शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी धावले कुसुंबीमुऱ्याला !

By admin | Updated: February 18, 2015 23:46 IST

गार्इंचा मृत्यू : प्रशासनाला खडबडून जाग

कुडाळ : अज्ञात आजाराने कुसुंबीमुऱ्हा (ता. जावळी) येथे दुभत्या गाई दगावत असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या दुर्गम गावाला अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांना तातडीने पशुवैद्यकीय सुविधा देण्यात येईल, असे आश्वासन पंचायत समितीचे सभापती सुहास गिरी यांनी दिले.कुसुंबीमुऱ्हा येथे १८ जनावरे अज्ञात आजाराने दगावल्याची बातमी ‘लोकमत’च्या बुधवारच्या (दि. १८) अंकात प्रसिद्ध झाली होती. या आजाराचे नाव ‘बोटॅलिजम’ (हळव्या) असे असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर. डी. कदम यांनी दिली. गेल्या एक महिन्यापासूनच कुसुंबीमुऱ्हा येथील शेतकऱ्यांच्या जनावरांना दुर्धर आजाराने त्रस्त केले आहे. गार्इंचे मागचे पाय निकामी होऊन ती बसून राहते आणि चोवीस तासांत तिचा मृत्यू होतो, असे आढळून आले होते. याविषयीचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. कोणाची किती जनावरे दगावली, याचीही माहिती दिली होती. या गावात एका पाठोपाठ एक अशा १८ गार्इंचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांना पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची कोणतीही मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांची प्रचंड आर्थिक हानी झाली. तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांपुढे कैफियत मांडूनही याकडे लक्ष दिले जात नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीचा रोष होता.जनावरे दगावत असताना पशुसंवर्धन विभागाने कागदी घोडे नाचविले, असे शेतकरी शशिकांत आखाडे यांनी सांगितले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)++कुसुंबीमुऱ्हा येथे झालेल्या प्रकाराची माहिती मी तालुका पशुसंवर्धन विस्तार अधिकाऱ्यांकडून मागविली असून, दिरंगाईस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल.- डॉ. आर. डी. कदम,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीलोकमतचादणका