शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

मल्हारपेठमध्ये जुन्या वटवृक्षास लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:30 IST

महामार्गालगत अनेक झाडे असतात. मात्र, नजीकच्या शेतजमिनीवर त्याची सावली पडून पिकाला फटका बसत असल्यामुळे झाडांची कत्तल करण्याचे प्रकार वारंवार ...

महामार्गालगत अनेक झाडे असतात. मात्र, नजीकच्या शेतजमिनीवर त्याची सावली पडून पिकाला फटका बसत असल्यामुळे झाडांची कत्तल करण्याचे प्रकार वारंवार घडतात. मात्र, बांधकाम तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. मल्हारपेठ येथेही एका जुन्या वृक्षाला अज्ञाताकडून आग लावण्यात आली. स्थानिकांकडून हा वटवृक्ष वाचविण्यासाठी मोठ्या शर्थीने प्रयत्न करण्यात आले. मात्र, आगीमुळे वृक्षाचा बहुतांश भाग जळाला असून तो धोकादायक बनला आहे. येथे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात घडू शकतात. दुर्दैवाने येथे कोणताही गंभीर अपघात घडला आणि त्यात कोणतीही जीवितहानी झाली तर त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय स्थानिक मंडळी वारंवार अशा पद्धतीने या वटवृक्षाला आग लावत असून याबाबत तक्रारी करूनही कारवाई होत नाही.

वटवृक्षास आग लावण्यात आल्याने असे वृक्ष धोकादायक बनतात. त्यानंतर धोकादायक वृक्ष म्हणून त्याची तोड केली जाते. त्यामुळे असे प्रकार रोखणे अत्यावश्यक बनले आहे. याशिवाय वृक्षांना आग लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.