शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

जलस्त्रोत बळकटीकरणाचे एक काम दहा दिवसांत...

By admin | Updated: February 18, 2015 23:46 IST

जिल्हाधिकारी यांच्या सूचना : २१५ गावांत ‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा धडाका

सातारा : ‘जलयुक्त शिवार’ अभियानामध्ये आराखडा तयार करण्यात आलेल्या २१५ गावांमध्ये जलस्त्रोत बळकटीकरणाचे किमान एक काम येत्या दहा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत सुरू करावे,’ अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या.‘जलयुक्त शिवार’ अभियानाची पूर्वतयारी आढवा बैठक मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पराग सोमण, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) आनंद भंडारी, राजेंद्र जाधव, जिल्हास्तरीय समिती सदस्य डॉ. अविनाश पोळ, संजीव जाधव, मिनाज मुल्ला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, जिल्हा समिती अधिकारी प्रशांत सातपुते आदींसह विविध विभागांचे प्रमुख, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.‘जलयुक्त शिवार’ अभियान हे राज्य शासनाचे सर्वाधिक प्राधान्याचे अभियान असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, ‘विविध विभागांच्या जलसंधारणाच्या, जलस्त्रोत बळकटीकरणाच्या योजना एकत्रित करून हे अभियान राबविण्यात येत आहे. २०१६ मध्ये जिल्हा टंचाईमुक्त करण्याच्या उद्देशाने प्राधान्यक्रमाने २१५ गावे निवडली असून, त्यांचा एकूण ५३४ कोटी ६५ लाख ८१ हजारांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या या २१५ गावांमध्ये २७६ ठिकाणी जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये सातारा तालुक्यात २० गावांत ३० कामे, वाई तालुक्यात २३ गावांत २८, माण २४ गावांत १८, कऱ्हाड १० गावांत २५, जावळी २० गावांत १९, पाटण २० गावांत १४, खंडाळा ८ गावांत २४, महाबळेश्वर १७ गावांत १४, फलटण २३ गावांत १३, खटाव २३ गावांत ६७ व कोरगाव तालुक्यात २५ गावांत २४ कामांचा समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थतीत ही कामे पूर्ण करावीत.या आर्थिक वर्षात आवश्यक निधीची तरतूद उपलब्ध आहे. फक्त मोहीम स्वरूपात काम गतीने चालू करावे. अनेक अशासकीय संस्था सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्था आदींना या कामात सहभागी करून घेण्यात येणार आहे. सकारात्मक जनभावना निर्मिती होण्यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. (प्रतिनिधी)