शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

जलस्त्रोत बळकटीकरणाचे एक काम दहा दिवसांत...

By admin | Updated: February 18, 2015 23:46 IST

जिल्हाधिकारी यांच्या सूचना : २१५ गावांत ‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा धडाका

सातारा : ‘जलयुक्त शिवार’ अभियानामध्ये आराखडा तयार करण्यात आलेल्या २१५ गावांमध्ये जलस्त्रोत बळकटीकरणाचे किमान एक काम येत्या दहा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत सुरू करावे,’ अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या.‘जलयुक्त शिवार’ अभियानाची पूर्वतयारी आढवा बैठक मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पराग सोमण, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) आनंद भंडारी, राजेंद्र जाधव, जिल्हास्तरीय समिती सदस्य डॉ. अविनाश पोळ, संजीव जाधव, मिनाज मुल्ला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, जिल्हा समिती अधिकारी प्रशांत सातपुते आदींसह विविध विभागांचे प्रमुख, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.‘जलयुक्त शिवार’ अभियान हे राज्य शासनाचे सर्वाधिक प्राधान्याचे अभियान असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, ‘विविध विभागांच्या जलसंधारणाच्या, जलस्त्रोत बळकटीकरणाच्या योजना एकत्रित करून हे अभियान राबविण्यात येत आहे. २०१६ मध्ये जिल्हा टंचाईमुक्त करण्याच्या उद्देशाने प्राधान्यक्रमाने २१५ गावे निवडली असून, त्यांचा एकूण ५३४ कोटी ६५ लाख ८१ हजारांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या या २१५ गावांमध्ये २७६ ठिकाणी जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये सातारा तालुक्यात २० गावांत ३० कामे, वाई तालुक्यात २३ गावांत २८, माण २४ गावांत १८, कऱ्हाड १० गावांत २५, जावळी २० गावांत १९, पाटण २० गावांत १४, खंडाळा ८ गावांत २४, महाबळेश्वर १७ गावांत १४, फलटण २३ गावांत १३, खटाव २३ गावांत ६७ व कोरगाव तालुक्यात २५ गावांत २४ कामांचा समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थतीत ही कामे पूर्ण करावीत.या आर्थिक वर्षात आवश्यक निधीची तरतूद उपलब्ध आहे. फक्त मोहीम स्वरूपात काम गतीने चालू करावे. अनेक अशासकीय संस्था सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्था आदींना या कामात सहभागी करून घेण्यात येणार आहे. सकारात्मक जनभावना निर्मिती होण्यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. (प्रतिनिधी)