शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

साताऱ्यात कांद्याची आवक वाढली; दर टिकूनच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:34 IST

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असली तरी भाव मात्र टिकून आहे. रविवारी ४०६ क्विंटल कांद्याची आवक ...

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असली तरी भाव मात्र टिकून आहे. रविवारी ४०६ क्विंटल कांद्याची आवक होऊन दर ३३०० रुपयांपर्यंत मिळाला. तर बाजार समितीत भेंडी, गवार अन् शेवग्याचा दर तेजीत निघाला. तसेच मिरचीलाही चांगला भाव मिळत आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. बाजार समितीत रविवारी फळभाज्यांची एकूण १०९१ क्विंटलची आवक झाली. यामध्ये कांद्याची ४०६ क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला १ हजारपासून ३३०० रुपयांपर्यंत भाव आला. तर या वेळीही वांग्याला दर कमी मिळाल्याचे दिसून आले. १० किलोला १५० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला १० किलोला ८० ते १००, कोबीला २० ते ३० रुपये दर आला. फ्लाॅवरला १० किलोला ८० ते १२० रुपये भाव मिळाला. मागील एक महिन्यापासून कोबी, टोमॅटोला दर खूपच कमी मिळत असल्याचे दिसून येत आहे.

तेलाचा दर टिकून...

मागील काही आठवड्यांपासून खाद्यतेलाचा दर तेजीत आहे. या आठवड्यात दरात फारसा फरक पडलेला नाही. शेंगदाणा तेल डबा २३०० ते २५०० रुपयांपर्यंत असून सोयबीन तेल डबा १९५० ते २००० रुपयांदरम्यान आहे. तसेच सूर्यफूल तेल डब्याची किंमत १९५० ते २०५० रुपयांपर्यत आहे. एक किलो पाऊचमागे दोन ते तीन रुपये वाढ आहे.

कलिंगडाची आवक

बाजार समितीत सफरचंद, संत्री, चिक्कू, खरबूज, द्राक्षे, कलिंगडाची आवक झाली. बाजारात एका कलिंगडाचा दर १० रुपयांपासून होता.

वाटाणा स्वस्त...

बाजार समितीत कांदा, लसूण, गवार, शेवग्याचा दर टिकून आहे. मात्र, अनेक भाज्यांना दर मिळत नाही. दोडक्याला १० किलोला २०० ते २५० रुपये भाव आला. मिरचीला ३०० ते ४०० रुपये, भेंडी ३५० ते ३८०, शेवग्याला १० किलोला ४०० ते ५०० रुपये भाव आला. आले, वाटाणा अजून स्वस्तच आहे.

साताऱ्यातील मंडईत भाज्यांचे दर अजूनही ग्राहकांच्या आवाक्यात आहेत. साधारणपणे ४० ते ६० रुपये किलोपर्यंत सर्व भाज्या मिळत आहेत. गवार, शेवग्याचा दर तेजीतच आहे.

- स्मिता पवार, ग्राहक

सातारा बाजार समितीत कांद्याचा दर टिकून आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. असे असले तरी वाटाणा, आले आणि इतर काही भाज्यांना म्हणावे असा दर मिळत नाही.

- रामचंद्र इंगवले, शेतकरी

सध्या खाद्यतेलाचा दर वाढलेलाच आहे. कारण, भारतातील तेल मार्केट हे आयातीवर अवलंबून आहे. त्यातच देशातील तेल पिकांचे अतिवृष्टीत नुकसान झाले आहे. त्यामुळे दर आणखी वाढू शकतात.

- संभाजी आगुंडे, तेल विक्री प्रतिनिधी