शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
7
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
8
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
9
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
10
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
11
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
12
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
13
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
14
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
15
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
16
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
17
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
18
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
19
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
20
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!

सततच्या पावसाने कांदा रोपांना मूळकुज, बुरशीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुसेगाव : रब्बी हंगामात कांद्याची लागवड करण्यासाठी नियोजनानुसार शेतकऱ्यांनी गेले पंधरा-वीस दिवसांपूर्वी आपल्या शेतात कांद्याच्या रोपाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुसेगाव : रब्बी हंगामात कांद्याची लागवड करण्यासाठी नियोजनानुसार शेतकऱ्यांनी गेले पंधरा-वीस दिवसांपूर्वी आपल्या शेतात कांद्याच्या रोपाची (तराव) निर्मिती करण्यासाठी कांद्याचे बी टाकले आहे. यापासून रोपे उगवून आली असली, तरी मूळकुज व बुरशीमुळे ती रोपे जळून जात आहेत. स्वतःचे कांद्याचे रोप असावे म्हणून काही शेतकऱ्यांनी अत्यंत मोलामहागाईचे कांद्याचे बी विकत आणून आपल्या शेतात टाकले असून, त्याची जपणूक करताना शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

खरिपाची सुगी झाल्यानंतर मोकळ्या असलेल्या शेतात कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्याचा कल असतो. तसेच गेल्यावर्षीच्या कांद्याला चांगला दर मिळाल्याने शेतकरी कांदा लागवडीवर भर देत आहेत. काही शेतकऱ्यांनी स्वतःचे कांदा बी, तर काहीजणांनी बी विकत आणून त्यापासून कांदा रोपे तयार करण्यास सुरुवात केली आहे. सध्या एककिलो कांद्याच्या बीचा भाव चार ते पाच हजार रुपये आहे, तर एक एकर कांद्याची लागवड करण्यासाठी सुमारे साडेतीन ते चार किलो बी टाकणे गरजेचे असते. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिके निघण्याच्या नियोजनानुसार कांद्याची रोपे (तराव) टाकली आहेत. मात्र, सततच पाऊस व खराब हवामानामुळे कांद्याचे तराव (रोपे) मूळकुज व बुरशी रोगामुळे जागेवरच जळून जात आहेत. वारंवार रोपांवर औषधांची फवारणी करूनदेखील तराव जळून जात असून, टाकलेल्या चार किलो बीच्या तरावात एकरभर लागण्याऐवजी जेमतेम १० ते १५ गुंठे क्षेत्र कांदा लागण होत आहे. एवढे कष्ट घेऊनही शेतात टाकलेले ‘तराव तरत’ नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तराव (कांद्याचे रोप) किमान सव्वा ते दीड महिन्याचे झाल्यानंतर त्याची शेतात लागवड केली जाते. मात्र तराव वाढवतानाच शेतकऱ्यांना फारच आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यानंतर एक एकर कांदा लागण करण्यासाठी शेतमजूर (रोजगारी ) आठ ते नऊ हजार रुपये घेत आहेत. पुढे-पुढे खते, औषधे, अंतर्गत मशागतीचा प्रचंड खर्च शेतकऱ्यांना सहन करावा लागत असतो. म्हणजे शेतकऱ्याने एकरी सुमारे ५० ते ६० हजार रुपये खर्चून उत्पादित केलेल्या कांद्याच्या पिकाच्या दराची शेवटी शाश्वती नसते. त्यामुळे शेतकरी वर्गातून कांदा पिकाबाबत चिंता वाढू लागली आहे.

कोट..

गेल्या काही दिवसांपासून उगवलेल्या कांद्याच्या तरावाला पोषक वातावरण मिळत नसल्याने रोपे जागेवरच जळून जात आहेत. रोपाला लागवडीयोग्य करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक त्रासाबरोबर फार कष्ट घ्यावे लागत आहेत. कांद्यासाठी ठेवलेले क्षेत्र स्वतःच्या तरावाने पूर्ण होत नसल्याने इतर ठिकाणांहून कांद्याचे तराव आणावे लागत आहे. मात्र, त्याचा दर सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याने काही शेतकरी स्वतःकडे आहे तेवढ्यावरच कांदा लागवड करत आहेत.

- अविनाश रणसिंग, रणसिंगवाडी

फोटो-

१८पुसेगाव

कांद्याच्या तरावाला बुरशी व मूळकुज रोगावरील औषधांची फवारणी सातत्याने करून कांद्याची रोपे लागवडीयोग्य करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत.