शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अहो आश्चर्यम ! बंद बोअरवेलमधून चालू आहे पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 15:04 IST

कायम स्वरूपी दुष्काळात होरपळणाºया खटाव तालुक्यातील गोपूज गावातील प्रगतशील शेतकरी पृथ्वीराज घार्गे यांनी जानेवारी २०१७ मध्ये गावच्या पश्चिमेस असणाºया आपल्या शेतात बोअर घेतली. त्यावेळी केवळ दिवसातून १० मिनिट चालणारी बोअर आता चक्क चालू न करता त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येत आहे.

ठळक मुद्देगोपूजमध्ये पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दीघार्गे यांच्यासह कुटुंबाला आनंद

औंध: कायम स्वरूपी दुष्काळात होरपळणाºया खटाव तालुक्यातील गोपूज गावातील प्रगतशील शेतकरी पृथ्वीराज घार्गे यांनी जानेवारी २०१७ मध्ये गावच्या पश्चिमेस असणाºया आपल्या शेतात बोअर घेतली. त्यावेळी केवळ दिवसातून १० मिनिट चालणारी बोअर आता चक्क चालू न करता त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येत आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत असून हे पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.

          ४ जानेवारी २०१७ रोजी पृथ्वीराज घार्गे यांनी आपल्या शेतात बागायत करण्याच्या हेतूने बोअरवेल घेतली. पण त्यांच्या पदरी निराशा पडली. कारण ती बोअरवेल जेमतेम १० मिनिटेच चालत असे, एवढ्याशा पाण्यावर शेती कशी करायची, या विचाराने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. 

बुधवार, दि.२७ रोजी घार्गे आपल्या शेतात गेले असता त्यांना बंद बोअरवेल मधून पाणी येत असल्याचे दिसून आले. पण त्यांचा विश्वास बसला नाही. पावसाचे साठलेले पाणी झिरपून पडत असावे, असे त्यांना वाटले. त्यानंतर त्यांनी बोअर अर्धा तास चालू करून बंद केली. मात्र, काही वेळाने पुन्हा त्यातून पाणी सुरू झाले. हे पाणी एक ते दीड इंचीच्या आकाराचे चालू राहिले.

त्यांनतर त्यांनी आपल्या मित्र मंडळी,ग्रामस्थांना हा प्रकार सांगितला त्याठिकाणी सर्वांनी जाऊन पाहिले तेव्हा सर्वजण आवाक झाले. विशेष म्हणजे त्यांच्या आसपास  तीन -चार बोअरवेल इतर शेतकºयांच्या आहेत. मात्र घार्गेंच्याच बोअरमधून पाणी येत असल्याने औत्सुक्याचा विषय ठरला आहे.

      कोण म्हणतय जास्त पावसाने बोअर उफाळून आली आहे  तर कोण म्हणतय ओव्हरफ्लो! काहीही असो आपल्या बोअरवेल ला पाणी भरपूर आले आहे व ते अजून चालूच आहे. या गोष्टीने पृथ्वीराज घार्गे यांच्यासह कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झालाय.