शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कानकात्रे तलावात फक्त मृत पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST

मायणी : मान्सून पूर्व व मान्सून हंगामामध्ये दमदार पाऊस न झाल्याने कानकात्रे येथील तलावात रोजी फक्त मृत पाणीसाठा शिल्लक ...

मायणी : मान्सून पूर्व व मान्सून हंगामामध्ये दमदार पाऊस न झाल्याने कानकात्रे येथील तलावात रोजी फक्त मृत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या तलावामध्ये उरमोडी व तारळी योजनांचे पाणी सोडण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. दमदार पाऊस झाला नाही तर पुढील हंगाम धोक्यात येऊ शकतो.

खटाव तालुक्याच्या पूर्व भागाला शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी १९७२ मध्ये कानकात्रे येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत लोकसहभागातून या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर रब्बी हंगामात या भागातील शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. शेतीला पाणी सोडण्यात आले. रब्बी हंगामातील पिके चांगली निघाली. अन्नधान्याचा प्रश्न मार्गी लागला त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. या कानकात्रे तलावामध्ये फक्त पावसाचे पाणी जमा होते. या तलाव भरण्यासाठी कोणतीही सिंचन योजना नाही. त्यामुळे या परिसरातून जाणारी उरमोडी व तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी या तलावात सोडण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

प्रत्येक तीन वर्षांनंतर या भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे शासनाने या तलावांमध्ये योजनांचे पाणी सोडण्याचे नियोजन करणे तितकेच गरजेचे आहे.

चौकट

परिसरातून जाणाऱ्या तारळी व उरमोडी योजनांचे पाणी या तलावात सोडण्याची व्यवस्था करावी या तलावात या योजनांचे पाणी आले तर या भागातील शेतजमीन बाराही महिने ओलिताखाली येईल. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागेल.

- अनिल सावंत

सामाजिक कार्यकर्ते कानकात्रे

चौकट

परिसरामध्ये कोणतीही उपसा सिंचन योजना परिसरातील सोळा गावांचा आजही पिण्याच्या पाण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाने या भागात नव्याने सर्वेक्षण करून तारळी व उरमोडीचे पाणी कशा पद्धतीने देता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

चौकट

जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर त्या भागातील सर्व लहान-मोठी धरणे पूर्ण क्षमतेने भरली नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आजही सुरू आहे. त्यामुळे हे नदीपात्रातून कर्नाटकात वाया जाणारे पाणी दुष्काळी खटाव तालुक्याच्या पूर्व भागाला सोडावे व या भागातील लहान-मोठे तलाव या पाण्याने भरून घ्यावे.

२६मायणी-कानकात्रे तलाव

कानकात्रे येथील तलाव पूर्ण कोरडा पडत असून यामध्ये फक्त मृत पाणीसाठा शिल्लक आहे. (छाया : संदीप कुंभार)