शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कांद्यामुळं केलाय शेतकऱ्यांचा वांदा ! दर गडगडल्याने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:46 IST

म्हसवड : माण तालुक्यातील नगदी पीक म्हणून कांदा पीक येथील शेतकरी घेत असतात; पण गेल्या वर्षापासून कांद्याच्या दरात सतत उतारामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. उन्हाळी कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे.जून महिन्यात केलेल्या हळव्या कांद्याला चांगले दर मिळाल्याने बहुतांश शेतकरी वर्गाचा चांगला फायदा झाला होता. कांद्याचे ...

ठळक मुद्दे६०० रुपयांवर दर आल्याने कांदा उत्पादक अडचणीत

म्हसवड : माण तालुक्यातील नगदी पीक म्हणून कांदा पीक येथील शेतकरी घेत असतात; पण गेल्या वर्षापासून कांद्याच्या दरात सतत उतारामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. उन्हाळी कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे.

जून महिन्यात केलेल्या हळव्या कांद्याला चांगले दर मिळाल्याने बहुतांश शेतकरी वर्गाचा चांगला फायदा झाला होता. कांद्याचे दर भरमसाठ वाढल्याने कांदा उत्पादक शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागण केली होती. जून महिन्यापासून लागवड केलेला कांदा पीक अडीच महिन्यांत निघाल्यानंतर त्या कांद्याला चांगला दर मिळाल्याने अनेकांनी पुन्हा हळवा कांद्याची तर काहींनी उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. त्याही कांद्याना चांगले दर मिळाले होते. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कांद्याचे चांगले दर टिकून होते; मात्र उशिरा लागण केलेले व विसकटलेले कांदे निघण्यास उशीर झाल्याने एकाच वेळी आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर गडगडले. किमान दोन हजार रुपयांपर्यंत चाललेले दर अगदी पाचशे, सहाशेवर येऊन ठेपल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाला आहे. अनेकांनी दर गडगडल्याने पोत्यात कांदे भरून निवाºयाला ठेवले आहेत. तर काहींनी कांद्याच्या ऐरणी लावल्या आहेत. चांगले दर आल्यानंतर ते विक्रीसाठी नेऊ शकतात; मात्र त्याची विक्री होईपर्यंत त्यात काही प्रमाणात घट निश्चित होत असते. तर अनेकांनी कांदे शेतातच झाकून ठेवून दर वाढण्याची प्रतीक्षा करत आहेत.

कांदे भरताना मजुरी, पिशवी, भाडे, काही प्रमाणात हमाली असे एकूण एका क्विंटलला २०० रुपयांवर खर्च येत असतो. या व्यतिरिक्त कांद्याला बियाणापासून, खते, शेतीची मशागत, भांगलणी, काढणी, काटणी, पाणी यासाठी केलेला खर्च वेगळाच आहे.कांद्याला शासनाकडून किमान १,५०० रुपयाच्या वर हमीभाव मिळणे गरजेचे आहे. तरच शेतकरी वर्गाला कांदा पीक परवडणार आहे. आता कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.- बाळासाहेब माने, शेतकरी,म्हसवडकांद्याचे दर पडल्याने आम्ही साडेतीनशे पिशव्यांचे कांदे ऐरणी तयार करून त्यात ठेवले आहेत. १५ आॅगस्टच्या दरम्यान चांगले दर आले की त्या ऐरणी फोडून कांदे मार्केटला पाठवणार आहे.- सोमनाथ कवी, म्हसवड