शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

लिपिकांच्या आंदोलनात पदाधिकाऱ्यांची उडी

By admin | Updated: July 19, 2016 23:53 IST

सामान्य नागरिकांची परवड : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नरळे, उपाध्यक्ष साळुंखेंनी पाठविले मुख्यमंत्र्यांना पत्र

सातारा : जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे व उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेलवरून पत्र व्यवहार केला. लिपिकांच्या लेखणी बंद आंदोलनाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे. याबाबत सरकार काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. आंदोलन मंगळवारी पाचव्या दिवशीही सुरूच होते. जिल्हा परिषदेसह पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी त्यामुळे जनसामान्य लोकांची कामे ठप्प झाली आहेत.ग्रेड पे सुधारणा व्हावी, प्रशासकीय बदल्यांचे अन्यायकारक धोरण रद्द व्हावे, अतिकालीक भत्ता मिळावा, पदवीधर वेतनश्रेणी लागू व्हावी, निमशासकीय कर्मचाऱ्यांऐवजी शासकीय कर्मचारी म्हणून संबोधले जावे. अशा विविध पंधरा मागण्यांसाठी राज्यभर जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्रे आदी ठिकाणच्या सहाशेहून अधिक लिपिकांनी यात सहभाग घेतला आहे. सोमवारी सकाळीही हजेरीपत्रकावर सह्या करून कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद ठेवणेच पसंत केले. साहजिकच या सगळ्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांच्या कामावर होत आहे. आपल्या न्याय मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याबाबत लिपिक ठाम असल्याने मोठी कोंडी होऊन बसली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे व उपाध्यक्ष रवींद्र साळुंखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मेलद्वारे पत्रव्यवहार केला आहे. या आंदोलनात सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील सर्व कार्यालयातील लिपिकांनी शंभर टक्के सहभाग घेतला असून, सर्व कामकाज ठप्प आहे. आंदोलनाची तीव्रता बघता आंदोलन असेच पुढे सुरू ठेवण्याबाबत संघटना आग्रही आहे. परिणामी लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तरी आंदोलकांच्या मागण्यांबाबत आपल्या स्तरावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या नियमाला धरून आहेत. त्यासाठी ग्रामविकास मंत्री व त्यांच्या अधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मागण्या समजून घेतल्या पाहिजेत. यापूर्वीही आम्ही निवेदने दिली आहेत. ग्रामविकास खात्याच्या राज्यमंत्र्यांशी एकदा भेटही झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनाही निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी लक्ष घालून अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावावा. - शंकर धुलुगडे, मार्गदर्शकसातारा जिल्हा लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना