शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात कांद्याची आवक वाढली; दर टिकूनच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:34 IST

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असली तरी भाव मात्र टिकून आहे. रविवारी ४०६ क्विंटल कांद्याची आवक ...

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असली तरी भाव मात्र टिकून आहे. रविवारी ४०६ क्विंटल कांद्याची आवक होऊन दर ३३०० रुपयांपर्यंत मिळाला. तर बाजार समितीत भेंडी, गवार अन् शेवग्याचा दर तेजीत निघाला. तसेच मिरचीलाही चांगला भाव मिळत आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. बाजार समितीत रविवारी फळभाज्यांची एकूण १०९१ क्विंटलची आवक झाली. यामध्ये कांद्याची ४०६ क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला १ हजारपासून ३३०० रुपयांपर्यंत भाव आला. तर या वेळीही वांग्याला दर कमी मिळाल्याचे दिसून आले. १० किलोला १५० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला १० किलोला ८० ते १००, कोबीला २० ते ३० रुपये दर आला. फ्लाॅवरला १० किलोला ८० ते १२० रुपये भाव मिळाला. मागील एक महिन्यापासून कोबी, टोमॅटोला दर खूपच कमी मिळत असल्याचे दिसून येत आहे.

तेलाचा दर टिकून...

मागील काही आठवड्यांपासून खाद्यतेलाचा दर तेजीत आहे. या आठवड्यात दरात फारसा फरक पडलेला नाही. शेंगदाणा तेल डबा २३०० ते २५०० रुपयांपर्यंत असून सोयबीन तेल डबा १९५० ते २००० रुपयांदरम्यान आहे. तसेच सूर्यफूल तेल डब्याची किंमत १९५० ते २०५० रुपयांपर्यत आहे. एक किलो पाऊचमागे दोन ते तीन रुपये वाढ आहे.

कलिंगडाची आवक

बाजार समितीत सफरचंद, संत्री, चिक्कू, खरबूज, द्राक्षे, कलिंगडाची आवक झाली. बाजारात एका कलिंगडाचा दर १० रुपयांपासून होता.

वाटाणा स्वस्त...

बाजार समितीत कांदा, लसूण, गवार, शेवग्याचा दर टिकून आहे. मात्र, अनेक भाज्यांना दर मिळत नाही. दोडक्याला १० किलोला २०० ते २५० रुपये भाव आला. मिरचीला ३०० ते ४०० रुपये, भेंडी ३५० ते ३८०, शेवग्याला १० किलोला ४०० ते ५०० रुपये भाव आला. आले, वाटाणा अजून स्वस्तच आहे.

साताऱ्यातील मंडईत भाज्यांचे दर अजूनही ग्राहकांच्या आवाक्यात आहेत. साधारणपणे ४० ते ६० रुपये किलोपर्यंत सर्व भाज्या मिळत आहेत. गवार, शेवग्याचा दर तेजीतच आहे.

- स्मिता पवार, ग्राहक

सातारा बाजार समितीत कांद्याचा दर टिकून आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. असे असले तरी वाटाणा, आले आणि इतर काही भाज्यांना म्हणावे असा दर मिळत नाही.

- रामचंद्र इंगवले, शेतकरी

सध्या खाद्यतेलाचा दर वाढलेलाच आहे. कारण, भारतातील तेल मार्केट हे आयातीवर अवलंबून आहे. त्यातच देशातील तेल पिकांचे अतिवृष्टीत नुकसान झाले आहे. त्यामुळे दर आणखी वाढू शकतात.

- संभाजी आगुंडे, तेल विक्री प्रतिनिधी