शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

मोबाइल अ‍ॅपद्वारे उसाची ऑनलाइन नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:13 IST

मरळीतील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची धुरा सांभाळणाऱ्या यशराज शंभुराज देसाई यांनी कारखाना प्रशासन आणि मशिनरी यामध्ये आमूलाग्र बदल ...

मरळीतील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची धुरा सांभाळणाऱ्या यशराज शंभुराज देसाई यांनी कारखाना प्रशासन आणि मशिनरी यामध्ये आमूलाग्र बदल करून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक अत्याधुनिक सुविधा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. यशराज देसाई यांनी नव्यानेच कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकरी यांच्या उसाची नोंदी ऑनलाइन अ‍ॅपद्वारे करण्याचा निर्णय घेतला. त्याचा प्रारंभही नुकताच करण्यात आला. दिवशी बुद्रुक येथील शेतकरी विवेक सूर्यवंशी यांच्या उसाच्या क्षेत्राला त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली आणि त्यांच्या ऊस क्षेत्राची थेट जागेवरच स्वत: ऑनलाइन नोंद केली.

कारखान्याने सुरू केलेल्या ऑनलाइन अ‍ॅपमुळे शेतकऱ्यांच्या उसाच्या क्षेत्राची ऑनलाइन नोंद ही कारखाना कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष जागेवर जाऊन घ्यावी लागणार आहे. ऑनलाइन पद्धतीमुळे ज्या क्षेत्राची नोंद केली आहे त्याचे क्षेत्रफळ बरोबर येणार आहे. परिणामी, ऊस तोडणी प्रोग्राम राबविताना अचूकता येणार असून शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार राहणार नाही, असा विश्वास यशराज देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील, कार्यकारी संचालक सुहास देसाई, विवेक सूर्यवंशी, दादासाहेब जाधव, संतोष डोंगरे, जालिंदर डोंगरे, बाबूराव सूर्यवंशी, प्रशांत चव्हाण, बाळासाहेब सूर्यवंशी, संदीप पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

फोटो : ०१केआरडी०४

कॅप्शन : दिवशी बुद्रूक, ता. पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्यासाठी यशराज देसाई यांच्या हस्ते मोबाइल अ‍ॅपद्वारे उसाची ऑनलाइन नोंद करण्यात आली.