शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

अधिकारी धावले कुसुंबीमुऱ्याला !

By admin | Updated: February 18, 2015 23:46 IST

गार्इंचा मृत्यू : प्रशासनाला खडबडून जाग

कुडाळ : अज्ञात आजाराने कुसुंबीमुऱ्हा (ता. जावळी) येथे दुभत्या गाई दगावत असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या दुर्गम गावाला अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांना तातडीने पशुवैद्यकीय सुविधा देण्यात येईल, असे आश्वासन पंचायत समितीचे सभापती सुहास गिरी यांनी दिले.कुसुंबीमुऱ्हा येथे १८ जनावरे अज्ञात आजाराने दगावल्याची बातमी ‘लोकमत’च्या बुधवारच्या (दि. १८) अंकात प्रसिद्ध झाली होती. या आजाराचे नाव ‘बोटॅलिजम’ (हळव्या) असे असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर. डी. कदम यांनी दिली. गेल्या एक महिन्यापासूनच कुसुंबीमुऱ्हा येथील शेतकऱ्यांच्या जनावरांना दुर्धर आजाराने त्रस्त केले आहे. गार्इंचे मागचे पाय निकामी होऊन ती बसून राहते आणि चोवीस तासांत तिचा मृत्यू होतो, असे आढळून आले होते. याविषयीचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. कोणाची किती जनावरे दगावली, याचीही माहिती दिली होती. या गावात एका पाठोपाठ एक अशा १८ गार्इंचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांना पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची कोणतीही मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांची प्रचंड आर्थिक हानी झाली. तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांपुढे कैफियत मांडूनही याकडे लक्ष दिले जात नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीचा रोष होता.जनावरे दगावत असताना पशुसंवर्धन विभागाने कागदी घोडे नाचविले, असे शेतकरी शशिकांत आखाडे यांनी सांगितले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)++कुसुंबीमुऱ्हा येथे झालेल्या प्रकाराची माहिती मी तालुका पशुसंवर्धन विस्तार अधिकाऱ्यांकडून मागविली असून, दिरंगाईस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल.- डॉ. आर. डी. कदम,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीलोकमतचादणका