शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वणव्याने गिळले वृद्धाचे घर; दुर्मीळ वनसंपदा बेचिराख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:38 IST

सातारा : सातारा तालुक्यातील उरमोडी धरणाकाठी वसलेल्या नित्रळ या गावातील स्थानिक वृद्ध शेतकऱ्याचे घर डोंगराला लावलेल्या आगीत भस्मसात झाले. ...

सातारा : सातारा तालुक्यातील उरमोडी धरणाकाठी वसलेल्या नित्रळ या गावातील स्थानिक वृद्ध शेतकऱ्याचे घर डोंगराला लावलेल्या आगीत भस्मसात झाले. वणव्याने एका वृद्धाचे घर आणि संसारोपयोगी साहित्य गिळले असून या वृद्धाला प्रशासनाने तत्काळ मदत देण्याची मागणी आहे.

उरमोडी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात नित्रळ हे छोटे गाव आहे. काळेश्वरी डोंगराच्या पायथ्याला केदारनाथ मंदिराशेजारी ८ ते १0 घरांची वस्ती आहे. सोमवारी (दि. ८) दुपारी काही विघ्नसंतोषींनी काळेश्वरी डोंगरात वणवा लावला. ही आग स्थानिक लोकांच्या लक्षात आली नाही. लोक झोपी गेले. त्यानंतर ही आग वाढली. तिने रौद्ररूप घेतले. आगीमध्ये स्थानिकांनी लावलेली आंब्याची झाडे जळाली. दुर्मीळ वृक्षही जळून खाक झाले. तसेच नित्रळ येथील वृद्ध विठ्ठल गणू वांगडे यांच्या जुन्या घराला या आगीची झळ बसली. या आगीत या घरातील सागवानी लाकडे जळून खाक झाली. बघता-बघता हे घर कोसळले. आगीच्या झळा आणि धुरामुळे मध्यरात्रीनंतर स्थानिक लोकांना जाग आली. त्यांनी धरणातील पाणी आणून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र शेतामधील आंब्यांच्या शेकडो हुंड्यादेखील जळून खाक झाल्या. लोकांना जाग आल्याने पुढील अनर्थ टळला. लोक जागे झाले नसते तर ही आग आटोक्यात आली नसती. रात्रीतच सर्व घरांना तसेच फार्म हाऊस आणि आंब्याची बाग जळाली असती. मात्र लोक जागे झाल्याने पुढील अनर्थ टळला.

वनविभागाने गस्त वाढविण्याची मागणी

सातारा शहराच्या पश्चिम भागात डोंगरांची मोठी रांग आहे. या डोंगररांगेत विपुल वृक्षसंपदा आणि वन्यप्राणी, दुर्मीळ पक्षी पाहायला मिळतात. मागील आठवड्यापासून या डोंगररांगांना जागोजागी वणवा लागण्याच्या घटना घडल्या आहेत. काही विघ्नसंतोषी लोक नेमकी सायंकाळची वेळ साधून वणवे लावत असल्याने वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात आग वाढते. आग विझवताना अनेकांची होरपळ होते. मात्र, मर्यादित साधनांमुळे आग वाढून वनसंपदेचे मोठे नुकसान होत आहे. या परिस्थितीत वनविभागाने डोंगरभागात गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक लोक करीत आहेत.

जाळपट्टे काढले असते तर...

कास पठार, काळेश्वरीचा डोंगर, गणेशखिंड परिसर, पेढ्याचा भैरोबाचा डोंगर या भागांमध्ये गेल्या आठवड्यापासून वणवा लागण्याचे प्रमाण वाढलेले आहे. या डोंगरांमध्ये जाळपट्टेच काढले गेले नसल्याने आग आटोक्यात येत नाही. उलट ती आणखी वाढते. यासाठी वनविभागाने लोकसहभागातून जाळपट्टे काढावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.

कोट..

उरमोडी धरणाच्या कडेला आमचे जुने घर होते. त्यात लाखमोलाचे साहित्य जळून खाक झाले आहे. वणवा पेटवणाऱ्यांवर कारवाई करून आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.

- विठ्ठल वांगडे, नुकसानग्रस्त ग्रामस्थ, नित्रळ

फोटो ओळ : सातारा तालुक्यातील नित्रळ या गावातील जुने घर आगीत भस्मसात झाले.

फोटो नेम : ०९नित्रळ