शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडायचे नाही!

By admin | Updated: September 11, 2015 00:46 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : ३० सप्टेंबरपर्यंत मंजूर रजेशिवाय कुठेही जायचे नाही

लोकमतचा प्रभाव सातारा : जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हेडक्वॉर्टर न सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ‘दुष्काळप्रश्नी अधिकाऱ्यांना घरातून बाहेर काढा’ असे विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी काढले होते. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेत असंख्य अधिकारी सुटीला गावाकडे असतात, हे निष्पन्न झाले. यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या सूचना केल्या आहेत. ३० सप्टेंबरच्या आधी कोणीही मंजूर रजेशिवाय सुटीवर जायचे नाही, गेल्यास संबंधितावर आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी अश्विन मुदगल यांनी दिला आहे. जिल्ह्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नसल्याने भयानक दुष्काळ पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. दुष्काळी तालुक्यांमध्ये पावसाअभावी खरीप पिके वाया जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जनावरांना चाराही उपलब्ध नाही. प्रशासनाने १५८ दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचा दावा केला असला तरी फलटण, माण, खटाव तालुक्यांत प्रचंड चारा टंचाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत सजग राहण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)