शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वणव्याने गिळले वृद्धाचे घर; दुर्मीळ वनसंपदा बेचिराख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:38 IST

सातारा : सातारा तालुक्यातील उरमोडी धरणाकाठी वसलेल्या नित्रळ या गावातील स्थानिक वृद्ध शेतकऱ्याचे घर डोंगराला लावलेल्या आगीत भस्मसात झाले. ...

सातारा : सातारा तालुक्यातील उरमोडी धरणाकाठी वसलेल्या नित्रळ या गावातील स्थानिक वृद्ध शेतकऱ्याचे घर डोंगराला लावलेल्या आगीत भस्मसात झाले. वणव्याने एका वृद्धाचे घर आणि संसारोपयोगी साहित्य गिळले असून या वृद्धाला प्रशासनाने तत्काळ मदत देण्याची मागणी आहे.

उरमोडी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात नित्रळ हे छोटे गाव आहे. काळेश्वरी डोंगराच्या पायथ्याला केदारनाथ मंदिराशेजारी ८ ते १0 घरांची वस्ती आहे. सोमवारी (दि. ८) दुपारी काही विघ्नसंतोषींनी काळेश्वरी डोंगरात वणवा लावला. ही आग स्थानिक लोकांच्या लक्षात आली नाही. लोक झोपी गेले. त्यानंतर ही आग वाढली. तिने रौद्ररूप घेतले. आगीमध्ये स्थानिकांनी लावलेली आंब्याची झाडे जळाली. दुर्मीळ वृक्षही जळून खाक झाले. तसेच नित्रळ येथील वृद्ध विठ्ठल गणू वांगडे यांच्या जुन्या घराला या आगीची झळ बसली. या आगीत या घरातील सागवानी लाकडे जळून खाक झाली. बघता-बघता हे घर कोसळले. आगीच्या झळा आणि धुरामुळे मध्यरात्रीनंतर स्थानिक लोकांना जाग आली. त्यांनी धरणातील पाणी आणून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र शेतामधील आंब्यांच्या शेकडो हुंड्यादेखील जळून खाक झाल्या. लोकांना जाग आल्याने पुढील अनर्थ टळला. लोक जागे झाले नसते तर ही आग आटोक्यात आली नसती. रात्रीतच सर्व घरांना तसेच फार्म हाऊस आणि आंब्याची बाग जळाली असती. मात्र लोक जागे झाल्याने पुढील अनर्थ टळला.

वनविभागाने गस्त वाढविण्याची मागणी

सातारा शहराच्या पश्चिम भागात डोंगरांची मोठी रांग आहे. या डोंगररांगेत विपुल वृक्षसंपदा आणि वन्यप्राणी, दुर्मीळ पक्षी पाहायला मिळतात. मागील आठवड्यापासून या डोंगररांगांना जागोजागी वणवा लागण्याच्या घटना घडल्या आहेत. काही विघ्नसंतोषी लोक नेमकी सायंकाळची वेळ साधून वणवे लावत असल्याने वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात आग वाढते. आग विझवताना अनेकांची होरपळ होते. मात्र, मर्यादित साधनांमुळे आग वाढून वनसंपदेचे मोठे नुकसान होत आहे. या परिस्थितीत वनविभागाने डोंगरभागात गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक लोक करीत आहेत.

जाळपट्टे काढले असते तर...

कास पठार, काळेश्वरीचा डोंगर, गणेशखिंड परिसर, पेढ्याचा भैरोबाचा डोंगर या भागांमध्ये गेल्या आठवड्यापासून वणवा लागण्याचे प्रमाण वाढलेले आहे. या डोंगरांमध्ये जाळपट्टेच काढले गेले नसल्याने आग आटोक्यात येत नाही. उलट ती आणखी वाढते. यासाठी वनविभागाने लोकसहभागातून जाळपट्टे काढावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.

कोट..

उरमोडी धरणाच्या कडेला आमचे जुने घर होते. त्यात लाखमोलाचे साहित्य जळून खाक झाले आहे. वणवा पेटवणाऱ्यांवर कारवाई करून आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.

- विठ्ठल वांगडे, नुकसानग्रस्त ग्रामस्थ, नित्रळ

फोटो ओळ : सातारा तालुक्यातील नित्रळ या गावातील जुने घर आगीत भस्मसात झाले.

फोटो नेम : ०९नित्रळ