शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

सततच्या पावसाने कांदा रोपांना मूळकुज, बुरशीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुसेगाव : रब्बी हंगामात कांद्याची लागवड करण्यासाठी नियोजनानुसार शेतकऱ्यांनी गेले पंधरा-वीस दिवसांपूर्वी आपल्या शेतात कांद्याच्या रोपाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुसेगाव : रब्बी हंगामात कांद्याची लागवड करण्यासाठी नियोजनानुसार शेतकऱ्यांनी गेले पंधरा-वीस दिवसांपूर्वी आपल्या शेतात कांद्याच्या रोपाची (तराव) निर्मिती करण्यासाठी कांद्याचे बी टाकले आहे. यापासून रोपे उगवून आली असली, तरी मूळकुज व बुरशीमुळे ती रोपे जळून जात आहेत. स्वतःचे कांद्याचे रोप असावे म्हणून काही शेतकऱ्यांनी अत्यंत मोलामहागाईचे कांद्याचे बी विकत आणून आपल्या शेतात टाकले असून, त्याची जपणूक करताना शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

खरिपाची सुगी झाल्यानंतर मोकळ्या असलेल्या शेतात कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्याचा कल असतो. तसेच गेल्यावर्षीच्या कांद्याला चांगला दर मिळाल्याने शेतकरी कांदा लागवडीवर भर देत आहेत. काही शेतकऱ्यांनी स्वतःचे कांदा बी, तर काहीजणांनी बी विकत आणून त्यापासून कांदा रोपे तयार करण्यास सुरुवात केली आहे. सध्या एककिलो कांद्याच्या बीचा भाव चार ते पाच हजार रुपये आहे, तर एक एकर कांद्याची लागवड करण्यासाठी सुमारे साडेतीन ते चार किलो बी टाकणे गरजेचे असते. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिके निघण्याच्या नियोजनानुसार कांद्याची रोपे (तराव) टाकली आहेत. मात्र, सततच पाऊस व खराब हवामानामुळे कांद्याचे तराव (रोपे) मूळकुज व बुरशी रोगामुळे जागेवरच जळून जात आहेत. वारंवार रोपांवर औषधांची फवारणी करूनदेखील तराव जळून जात असून, टाकलेल्या चार किलो बीच्या तरावात एकरभर लागण्याऐवजी जेमतेम १० ते १५ गुंठे क्षेत्र कांदा लागण होत आहे. एवढे कष्ट घेऊनही शेतात टाकलेले ‘तराव तरत’ नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तराव (कांद्याचे रोप) किमान सव्वा ते दीड महिन्याचे झाल्यानंतर त्याची शेतात लागवड केली जाते. मात्र तराव वाढवतानाच शेतकऱ्यांना फारच आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यानंतर एक एकर कांदा लागण करण्यासाठी शेतमजूर (रोजगारी ) आठ ते नऊ हजार रुपये घेत आहेत. पुढे-पुढे खते, औषधे, अंतर्गत मशागतीचा प्रचंड खर्च शेतकऱ्यांना सहन करावा लागत असतो. म्हणजे शेतकऱ्याने एकरी सुमारे ५० ते ६० हजार रुपये खर्चून उत्पादित केलेल्या कांद्याच्या पिकाच्या दराची शेवटी शाश्वती नसते. त्यामुळे शेतकरी वर्गातून कांदा पिकाबाबत चिंता वाढू लागली आहे.

कोट..

गेल्या काही दिवसांपासून उगवलेल्या कांद्याच्या तरावाला पोषक वातावरण मिळत नसल्याने रोपे जागेवरच जळून जात आहेत. रोपाला लागवडीयोग्य करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक त्रासाबरोबर फार कष्ट घ्यावे लागत आहेत. कांद्यासाठी ठेवलेले क्षेत्र स्वतःच्या तरावाने पूर्ण होत नसल्याने इतर ठिकाणांहून कांद्याचे तराव आणावे लागत आहे. मात्र, त्याचा दर सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याने काही शेतकरी स्वतःकडे आहे तेवढ्यावरच कांदा लागवड करत आहेत.

- अविनाश रणसिंग, रणसिंगवाडी

फोटो-

१८पुसेगाव

कांद्याच्या तरावाला बुरशी व मूळकुज रोगावरील औषधांची फवारणी सातत्याने करून कांद्याची रोपे लागवडीयोग्य करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत.