शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
4
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
5
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
6
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
7
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
8
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
9
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
10
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
11
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
12
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
13
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
14
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
15
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
16
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
17
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
18
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
19
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
20
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची भीती!

By admin | Updated: July 9, 2014 00:03 IST

पावसाची पाठ : कास तलावातील पाणी अवघ्या साडेचार मीटरवर

सातारा : पावसाने पाठ फिरविल्याने कास तलावातील पाणी झपाट्याने कमी झाले आहे. याचा प्रतिकूल परिणाम सातारा शहरातील पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरात कदाचित एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची भीती पालिका प्रशासनाने वर्तविली असली तरी पाणी वाया घालविणाऱ्यांना या परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे चित्र अजूनही पाहायला मिळत आहे.कास तलावात सध्या केवळ साडेचार फूट पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या मृतसाठ्यातून शहरात पाणीपुरवठा केला जातो. पावसाने आणखी ओढ दिल्यास हा साठाही आटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पालिका प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. कासजवळून ओढ्यात वाया जाणारे पाणीही तलावात पुन्हा टाकले जात आहे. दरम्यान, सध्या पाणी झपाट्याने कमी झाले असल्याने कास योजनेवरील साठवण टाक्यांमध्ये पुरेसा पाणीसाठा होत नाही. याचाच परिणाम म्हणून काही दिवसांत एक दिवसाआड शहरात पाणीपुरवठा करावा लागणार आहे. आगामी संकट लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती लीना गोरे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कास धरण, उरमोडी व कृष्णा नदी या तीनही उद्भवांतील पाणी झपाट्याने कमी झाले आहे. जुलै महिना सुरु होऊन नऊ दिवस ओलांडले असले तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे उपलब्ध पाणी आणखी दहा ते पंधरा दिवस पुरेल. पाऊस पडला नाही, तर दुष्काळी भागातील परिस्थिती आपल्यावरही ओढविण्याची भीती आहे.काही नागरिक आजही दारात पाईपा लावून वाहने धूवत आहेत. ५0 ते ६0 नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. (प्रतिनिधी)