शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

एक पोरकट तर दुसरा लुच्चा!

By admin | Updated: June 17, 2015 22:05 IST

इंद्रजित मोहितेंची सडेतोड मुलाखत : विरोधकांनी करून ठेवलेली कर्जे अन् देण्यांचा नेमका आकडा निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल-- लोकमत- सडेतोड

कऱ्हाड : शेतकऱ्यांच्या मालकीची सहकारी साखर कारखानदारी टिकणार की नाही, हा गहन प्रश्न हाताळणारी ही निवडणूक असताना, निवडणुकीला गांभीर्याने सामोरे न जाता आमचा एक विरोधक पोरकटपणे व्यक्तिगत आरोप करीत आहे तर दुसरा विरोधक सहकारातून ‘खासगी’ प्रगती साधल्यानंतर कारखान्याविषयी खोटा कळवळा दाखवून लुच्चेपणाने पुन्हा सहकाराकडे वळला आहे, अशा सडेतोड भाषेत यशवंतराव मोहिते रयत पॅनेलचे प्रमुख इंद्रजित मोहिते यांनी विरोधकांची हजेरी घेतली.यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची तिरंगी निवडणूक भलतीच गाजत असताना ‘लोकमत’ तीनही पॅनेलप्रमुखांच्या भूमिका जाणून घेत आहे. रेठरे बुद्रुकमध्ये संध्याकाळच्या सभेची जोरदार तयारी सुरू असतानाच ‘लोकमत टीम’ इंद्रजित मोहिते यांच्या घरी पोहोचली तेव्हा ‘कृष्णे’च्या सद्य:स्थितीसह एकूणच सहकारी साखर कारखानदारीबद्दल मोहिते यांनी रोखठोक मते मांडली. आपली लोकप्रियता कमी झाल्याचे मागील निवडणुकीच्या पराभवावरून त्यांना दिसून आले आणि त्यांनी त्याची कठोर कारणमीमांसाही केली. ‘कारखान्याच्या उन्नतीसाठी काही बदल करताना सभासदांना विश्वासात घ्यायला हवे होते,’ असे सांगून ते म्हणाले, ‘केवळ साखर कारखानदारीचे ज्ञान पुरेसे नसून, निवडणुकीला राजकीय अंगही असते. सभासदांना सतत संपर्काची अपेक्षा असते. त्यात आम्ही कमी पडलो. कारखान्यासाठी केलेली खरेदी राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातून होते. मात्र, ती आम्ही स्वत: करून ‘लाभ’ मिळविला, अशी अफवा विरोधकांनी पसरविली होती. आमची बाजू खरी असूनही गैरप्रचार करण्यात विरोधकांना यश आले. त्यामुळेच यावेळी आम्ही सावध आहोत.’गेल्या पाच वर्षांत विरोधकांची ‘कार्यकुशलता’ सभासदांना चांगलीच समजली असल्याचे सांगून मोहिते म्हणाले, ‘आमच्या कार्यकाळात सुरू झालेल्या चार-पाच प्रकल्पांचे श्रेय आज ते घेतात. मद्यार्कनिर्मिती प्रकल्पाचे आधुनिकीकरण करून आम्ही एक लाख लिटरने क्षमता वाढवून ठेवली होती. तसेच २१० दिवस हा प्रकल्प चालविण्याची परवानगी मिळविली होती. परंतु अविनाश मोहितेंच्या कार्यकाळात त्या मानाने उत्पादनवाढ झाली नाही. जे उत्पादन वाढले त्याचा परिणाम ऊसदरावर दिसला नाही. चुका झाकण्यासाठी विरोधक व्यक्तिगत आरोपांवर उतरले असले तरी आमचा ‘फोकस’ आरोपांपेक्षा कारखानदारीवरच अधिक असून, भाषणात आम्ही सद्य:स्थितीचे विश्लेषण करीत आहोत.’ (लोकमत चमू)‘वसंतदादा’पेक्षा कर्जभार अधिक सांगलीच्या वसंतदादा पाटील साखर कारखान्यापेक्षाही कर्जाचा अधिक भार आज ‘कृष्णे’वर आहे, असे नमूद करून इंद्रजित मोहिते म्हणाले, ‘आम्ही सत्ता सोडली तेव्हा २१० कोटींचे कर्ज होते. नव्या प्रकल्पांच्या उभारणीस ७० ते ७५ कोटी रुपये खर्च आला होता. मालतारण कर्ज आज २३० कोटींवर पोहोचले असून, कारखाना तारण ठेवून ३१७ कोटींचे कर्ज काढण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर भाग कार्यालयांवरही ४३ कोटींचे कर्ज आहे. पुरवठादारांची देणी थकली आहेत. निवृत्त कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचे ४५० कोटी देणे आहे. ऊसतोडीसह अनेक देणी बाकी आहेत.’तरीही ‘आई’ला वाचविणारचकारखान्याची परिस्थिती दयनीय असतानाही तुम्हाला सत्ता का हवी आहे, या विरोधकांच्या सवालाची आठवण करून दिली असता मोहिते भावूक झाले. ‘कारखाना माझी आई आहे. माझे वडील उभारणीत होते. कारखान्याच्या अंगणात मी खेळलो-वाढलो. १५ वर्षे मदनरावांच्या साथीने मी कारखाना चालवला आहे. चांगला ऊसदर देण्याची किमया साध्य करून दाखवली आहे. आई आजारी पडली तर तिला कुणी वाऱ्यावर सोडून देत नाही. कारखाना वाचविण्याचा प्रयत्न मी करणारच. कारखाना जगावा आणि तो सभासदांच्याच मालकीचा राहावा, हीच माझी भूमिका आहे,’ असे ते म्हणाले.कृषी महाविद्यालयाविषयी अनाठायी टीकासभासदांच्या मालकीच्या सर्वच सहकारी कारखान्यांचे अस्तित्वच पणाला लागलेले असताना कारखानदारांनी नैतिकतेत कमी पडता कामा नये. म्हणूनच आम्ही अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन नियोजन केले आहे. टीकेचा सूर न लावता हेच मुद्दे प्रचारात मांडत आहोत, असे सांगताना विरोधकांनी कृषी महाविद्यालयाविषयी केलेल्या आरोपांना मोहिते यांनी उत्तर दिले. ‘आमच्या आधीच्या अध्यक्षांनीच या महाविद्यालयाला मान्यता आणली. परंतु कारखान्याच्या ध्येयधोरणांमध्ये ‘शिक्षण’ या उद्दिष्टाचा उल्लेख कुठेच नाही. पुढे तांत्रिक अडचणी येऊ नयेत म्हणून अयुक्तांना विचारून त्यांच्याच सल्ल्याने आम्ही ट्रस्ट स्थापन केला. कारखान्याचा अध्यक्षच ट्रस्टचा विश्वस्त राहील अशी तरतूद केली. महाविद्यालयासाठी किमान शंभर एकर जमीन लागते. त्यामुळे ट्रस्ट आणि कारखान्यादरम्यान सहमती करार करून १५६ एकर जमीन कृषी महाविद्यालयाकडे वर्ग केली,’ असे त्यांनी सांगितले.सत्ताबाह्य केंद्रे : कऱ्हाडात अन् वाळव्यातअविनाश मोहिते यांच्या कार्यकाळात ‘सत्ताबाह्य केंद्र’ कार्यरत असल्याचा आरोप केला जातो. त्याविषयी मोहिते म्हणाले, ‘अशी दोन सत्ताबाह्य केंद्रे आहेत. एक कऱ्हाड तर तुसरे वाळवा तालुक्यात. त्यामुळे कारखान्याची आणखी पीछेहाट झाली. प्रदूषण ही व्यवस्थापनाची चूक; पण दंडाचा बोजा पडला सभासदांवर. भांडवली ठेवी वर्ग केल्या नाहीत, असे ते आज म्हणतात; पण तसा ठराव केला आहे, त्याचे काय? आमचे दुसरे विरोधक कारखान्याचे दुसरे युनिट काढायचे म्हणतात. पण ‘जयवंत शुगर’ हेच ते युनिट. त्यांची सगळी युनिट आणि ट्रस्ट कृष्णा कारखान्यातून मिळालेल्या लाभावरच आधारित आहेत.’आरोप करणे सोपे आहेविरोधक आपल्या ट्रस्टविषयीही आरोप करतात, हे निदर्शनास आणून देताच मोहिते म्हणाले, ‘आरोप करणे सोपे असते. आईच्या निधनानंतर तिच्या नावाने मी ट्रस्ट सुरू केला आणि इंग्रजी माध्यमाची शाळा पत्र्याच्या शेडमध्ये काढली. आजही ती त्याच शेडमध्ये आहे. कारखान्यातील लाभावर ट्रस्ट काढला असता तर टोलेजंग इमारत बांधली नसती का? कृषी महाविद्यालय हा हडप केलेला ट्रस्ट आहे असे विरोधक म्हणतात, तर त्यांनी त्याची ‘रिटर्न्स’ का भरली? पाच वर्षांत आमच्यावर कारवाई का नाही केली? खोटे बोलून काही दिवस लाभ होतो; मात्र सभासदांनी सर्वांच्याच क्षमता आता ओळखल्या आहेत.’