शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
4
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूम शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
5
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
6
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
7
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
8
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
9
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
10
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
11
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
12
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
13
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
14
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
15
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
16
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
17
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
18
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
20
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित

वणव्याने गिळले वृद्धाचे घर; दुर्मीळ वनसंपदा बेचिराख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:38 IST

सातारा : सातारा तालुक्यातील उरमोडी धरणाकाठी वसलेल्या नित्रळ या गावातील स्थानिक वृद्ध शेतकऱ्याचे घर डोंगराला लावलेल्या आगीत भस्मसात झाले. ...

सातारा : सातारा तालुक्यातील उरमोडी धरणाकाठी वसलेल्या नित्रळ या गावातील स्थानिक वृद्ध शेतकऱ्याचे घर डोंगराला लावलेल्या आगीत भस्मसात झाले. वणव्याने एका वृद्धाचे घर आणि संसारोपयोगी साहित्य गिळले असून या वृद्धाला प्रशासनाने तत्काळ मदत देण्याची मागणी आहे.

उरमोडी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात नित्रळ हे छोटे गाव आहे. काळेश्वरी डोंगराच्या पायथ्याला केदारनाथ मंदिराशेजारी ८ ते १0 घरांची वस्ती आहे. सोमवारी (दि. ८) दुपारी काही विघ्नसंतोषींनी काळेश्वरी डोंगरात वणवा लावला. ही आग स्थानिक लोकांच्या लक्षात आली नाही. लोक झोपी गेले. त्यानंतर ही आग वाढली. तिने रौद्ररूप घेतले. आगीमध्ये स्थानिकांनी लावलेली आंब्याची झाडे जळाली. दुर्मीळ वृक्षही जळून खाक झाले. तसेच नित्रळ येथील वृद्ध विठ्ठल गणू वांगडे यांच्या जुन्या घराला या आगीची झळ बसली. या आगीत या घरातील सागवानी लाकडे जळून खाक झाली. बघता-बघता हे घर कोसळले. आगीच्या झळा आणि धुरामुळे मध्यरात्रीनंतर स्थानिक लोकांना जाग आली. त्यांनी धरणातील पाणी आणून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र शेतामधील आंब्यांच्या शेकडो हुंड्यादेखील जळून खाक झाल्या. लोकांना जाग आल्याने पुढील अनर्थ टळला. लोक जागे झाले नसते तर ही आग आटोक्यात आली नसती. रात्रीतच सर्व घरांना तसेच फार्म हाऊस आणि आंब्याची बाग जळाली असती. मात्र लोक जागे झाल्याने पुढील अनर्थ टळला.

वनविभागाने गस्त वाढविण्याची मागणी

सातारा शहराच्या पश्चिम भागात डोंगरांची मोठी रांग आहे. या डोंगररांगेत विपुल वृक्षसंपदा आणि वन्यप्राणी, दुर्मीळ पक्षी पाहायला मिळतात. मागील आठवड्यापासून या डोंगररांगांना जागोजागी वणवा लागण्याच्या घटना घडल्या आहेत. काही विघ्नसंतोषी लोक नेमकी सायंकाळची वेळ साधून वणवे लावत असल्याने वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात आग वाढते. आग विझवताना अनेकांची होरपळ होते. मात्र, मर्यादित साधनांमुळे आग वाढून वनसंपदेचे मोठे नुकसान होत आहे. या परिस्थितीत वनविभागाने डोंगरभागात गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक लोक करीत आहेत.

जाळपट्टे काढले असते तर...

कास पठार, काळेश्वरीचा डोंगर, गणेशखिंड परिसर, पेढ्याचा भैरोबाचा डोंगर या भागांमध्ये गेल्या आठवड्यापासून वणवा लागण्याचे प्रमाण वाढलेले आहे. या डोंगरांमध्ये जाळपट्टेच काढले गेले नसल्याने आग आटोक्यात येत नाही. उलट ती आणखी वाढते. यासाठी वनविभागाने लोकसहभागातून जाळपट्टे काढावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.

कोट..

उरमोडी धरणाच्या कडेला आमचे जुने घर होते. त्यात लाखमोलाचे साहित्य जळून खाक झाले आहे. वणवा पेटवणाऱ्यांवर कारवाई करून आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.

- विठ्ठल वांगडे, नुकसानग्रस्त ग्रामस्थ, नित्रळ

फोटो ओळ : सातारा तालुक्यातील नित्रळ या गावातील जुने घर आगीत भस्मसात झाले.

फोटो नेम : ०९नित्रळ