शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

कांद्याचा दर पुन्हा गडगडला; क्विंटलला २५०० पर्यंत भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:37 IST

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असली, तरी दर मात्र गडगडला आहे. क्विंटलला २५०० रुपयांपर्यंत भाव ...

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असली, तरी दर मात्र गडगडला आहे. क्विंटलला २५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तर कोबी अन् वांगीही स्वस्तच आहेत. त्याचबरोबर डाळींचे भाव कडाडले असून, खाद्यतेलाच्या दरातही तेजी पाहायला मिळत आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. त्यानंतर भाजी मंडईत हा माल नेऊन विकला जातो. त्यामुळे दरात वाढ होत जाते.

सातारा बाजार समितीत रविवारी एकूण ४८१ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांद्याची ३०५ क्विंटलची आवक झाली. कांद्याला १ हजारापासून २५०० रुपयांपर्यंत भाव आला. वांग्याला १० किलोला अवघा ५० ते १०० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर टोमॅटोला १० किलोला ६० ते १००, कोबी ३० ते ४० रुपये, फ्लाॅवरला १०० ते १५०, दोडका ३०० ते ३५० आणि कारल्याला २५० ते ३०० रुपये दर आला.

तेलाच्या पाऊचमागे वाढ

मागील दोन महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर तेजीत आहेत. या आठवड्यातही तेलाच्या एक लिटरच्या पाऊचमागे सरासरी १० रुपयांची वाढ आहे. सूर्यफूल तेलाच्या पाऊचची किंमत १५० ते १६० रुपये झाली; तर सोयाबीन १२५ ते १३० आणि शेंगदाणा तेल पाऊचची किंमत १७० ते १८० आहे. तेल डब्यामागेही किरकोळ वाढ झालेली आहे.

कलिंगडे अनेक ठिकाणी

साताऱ्यात फळांची आवक चांगली आहे. अधिक करून कलिंगडाची आवक आणि विक्री जोरात आहे. शहरात अनेक ठिकाणी विक्री सुरू आहे.

गवार महाग...

बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर कमी झाले असले, तरी काहींचे टिकून आहेत. गवारला तर १० किलोला ४०० ते ६०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. त्यामुळे गवारची किरकोळ विक्री ८० रुपयांपर्यंत पोहोचली, तर ढबू, वाटाणा, भेंडी, पावटा, वालघेवडा यांचे दर स्थिर असल्याचे दिसून आले.

साताऱ्यात अनेक भाज्यांचे दर कमी झाले आहेत. मात्र, गवार, शेवगा यांचे दर अजूनही महागच वाटतात; तर गेल्या आठवड्यात ५० रुपयांवर गेलेला कांदा आता ३० रुपयांपर्यंत खाली आला आहे.

- सीताराम पवार, ग्राहक

खाद्यतेलाच्या दरात सतत वाढ होत चालली आहे. याला कारण, पाश्चात मार्केट. या आठवड्यात तेलाच्या एक लिटरच्या पाऊचमागे १० रुपयांपर्यंत वाढ आहे. तसेच तेलडब्यामागेही वाढ आहे.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

सातारा बाजार समितीत कांद्याच्या दरात पुन्हा उतार आला आहे. त्यामुळे केलेला खर्च कसाबसा मिळेल. पण, इतर पालेभाज्यांचे दरही कमी आहेत. यामुळे नुकसानच होत आहे.

- दिनकर पाटील, शेतकरी