शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

जलस्त्रोत बळकटीकरणाचे एक काम दहा दिवसांत...

By admin | Updated: February 18, 2015 23:46 IST

जिल्हाधिकारी यांच्या सूचना : २१५ गावांत ‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा धडाका

सातारा : ‘जलयुक्त शिवार’ अभियानामध्ये आराखडा तयार करण्यात आलेल्या २१५ गावांमध्ये जलस्त्रोत बळकटीकरणाचे किमान एक काम येत्या दहा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत सुरू करावे,’ अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या.‘जलयुक्त शिवार’ अभियानाची पूर्वतयारी आढवा बैठक मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पराग सोमण, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) आनंद भंडारी, राजेंद्र जाधव, जिल्हास्तरीय समिती सदस्य डॉ. अविनाश पोळ, संजीव जाधव, मिनाज मुल्ला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, जिल्हा समिती अधिकारी प्रशांत सातपुते आदींसह विविध विभागांचे प्रमुख, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.‘जलयुक्त शिवार’ अभियान हे राज्य शासनाचे सर्वाधिक प्राधान्याचे अभियान असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, ‘विविध विभागांच्या जलसंधारणाच्या, जलस्त्रोत बळकटीकरणाच्या योजना एकत्रित करून हे अभियान राबविण्यात येत आहे. २०१६ मध्ये जिल्हा टंचाईमुक्त करण्याच्या उद्देशाने प्राधान्यक्रमाने २१५ गावे निवडली असून, त्यांचा एकूण ५३४ कोटी ६५ लाख ८१ हजारांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या या २१५ गावांमध्ये २७६ ठिकाणी जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये सातारा तालुक्यात २० गावांत ३० कामे, वाई तालुक्यात २३ गावांत २८, माण २४ गावांत १८, कऱ्हाड १० गावांत २५, जावळी २० गावांत १९, पाटण २० गावांत १४, खंडाळा ८ गावांत २४, महाबळेश्वर १७ गावांत १४, फलटण २३ गावांत १३, खटाव २३ गावांत ६७ व कोरगाव तालुक्यात २५ गावांत २४ कामांचा समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थतीत ही कामे पूर्ण करावीत.या आर्थिक वर्षात आवश्यक निधीची तरतूद उपलब्ध आहे. फक्त मोहीम स्वरूपात काम गतीने चालू करावे. अनेक अशासकीय संस्था सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्था आदींना या कामात सहभागी करून घेण्यात येणार आहे. सकारात्मक जनभावना निर्मिती होण्यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. (प्रतिनिधी)