शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात कांद्याच्या दरात उसळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याच्या दरात चढ-उतार सुरू असलातरी मागील आठवड्याच्या तुलनेत दरात जवळपास १३०० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याच्या दरात चढ-उतार सुरू असलातरी मागील आठवड्याच्या तुलनेत दरात जवळपास १३०० रुपयांनी वाढ झाली. सलग तीन दिवस क्विंटलला ३८०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून शेतीमाल येतो. सातारा, जावळी, कोरेगाव, खटाव, माण, वाई, फलटण या तालुक्यातून भाजीपाला येत असतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात शेतीमाल येतो. तर दर गुरुवार आणि रविवारी मालाची अधिक आवक होते. यामध्ये कांदा, बटाट्याची आवक जादा असते.

मागील तीन महिन्यांपूर्वी कांद्याचा क्विंटलचा दर साडेसहा हजारांपर्यंत पोहोचला होता, तर भाजी मंडई, दुकानात कांद्याची किरकोळ विक्री ७० ते ८० रुपये किलोने होत होती. पण, त्यानंतर कांद्याचा दर हळूहळू कमी झाला. बाजार समितीतही दर ढासळला. मात्र, दीड महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने कांदा निर्यातीवरील बंदी उठविण्याची घोषणा केल्यानंतर दरात थोडी सुधारणा झाली. दर चांगला मिळत असलातरी चढ-उतार सुरूच आहे.

मागील काही दिवसांत सातारा बाजार समितीत कांद्याला एक हजारांपासून ३५०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळत होता, पण बाजार समितीत नवीन कांद्याची आवक वाढल्याने भाव २,३०० रुपये क्विंटलपर्यंत खाली आला होता. यामुळे शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण होते. पण, मागील तीन दिवसांपासून दर ३८०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. गुरुवारी २१० क्विंटलची आवक झाली. याला १ हजारांपासून ३८०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

सातारा बाजार समितीत गुरुवारी ५७ वाहनांतून ५३९ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. आवक चांगली असलीतरी अजूनही अनेक भाज्यांना चांगला दर मिळत नसल्याचे समोर आले आहे. गवारचा दर तेजीत निघाला. गवारला दहा किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. तसेच शेवगा शेंगला ३०० ते ४०० भाव आला. वांग्याला १० किलोला १०० ते २०० रुपये दर मिळाला. टोमॅटो ५० ते ६०, कोबीला ३० ते ४० रुपये भाव आला. टमाटा व कोबीला दर अजूनही कमीच मिळत आहे, तर फ्लॉवरला १० किलोला ६० ते १२० अन् दोडक्याला २०० ते २५० रुपये दर आला.

बटाट्याला क्विंटलला ८०० पासून १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. हिरव्या मिरचीला क्विंटलला ३ ते ४ हजार रुपये भाव आला. आल्याला १ हजार ते १६०० रुपये दर मिळाला. लसणाला क्विंटलला २ ते ८ हजारांपर्यंत भाव आला. वाटाणा अजूनही स्वस्त आहे. ३२०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला.

चौकट :

पालेभाज्यांच्या दरात चढ-उतार

सातारा बाजार समितीत पालेभाज्यांची आवक चांगली होत आहे. पण, दरात सतत चढ-उतार सुरू आहे. गुरुवारी मेथीच्या १८०० पेंडीची आवक झाली. याला शेकडा ४०० ते ६०० रुपये दर मिळाला, तर कोथिंबीरची १७०० पेंडी आली. याला शेकडा दर अवघा ३०० ते ५०० रुपयांदरम्यान मिळाला. पालकला शेकडा २०० ते ४०० रुपये दर आला.

......................................................