शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

नुसत्या घोषणांनी कामे होत नाहीत!

By admin | Updated: March 10, 2016 23:40 IST

प्रतापराव भोसले : यशवंत वारसा आळविताना भाजपवर टीका; राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ

कऱ्हाड : ‘देशाच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांचे योगदान मोठे आहे. राज्यातील सहकार चळवळीला पुढे नेण्याचे महत्त्वाचे काम चव्हाण यांनी केले. त्यांच्या विचारांची आज मोठ्याप्रमाणात गरज आहे. या सातारा जिल्ह्याने पाच मुख्यमंत्री राज्याला दिले आहेत. त्यांचे वारस आपण आहोत. ही परंपरा पुढे अशी टिकावी आमची भावना आहे. असे सांगत आजच्या सरकारकडून मोठ्या प्रमाणात विकासकामांच्या घोषणा केल्या जात आहेत. घोषणा केल्या म्हणजे कामे केली असे होत नाही,’ अशी अप्रत्येक्षपणे टीका भाजपचे नाव न घेता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी केली.स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समिती, सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय व शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गाडगे महाराज महाविद्यलायात आयोजित ‘यशवंतराव चव्हाण-विचार आणि वारसा’ या तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रास गुरुवारी प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. अशोक करांडे, बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील, डॉ. कन्हैय्या कुंदप, सुधीर एकांडे, प्राचार्य पी. टी. थोरात आदी उपस्थित होते.प्रतापराव भोसले म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण हे देशाचे संरक्षणमंत्री असताना त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. त्यांचे मोठ्या प्रमाणात विरोधकही होते. मात्र, यशवंतराव चव्हाण यांनी स्वत: कधीही विरोधकांना दुखवण्याचा प्रयत्न केला नाही. पूर्वीच्या काळ फार वेगळा होता. आत्ताचा काळ आणि राजकारणही मोठ्या प्रमाणात बदलले आहे. आज राजकारणात प्रामाणिक नेतृत्व उरले नाही. आत्ताचे सरकार हे नासमज आहे. त्यांच्याकडून शिक्षण व कारखाने, संस्थांना अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे.’अनंत दीक्षित म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले. त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार-उत्तरप्रदेश झाला नाही. त्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बदल घडवले. साहित्यिक, समाजसुधारकांनंतर समाजात बदल घडवू पाहणारे दुसरे कोणी असेल तर ते यशवंतराव चव्हाण होय.’प्रा. डॉ. अशोक करांडे यांनी प्रास्ताविक केले. कऱ्हाड जिमखान्याचे अध्यक्ष सुधीर एकांडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)आत्ताच्या राजकारण्यांना विमानाचा मोह..‘पूर्वीच्या काळी केंद्रात व राज्यातील राज्यकर्त्यांना विमानात बसण्यासाठी फार कमी संधी मिळत होती. त्याकाळी विमानात बसणाऱ्यांचेही प्रमाण फार कमी होते. मात्र, आत्ताच्या राज्यकर्त्यांना जराही संधी मिळाली की, त्यांचे पाय जमिनीला टेकतच नाहीत. तसेच बाहेरची हवाही त्यांना सहन होत नसल्याने ते विमानातून उतरतच नसल्याचे दिसून येते,’ असे काँगे्रसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी सांगितले.