शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

आरोग्य केंद्राला अधिकाऱ्याचे वावडे

By admin | Updated: July 27, 2015 00:18 IST

खटावमधील स्थिती : वैद्यकीय सेवेअभावी रुग्णांची खासगी रुग्णालयांकडे धाव

खटाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नसल्याने रुग्णांनी मोठी परवड होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही परिस्थिती जैसे थे असल्याने आता रुग्णांनीच आरोग्य केंद्राकडे पाठ फिरवली आहे. हे आरोग्य केंद्र म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.खटावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असताना याठिकाणी केवळ एकच वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेकदा उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्याविना गैरसोय होते. त्यामुळे रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठ फिरवली आहे.सर्व सामान्य नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून औषधोपचार मोफत मिळावेत, याकरिता शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याने खटावसह परिसरातील रुग्णांना सातारा, कोरेगाव किंवा वडूज या ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे.किरकोळ अपघात किंवा एखादी घटना घडल्यानंतर संबंधित रुग्णाला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात आणले जाते. मात्र, डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाला खासगी रुग्णालयात पाठवावे लागत आहे. या सर्व धावपळीत जर एकादा रुग्ण दगावला तर कोणाला दोषी धरायचे? असा प्रश्न ग्रामस्थांपुढे उभा ठाकला आहे. प्रशासनाने या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियुक्ती करून रुग्णांची होणारी परवड थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)एकाच अधिकाऱ्यावर मदारखटावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत १९ गावे, १७ ग्रामपंचायती तर सहा उपकेंद्रे आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीकरिता येणाऱ्या रुग्णांची सतत वर्दळ असते. परंतु गेल्या काही वर्षापासून हे प्राथमिक आरोग्य केंद्र एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर चालवले जात आहे.आज नाही उद्या या...प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवासी राहणे बंधनकारक असून देखील येथे वैद्यकीय अधिकारी राहताना दिसत नाहीत. सध्या कोणत्याच अधिकाऱ्याकडे रुग्णालयाचा पद्भार नाही. त्यामुळे डिस्कळ किंवा मायणी येथून डॉक्टर तपासणीकरिता येत आहेत.गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात तपासणीकरिता येत आहे. परंतु प्रत्येक वेळी डॉक्टर नसल्याचे निदर्शनास येत आहे. कर्मचाऱ्यांकडूनही डॉक्टर नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मी शेवटी खासगी रुग्णालयात तपासणीकरिता जाण्याचा निर्णय घेतला आहे.- विकास फडतरे, ग्रामस्थआजारामुळे गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात हेलपाटे मारत आहे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्यामुळे ताडकळत बसावे लागत आहे. वैद्यकीय सेवेअभावी रुग्णांची हेळसांड होत असून, हे किती दिवस चालणार आहे.- तानाजी मोरे, ग्रामस्थ