शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जिल्ह्यात एक लाख ६३ हजार ग्राहकांकडून १० महिन्यांत वीज बिलांचा एकदाही भरणा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:32 IST

सातारा : अतिदुर्गम खेड्यापाड्यांपासून सर्वच क्षेत्रांत वीजसेवा देणाऱ्या व जनतेच्या मालकीची वीज कंपनी असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वीज बिलांच्या ...

सातारा : अतिदुर्गम खेड्यापाड्यांपासून सर्वच क्षेत्रांत वीजसेवा देणाऱ्या व जनतेच्या मालकीची वीज कंपनी असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वीज बिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे गंभीर झाली आहे. वीजक्षेत्रातील संभाव्य अरिष्ट टाळण्यासाठी वीजग्राहकांनी चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

गतवर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तब्बल एक लाख ६३ हजार वीजग्राहकांनी एकाही महिन्याचे वीज बिल भरलेले नाही. सध्या वीजपुरवठा सुरू असलेल्या या सर्व ग्राहकांकडे तब्बल ९१ कोटी ९२ लाख रुपयांची थकबाकी आहे. सध्या जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तीन लाख १७ हजार ग्राहकांकडे तब्बल १४५ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे.

कोरोना संकटातील ‘लॉकडाऊन’मध्ये मीटर रीडिंग घेता आले नाही. ‘अनलॉक’नंतर देण्यात आलेल्या सरासरी वीजबिलांची योग्य दुरुस्ती करण्यात आली. तसेच मीटर रीडिंगप्रमाणे वीज बिल देण्याची प्रक्रियाही पूर्ववत झाली. अनलॉकनंतर मीटर रीडिंगप्रमाणे देण्यात आलेली वीज बिले अचूक असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनीही दिलेला आहे. मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील एक लाख ६३ हजार १३४ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी माहे नोव्हेंबरपर्यंतच्या एकाही वीज बिलाचा भरणा केला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे थकबाकीमध्ये तब्बल ९१ कोटी ९२ लाख रुपयांची भर पडली आहे.

गेल्या १५ वर्षांमध्ये विविध गंभीर संकटांवर मात करीत महावितरणने देशाच्या वीजक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशपातळीवर नावलौकिक मिळविला आहे. जागतिक तंत्रज्ञानाची ग्राहकसेवा आता वीजग्राहकांना घरबसल्या मोबाईल अ‍ॅपसह ‘ऑनलाईन’द्वारे उपलब्ध आहे. देशात सर्वाधिक म्हणजे सुमारे पावणेतीन कोटी वीजग्राहक हे महावितरणचे आहेत. फोटो मीटर रीडिंगप्रमाणे वीज बिल देण्यास प्रारंभ करणारी महावितरण ही देशातील पहिली वीज वितरण कंपनी आहे. मात्र वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी व पुरवठा यांमध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी सध्या वीजग्राहकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे थकीत व चालू वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणकडून आवाहन करण्यात येत आहे.

चौकट :

जिल्ह्यातील विभागनिहाय ग्राहकसंख्या (कंसात थकबाकी) पुढीलप्रमाणे :

सातारा विभागात ३२ हजार ८०६ ग्राहकांची १८.८० कोटी, कऱ्हाड विभागात ४४ हजार ६२८ ग्राहकांची २५.२६ कोटी, फलटण विभागात ३५ हजार ७१३ ग्राहकांची २० कोटी, वडूज विभागात २४ हजार ३०५ ग्राहकांची ११.८४ कोटी, तर वाई विभागात २५ हजार ६८४ ग्राहकांची १६.०२ कोटी थकबाकी दिसत आहे.