शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

प्रचाराला पदाधिकाऱ्यांची फौज

By admin | Updated: October 9, 2014 23:02 IST

आपापले भाग सांभाळणार : नेत्यांच्या खेळीमुळे लागलेल्या लॉटरीला आली जागण्याची वेळ

जगदीश कोष्टी - सातारा -ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापती निवडीत सदस्यांनी नेत्यांना खिंडित पकडण्याचा प्रयत्न केला अन् त्यातून अनेकांना पदांची लॉटरीही लागली. या लॉटरीला जागण्याची वेळ आता आली असून, आपापले भाग सांभाळण्यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी प्रचाराला लागले आहेत.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी गेल्या महिन्यात निवडी झाल्या. त्यावेळी अनेकजण इच्छुक होते. त्यातील काहींनी दबावही आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बेरजेचे राजकारण केले. त्यातून आपल्या मतदारसंघासाठी अडचणीचा ठरणार नाही, याचा विचार करून फलटणला माणिकराव सोनवलकर यांच्या रूपाने जिल्हा परिषद अध्यक्ष तर साताऱ्याला रवी साळुंखे यांच्या रूपाने उपाध्यक्षपद मिळाले.त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील आघाडीत बिघाडी झाली अन् सभापती निवडीत नाराज झालेल्या विधानसभा मतदारसंघांना प्रतिनिधीत्व देत माण-खटावला झुकते माप दिले. हे करत असताना जिल्हा परिषद सदस्य जेवढे आक्रमक होते, त्याहीपेक्षा नेत्यांच्या डोक्यात वेगळीच गणितं होती. त्यामुळे सभापतिपदाची लॉटरी लागली आहे. नेत्यांच्या आशीर्वादामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतिपद मिळाल्याने या लॉटरीला जागण्याची वेळ आली आहे. आपल्याला वरदहस्त असलेला नेता आमदार झाला तर आपला जिल्हा परिषद गट तसेच परिसराचा विकास करण्यासाठी निधी आणणे सोपे जाणार आहे. तसेच आता त्यांचा प्रचार केला तर भविष्यात हक्काने कामे करुन घेता येणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे आपापल्या भागात प्रचार करण्यामध्ये हे पदाधिकारी गुंतले आहेत. सभापतिपदाच्या निवडी दि. २ आॅक्टोबरला झाल्या. बहुतेकजण तेव्हापासून जिल्हा परिषदेत आलेलेच नाहीत. आचारसंहिता लागू असल्याने जिल्हा परिषदेत फारशी कामेही करता येत नाहीत. तसेच अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात असल्याने ही मंडळी आता निवडणूक झाल्यानंतरच येणार आहेत. कक्षांना कड्यासातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांच्या सभापतींच्या कक्षांना कड्या लावलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना सेवक मंडळी, ‘साहेब आज आले नाहीत,’ असे सांगत आहेत.जिल्हा परिषदेच्या पदाधिकारीची संधी मिळालेले सहाही जण प्रचाराला लागले आहोत. हे करत असताना आपापले गट पाहून सामाजिक परिस्थितीनुसार प्रचार करणार आहे.- माणिकराव सोनवलकर,अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा. विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी ठराविक असा भाग वाटून घेतला नसून, जेथे गरज असेल त्या ठिकाणी प्रचाराला जात आहे. - रवी साळुंखे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद