शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचा दर पुन्हा गडगडला; क्विंटलला २५०० पर्यंत भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:37 IST

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असली, तरी दर मात्र गडगडला आहे. क्विंटलला २५०० रुपयांपर्यंत भाव ...

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असली, तरी दर मात्र गडगडला आहे. क्विंटलला २५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तर कोबी अन् वांगीही स्वस्तच आहेत. त्याचबरोबर डाळींचे भाव कडाडले असून, खाद्यतेलाच्या दरातही तेजी पाहायला मिळत आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. त्यानंतर भाजी मंडईत हा माल नेऊन विकला जातो. त्यामुळे दरात वाढ होत जाते.

सातारा बाजार समितीत रविवारी एकूण ४८१ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांद्याची ३०५ क्विंटलची आवक झाली. कांद्याला १ हजारापासून २५०० रुपयांपर्यंत भाव आला. वांग्याला १० किलोला अवघा ५० ते १०० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर टोमॅटोला १० किलोला ६० ते १००, कोबी ३० ते ४० रुपये, फ्लाॅवरला १०० ते १५०, दोडका ३०० ते ३५० आणि कारल्याला २५० ते ३०० रुपये दर आला.

तेलाच्या पाऊचमागे वाढ

मागील दोन महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर तेजीत आहेत. या आठवड्यातही तेलाच्या एक लिटरच्या पाऊचमागे सरासरी १० रुपयांची वाढ आहे. सूर्यफूल तेलाच्या पाऊचची किंमत १५० ते १६० रुपये झाली; तर सोयाबीन १२५ ते १३० आणि शेंगदाणा तेल पाऊचची किंमत १७० ते १८० आहे. तेल डब्यामागेही किरकोळ वाढ झालेली आहे.

कलिंगडे अनेक ठिकाणी

साताऱ्यात फळांची आवक चांगली आहे. अधिक करून कलिंगडाची आवक आणि विक्री जोरात आहे. शहरात अनेक ठिकाणी विक्री सुरू आहे.

गवार महाग...

बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर कमी झाले असले, तरी काहींचे टिकून आहेत. गवारला तर १० किलोला ४०० ते ६०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. त्यामुळे गवारची किरकोळ विक्री ८० रुपयांपर्यंत पोहोचली, तर ढबू, वाटाणा, भेंडी, पावटा, वालघेवडा यांचे दर स्थिर असल्याचे दिसून आले.

साताऱ्यात अनेक भाज्यांचे दर कमी झाले आहेत. मात्र, गवार, शेवगा यांचे दर अजूनही महागच वाटतात; तर गेल्या आठवड्यात ५० रुपयांवर गेलेला कांदा आता ३० रुपयांपर्यंत खाली आला आहे.

- सीताराम पवार, ग्राहक

खाद्यतेलाच्या दरात सतत वाढ होत चालली आहे. याला कारण, पाश्चात मार्केट. या आठवड्यात तेलाच्या एक लिटरच्या पाऊचमागे १० रुपयांपर्यंत वाढ आहे. तसेच तेलडब्यामागेही वाढ आहे.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

सातारा बाजार समितीत कांद्याच्या दरात पुन्हा उतार आला आहे. त्यामुळे केलेला खर्च कसाबसा मिळेल. पण, इतर पालेभाज्यांचे दरही कमी आहेत. यामुळे नुकसानच होत आहे.

- दिनकर पाटील, शेतकरी