शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

एकीकडे म्हणे जलजागृती; दुसरीकडे मात्र डुलकी!

By admin | Updated: April 5, 2016 00:56 IST

सामाजिक कार्यकर्त्याकडून भांडाफोड : धोम पाटबंधारे विभागातील लिपिकाच्या ‘वामकुक्षी’चे बिनधास्त चित्रीकरण

सातारा : धोम धरणात केवळ १६.३४ टक्के पाणीसाठा उरला आहे. या धरणावर लाभार्थी असणारे शेतकरी पाणी-पाणी करून त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एका बाजूला शासन ‘जलजागृती’ सप्ताह राबवून पाणी बचतीचे संदेश देत आहे, याचवेळी धोम पाटबंधारे कार्यालयातील लिपिक मात्र कामावर येताच दिवसा-ढवळ्या डुलक्या घेत असल्याचे उघडकीस आले आहे. या कर्मचाऱ्याच्या डुलक्या एका सामाजिक कार्यकर्त्याने ‘आॅन द स्पॉट’ कॅमेराबद्ध केल्या. सातारा तालुक्यातील जावळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते राजू शेळके व त्यांचे सहकारी मित्र संजय कांबळे हे सोमवारी पाणी परवान्यासाठी शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाबाबत धोम पाटबंधारे विभागात गेले होते. दुपारी साडेबाराची वेळ... त्याचवेळी हे दोघे कार्यालयात गेले. तेव्हा धोम पाटबंधारे विभागाचे प्रथम लिपिक पी. डी. सावंत हे आपल्या खुर्चीत बसून डुलक्या घेत होते. शेळके यांनी ा खुर्चीवर डुलक्या खातानाचे चित्रीकरणही तब्बल काही मिनिटे केले. काही वेळाने कार्यालयातील एका शिपायाने सावंतांची वामकुक्षी मोडली. डोळे उघडल्यानंतर आपण कॅमेराबद्ध झाल्याचे पाहून सावंत यांनी तिथून पळ काढला. अर्धी रजा टाकून ते कार्यालयातून गायब झाल्याचीही चर्चा कार्यालयात नंतर सुरू झाली. शासनाचा पगार... शासनाचे कार्यालय... शासनाचा टेबल... शासनाची खुर्ची; पण शासनाचं म्हणजे पर्यायानं लोकांचं काम करायचं नाही, त्यांना तंगवत ठेवायचं, लोकांना हेलपाटे मारायला लावायचं, या कलेत तरबेज असणारी ही शासकीय प्रवृत्ती कार्यालयात आल्यानंतर किती मुजोरपणे वागत असते, याचे हे जाहीर उदाहरण ठरले आहे. पावसाने तोंड फिरवले, धरणांत पाणी नाही, भेगाळलेल्या जमिनीकडे ओल्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे, अशा परिस्थितीत मेटाकुटीला आलेले शेतकरी सावंतांसारख्या प्रवृत्तीमुळे आणखी पिचले जात आहेत, अशी नाराजी शेळके यांनी व्यक्त केली. शेळके म्हणाले, ‘धोम कार्यालयातील शेती पाणीउपसा परवाना देण्याचे काम जिल्हास्तरावरून दिले असताना शेतकऱ्यांना केवळ नाहक त्रास देण्याचे व यातून गैरलाभ उठविण्याच्या हेतूने पुणे कार्यालयातून परवाना मिळेल, असा फतवा काढण्यात आला होता. पुणे कार्यालयाकडून याबाबत स्पष्ट आदेश दिले गेले, त्याची प्रत आणण्यासाठी कार्यालयात गेलो असता शासकीय इतमामात संबंधित लिपिकाच्या डुलक्या सुरू होत्या.’