शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

अधिकाऱ्यांना वाळलेल्या पिकांची भेट

By admin | Updated: May 25, 2017 23:15 IST

अधिकाऱ्यांना वाळलेल्या पिकांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देण्यात टाळाटाळ करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना पाण्याअभावी जळालेल्या व वाळलेल्या पिकांची भेट देवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना वीज पंपासाठी तातडीने कनेक्शन न दिल्यास आणखी तीव्र स्वरूपात आंदोलनाचा इशारा मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी दिला आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महावितरण कंपनी आणि राज्य शासनातील परस्पर समन्वय आणि उदासीन यंत्रणेमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना शेतीपंप कनेक्शन मिळत नाही. राज्य सरकारकडून वेळेत अनुदान येत नसल्याने नवीन पंपांची कनेक्शन रखडली असून पाण्याअभावी पिके जळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या प्रश्नी तातडीने उपाययोजना होणे अपेक्षित असतानाही संबंधित यंत्रणेची डोळेझाक होत आहे. जिल्ह्यातील अनेक नागरिकांची शेतीवरच उपजीविका असून निसर्गाच्या अवकृपेमुळे विहीर, नदी, कॅनॉल, तलाव आदी ठिकाणच्या पाण्यावरच पिके घ्यावी लागतात. शेतात पाणी नेण्यासाठी डिझेल पंप किंवा विद्युत पंपाचा वापर अनिवार्य ठरतो. डिझेल इंधन वापरण्यासाठी आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने बहुतेक सर्व शेतकरी वीज वितरण कंपनीकडून वीज कनेक्शन घेवून त्याद्वारे पाणी उपसा करतात व पिकास पाणी देतात. मात्र, कनेक्शन देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य असूनही महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांची गैरसोय होईल, अशीच कृती केली जात आहे. ज्या प्रमाणात मागणी आहे. त्या तुलनेत कनेक्शन दिले जात नसल्याने दिसून येत आहे. शेती पंपाची कनेक्शन मिळण्यासाठी महावितरणकडे केल्या जाणाऱ्या अर्जांना केवळ फाईल बंद ठेवण्यातच संबंधित अधिकारी धन्यता मानताना दिसत आहे. वेळोवेळी पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.गोरगरीब व सर्वसामान्य शेतकरी पीक कर्जाच्या रुपाने पैसे बाजूला ठेवून शेतीपंपासाठी अर्ज करतात. त्यासाठी पंपखरेदी करून अन्य सर्व प्रकारची तयारी करतात. मात्र, मीटर आणि खंबाच्या अभावामुळे शेतकऱ्यांना कनेक्शन घेता येत नाही.