शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

एकास एक उमेदवार देऊ

By admin | Updated: February 13, 2015 00:50 IST

मनोज घोरपडे : मत्त्यापूरला ‘स्वाभिमानी’ कार्यकर्त्यांची बैठक

कऱ्हाड : ‘सह्याद्री कारखान्याच्या सभासदांच्या भावना ध्यानात घेऊन या निवडणुकीत दोन पावले पुढे-मागे करत एकास एक उमेदवार देऊन यश खेचून आणू,’ असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोज घोरपडे यांनी केले. मत्यापूर, ता. सातारा येथे सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कऱ्हाड उत्तरचे स्वाभिमानीचे अध्यक्ष सचिन नलवडे, धनाजी शिंदे, भरत गायकवाड, संदीप माने, महेश चव्हाण, महेश कदम, कृष्णत शेडगे, वैभव चव्हाण, रोहित माने, लक्ष्मण ताटे, विकास घोरपडे, अंजनकुमार घाडगे, धनाजी जाधव, सचिन पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. घोरपडे म्हणाले, ‘विद्यमान सत्ताधाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्र्त्यांची ताकद समजली आहे. कमी कालावधीत तुमच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे मला मिळालेली मते नक्कीच दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. प्रस्थापितांच्या विरोधात असणारे नकारात्मक मतदान एकत्रित करण्यात यश आले. तर सह्याद्रीचा निकाल सांगण्याची गरज उरणार नाही. त्यासाठी पाऊल थोडेसे पुढे-मागे करावे लागेल, एकास एकच उमेदवार द्यावा लागेल. यासाठी कार्यकर्त्यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.’ अंजनकुमार घाडगे म्हणाले, ‘सह्याद्री हा जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा कारखाना मानला जातो. मात्र, शेतकऱ्यांना ऊसदर देताना हा त्यांचा क्रमांक कोठे जातो, हे माहीत नाही. यापूर्वी उसाची काटामारी या कारखान्यात नेहमीच झाली आहे. पण यावर्षी एफआरपी चोरण्याचे काम सुरू आहे. गेली दहा वर्षे बिनविरोध सत्ता आयती मिळाल्याने सभासदांना व शेतकऱ्यांना किंमत उरलेली दिसत नाही. त्यामुळे सभासदांना त्यांची किंमत आणि हक्क मिळवून देण्यासाठी ही लढाई महत्त्वाची आहे.’ यावेळी अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कारखान्याच्या एककल्ली कारभारावर टीका केली अन् एकत्र येऊन हे ‘भूत’ एकदा खाली उतरवूया, अशा भावना व्यक्त केल्या.(प्रतिनिधी)