शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची भीती!

By admin | Updated: July 9, 2014 00:03 IST

पावसाची पाठ : कास तलावातील पाणी अवघ्या साडेचार मीटरवर

सातारा : पावसाने पाठ फिरविल्याने कास तलावातील पाणी झपाट्याने कमी झाले आहे. याचा प्रतिकूल परिणाम सातारा शहरातील पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरात कदाचित एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची भीती पालिका प्रशासनाने वर्तविली असली तरी पाणी वाया घालविणाऱ्यांना या परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे चित्र अजूनही पाहायला मिळत आहे.कास तलावात सध्या केवळ साडेचार फूट पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या मृतसाठ्यातून शहरात पाणीपुरवठा केला जातो. पावसाने आणखी ओढ दिल्यास हा साठाही आटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पालिका प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. कासजवळून ओढ्यात वाया जाणारे पाणीही तलावात पुन्हा टाकले जात आहे. दरम्यान, सध्या पाणी झपाट्याने कमी झाले असल्याने कास योजनेवरील साठवण टाक्यांमध्ये पुरेसा पाणीसाठा होत नाही. याचाच परिणाम म्हणून काही दिवसांत एक दिवसाआड शहरात पाणीपुरवठा करावा लागणार आहे. आगामी संकट लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती लीना गोरे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कास धरण, उरमोडी व कृष्णा नदी या तीनही उद्भवांतील पाणी झपाट्याने कमी झाले आहे. जुलै महिना सुरु होऊन नऊ दिवस ओलांडले असले तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे उपलब्ध पाणी आणखी दहा ते पंधरा दिवस पुरेल. पाऊस पडला नाही, तर दुष्काळी भागातील परिस्थिती आपल्यावरही ओढविण्याची भीती आहे.काही नागरिक आजही दारात पाईपा लावून वाहने धूवत आहेत. ५0 ते ६0 नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. (प्रतिनिधी)