शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसाने कांदा रोपांना मूळकुज, बुरशीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुसेगाव : रब्बी हंगामात कांद्याची लागवड करण्यासाठी नियोजनानुसार शेतकऱ्यांनी गेले पंधरा-वीस दिवसांपूर्वी आपल्या शेतात कांद्याच्या रोपाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुसेगाव : रब्बी हंगामात कांद्याची लागवड करण्यासाठी नियोजनानुसार शेतकऱ्यांनी गेले पंधरा-वीस दिवसांपूर्वी आपल्या शेतात कांद्याच्या रोपाची (तराव) निर्मिती करण्यासाठी कांद्याचे बी टाकले आहे. यापासून रोपे उगवून आली असली, तरी मूळकुज व बुरशीमुळे ती रोपे जळून जात आहेत. स्वतःचे कांद्याचे रोप असावे म्हणून काही शेतकऱ्यांनी अत्यंत मोलामहागाईचे कांद्याचे बी विकत आणून आपल्या शेतात टाकले असून, त्याची जपणूक करताना शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

खरिपाची सुगी झाल्यानंतर मोकळ्या असलेल्या शेतात कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्याचा कल असतो. तसेच गेल्यावर्षीच्या कांद्याला चांगला दर मिळाल्याने शेतकरी कांदा लागवडीवर भर देत आहेत. काही शेतकऱ्यांनी स्वतःचे कांदा बी, तर काहीजणांनी बी विकत आणून त्यापासून कांदा रोपे तयार करण्यास सुरुवात केली आहे. सध्या एककिलो कांद्याच्या बीचा भाव चार ते पाच हजार रुपये आहे, तर एक एकर कांद्याची लागवड करण्यासाठी सुमारे साडेतीन ते चार किलो बी टाकणे गरजेचे असते. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिके निघण्याच्या नियोजनानुसार कांद्याची रोपे (तराव) टाकली आहेत. मात्र, सततच पाऊस व खराब हवामानामुळे कांद्याचे तराव (रोपे) मूळकुज व बुरशी रोगामुळे जागेवरच जळून जात आहेत. वारंवार रोपांवर औषधांची फवारणी करूनदेखील तराव जळून जात असून, टाकलेल्या चार किलो बीच्या तरावात एकरभर लागण्याऐवजी जेमतेम १० ते १५ गुंठे क्षेत्र कांदा लागण होत आहे. एवढे कष्ट घेऊनही शेतात टाकलेले ‘तराव तरत’ नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तराव (कांद्याचे रोप) किमान सव्वा ते दीड महिन्याचे झाल्यानंतर त्याची शेतात लागवड केली जाते. मात्र तराव वाढवतानाच शेतकऱ्यांना फारच आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यानंतर एक एकर कांदा लागण करण्यासाठी शेतमजूर (रोजगारी ) आठ ते नऊ हजार रुपये घेत आहेत. पुढे-पुढे खते, औषधे, अंतर्गत मशागतीचा प्रचंड खर्च शेतकऱ्यांना सहन करावा लागत असतो. म्हणजे शेतकऱ्याने एकरी सुमारे ५० ते ६० हजार रुपये खर्चून उत्पादित केलेल्या कांद्याच्या पिकाच्या दराची शेवटी शाश्वती नसते. त्यामुळे शेतकरी वर्गातून कांदा पिकाबाबत चिंता वाढू लागली आहे.

कोट..

गेल्या काही दिवसांपासून उगवलेल्या कांद्याच्या तरावाला पोषक वातावरण मिळत नसल्याने रोपे जागेवरच जळून जात आहेत. रोपाला लागवडीयोग्य करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक त्रासाबरोबर फार कष्ट घ्यावे लागत आहेत. कांद्यासाठी ठेवलेले क्षेत्र स्वतःच्या तरावाने पूर्ण होत नसल्याने इतर ठिकाणांहून कांद्याचे तराव आणावे लागत आहे. मात्र, त्याचा दर सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याने काही शेतकरी स्वतःकडे आहे तेवढ्यावरच कांदा लागवड करत आहेत.

- अविनाश रणसिंग, रणसिंगवाडी

फोटो-

१८पुसेगाव

कांद्याच्या तरावाला बुरशी व मूळकुज रोगावरील औषधांची फवारणी सातत्याने करून कांद्याची रोपे लागवडीयोग्य करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत.