत वारसा आळविताना भाजपवर टीका; राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ

कऱ्हाड : ‘देशाच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांचे योगदान मोठे आहे. राज्यातील सहकार चळवळीला पुढे नेण्याचे महत्त्वाचे काम चव्हाण यांनी केले. त्यांच्या विचारांची आज मोठ्याप्रमाणात गरज आहे. या सातारा जिल्ह्याने पाच मुख्यमंत्री राज्याला दिले आहेत. त्यांचे वारस आपण आहोत. ही परंपरा पुढे अशी टिकावी आमची भावना आहे. असे सांगत आजच्या सरकारकडून मोठ्या प्रमाणात विकासकामांच्या घोषणा केल्या जात आहेत. घोषणा केल्या म्हणजे कामे केली असे होत नाही,’ अशी अप्रत्येक्षपणे टीका भाजपचे नाव न घेता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी केली.स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समिती, सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय व शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गाडगे महाराज महाविद्यलायात आयोजित ‘यशवंतराव चव्हाण-विचार आणि वारसा’ या तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रास गुरुवारी प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. अशोक करांडे, बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील, डॉ. कन्हैय्या कुंदप, सुधीर एकांडे, प्राचार्य पी. टी. थोरात आदी उपस्थित होते.प्रतापराव भोसले म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण हे देशाचे संरक्षणमंत्री असताना त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. त्यांचे मोठ्या प्रमाणात विरोधकही होते. मात्र, यशवंतराव चव्हाण यांनी स्वत: कधीही विरोधकांना दुखवण्याचा प्रयत्न केला नाही. पूर्वीच्या काळ फार वेगळा होता. आत्ताचा काळ आणि राजकारणही मोठ्या प्रमाणात बदलले आहे. आज राजकारणात प्रामाणिक नेतृत्व उरले नाही. आत्ताचे सरकार हे नासमज आहे. त्यांच्याकडून शिक्षण व कारखाने, संस्थांना अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे.’अनंत दीक्षित म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले. त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार-उत्तरप्रदेश झाला नाही. त्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बदल घडवले. साहित्यिक, समाजसुधारकांनंतर समाजात बदल घडवू पाहणारे दुसरे कोणी असेल तर ते यशवंतराव चव्हाण होय.’प्रा. डॉ. अशोक करांडे यांनी प्रास्ताविक केले. कऱ्हाड जिमखान्याचे अध्यक्ष सुधीर एकांडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)आत्ताच्या राजकारण्यांना विमानाचा मोह..‘पूर्वीच्या काळी केंद्रात व राज्यातील राज्यकर्त्यांना विमानात बसण्यासाठी फार कमी संधी मिळत होती. त्याकाळी विमानात बसणाऱ्यांचेही प्रमाण फार कमी होते. मात्र, आत्ताच्या राज्यकर्त्यांना जराही संधी मिळाली की, त्यांचे पाय जमिनीला टेकतच नाहीत. तसेच बाहेरची हवाही त्यांना सहन होत नसल्याने ते विमानातून उतरतच नसल्याचे दिसून येते,’ असे काँगे्रसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी सांगितले.