शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कांद्यामुळं केलाय शेतकऱ्यांचा वांदा ! दर गडगडल्याने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:46 IST

म्हसवड : माण तालुक्यातील नगदी पीक म्हणून कांदा पीक येथील शेतकरी घेत असतात; पण गेल्या वर्षापासून कांद्याच्या दरात सतत उतारामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. उन्हाळी कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे.जून महिन्यात केलेल्या हळव्या कांद्याला चांगले दर मिळाल्याने बहुतांश शेतकरी वर्गाचा चांगला फायदा झाला होता. कांद्याचे ...

ठळक मुद्दे६०० रुपयांवर दर आल्याने कांदा उत्पादक अडचणीत

म्हसवड : माण तालुक्यातील नगदी पीक म्हणून कांदा पीक येथील शेतकरी घेत असतात; पण गेल्या वर्षापासून कांद्याच्या दरात सतत उतारामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. उन्हाळी कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे.

जून महिन्यात केलेल्या हळव्या कांद्याला चांगले दर मिळाल्याने बहुतांश शेतकरी वर्गाचा चांगला फायदा झाला होता. कांद्याचे दर भरमसाठ वाढल्याने कांदा उत्पादक शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागण केली होती. जून महिन्यापासून लागवड केलेला कांदा पीक अडीच महिन्यांत निघाल्यानंतर त्या कांद्याला चांगला दर मिळाल्याने अनेकांनी पुन्हा हळवा कांद्याची तर काहींनी उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. त्याही कांद्याना चांगले दर मिळाले होते. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कांद्याचे चांगले दर टिकून होते; मात्र उशिरा लागण केलेले व विसकटलेले कांदे निघण्यास उशीर झाल्याने एकाच वेळी आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर गडगडले. किमान दोन हजार रुपयांपर्यंत चाललेले दर अगदी पाचशे, सहाशेवर येऊन ठेपल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाला आहे. अनेकांनी दर गडगडल्याने पोत्यात कांदे भरून निवाºयाला ठेवले आहेत. तर काहींनी कांद्याच्या ऐरणी लावल्या आहेत. चांगले दर आल्यानंतर ते विक्रीसाठी नेऊ शकतात; मात्र त्याची विक्री होईपर्यंत त्यात काही प्रमाणात घट निश्चित होत असते. तर अनेकांनी कांदे शेतातच झाकून ठेवून दर वाढण्याची प्रतीक्षा करत आहेत.

कांदे भरताना मजुरी, पिशवी, भाडे, काही प्रमाणात हमाली असे एकूण एका क्विंटलला २०० रुपयांवर खर्च येत असतो. या व्यतिरिक्त कांद्याला बियाणापासून, खते, शेतीची मशागत, भांगलणी, काढणी, काटणी, पाणी यासाठी केलेला खर्च वेगळाच आहे.कांद्याला शासनाकडून किमान १,५०० रुपयाच्या वर हमीभाव मिळणे गरजेचे आहे. तरच शेतकरी वर्गाला कांदा पीक परवडणार आहे. आता कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.- बाळासाहेब माने, शेतकरी,म्हसवडकांद्याचे दर पडल्याने आम्ही साडेतीनशे पिशव्यांचे कांदे ऐरणी तयार करून त्यात ठेवले आहेत. १५ आॅगस्टच्या दरम्यान चांगले दर आले की त्या ऐरणी फोडून कांदे मार्केटला पाठवणार आहे.- सोमनाथ कवी, म्हसवड