शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात कांद्याची आवक वाढली; दर टिकूनच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:34 IST

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असली तरी भाव मात्र टिकून आहे. रविवारी ४०६ क्विंटल कांद्याची आवक ...

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असली तरी भाव मात्र टिकून आहे. रविवारी ४०६ क्विंटल कांद्याची आवक होऊन दर ३३०० रुपयांपर्यंत मिळाला. तर बाजार समितीत भेंडी, गवार अन् शेवग्याचा दर तेजीत निघाला. तसेच मिरचीलाही चांगला भाव मिळत आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. बाजार समितीत रविवारी फळभाज्यांची एकूण १०९१ क्विंटलची आवक झाली. यामध्ये कांद्याची ४०६ क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला १ हजारपासून ३३०० रुपयांपर्यंत भाव आला. तर या वेळीही वांग्याला दर कमी मिळाल्याचे दिसून आले. १० किलोला १५० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला १० किलोला ८० ते १००, कोबीला २० ते ३० रुपये दर आला. फ्लाॅवरला १० किलोला ८० ते १२० रुपये भाव मिळाला. मागील एक महिन्यापासून कोबी, टोमॅटोला दर खूपच कमी मिळत असल्याचे दिसून येत आहे.

तेलाचा दर टिकून...

मागील काही आठवड्यांपासून खाद्यतेलाचा दर तेजीत आहे. या आठवड्यात दरात फारसा फरक पडलेला नाही. शेंगदाणा तेल डबा २३०० ते २५०० रुपयांपर्यंत असून सोयबीन तेल डबा १९५० ते २००० रुपयांदरम्यान आहे. तसेच सूर्यफूल तेल डब्याची किंमत १९५० ते २०५० रुपयांपर्यत आहे. एक किलो पाऊचमागे दोन ते तीन रुपये वाढ आहे.

कलिंगडाची आवक

बाजार समितीत सफरचंद, संत्री, चिक्कू, खरबूज, द्राक्षे, कलिंगडाची आवक झाली. बाजारात एका कलिंगडाचा दर १० रुपयांपासून होता.

वाटाणा स्वस्त...

बाजार समितीत कांदा, लसूण, गवार, शेवग्याचा दर टिकून आहे. मात्र, अनेक भाज्यांना दर मिळत नाही. दोडक्याला १० किलोला २०० ते २५० रुपये भाव आला. मिरचीला ३०० ते ४०० रुपये, भेंडी ३५० ते ३८०, शेवग्याला १० किलोला ४०० ते ५०० रुपये भाव आला. आले, वाटाणा अजून स्वस्तच आहे.

साताऱ्यातील मंडईत भाज्यांचे दर अजूनही ग्राहकांच्या आवाक्यात आहेत. साधारणपणे ४० ते ६० रुपये किलोपर्यंत सर्व भाज्या मिळत आहेत. गवार, शेवग्याचा दर तेजीतच आहे.

- स्मिता पवार, ग्राहक

सातारा बाजार समितीत कांद्याचा दर टिकून आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. असे असले तरी वाटाणा, आले आणि इतर काही भाज्यांना म्हणावे असा दर मिळत नाही.

- रामचंद्र इंगवले, शेतकरी

सध्या खाद्यतेलाचा दर वाढलेलाच आहे. कारण, भारतातील तेल मार्केट हे आयातीवर अवलंबून आहे. त्यातच देशातील तेल पिकांचे अतिवृष्टीत नुकसान झाले आहे. त्यामुळे दर आणखी वाढू शकतात.

- संभाजी आगुंडे, तेल विक्री प्रतिनिधी