शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

एकास एक उमेदवार देऊ

By admin | Updated: February 13, 2015 00:50 IST

मनोज घोरपडे : मत्त्यापूरला ‘स्वाभिमानी’ कार्यकर्त्यांची बैठक

कऱ्हाड : ‘सह्याद्री कारखान्याच्या सभासदांच्या भावना ध्यानात घेऊन या निवडणुकीत दोन पावले पुढे-मागे करत एकास एक उमेदवार देऊन यश खेचून आणू,’ असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोज घोरपडे यांनी केले. मत्यापूर, ता. सातारा येथे सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कऱ्हाड उत्तरचे स्वाभिमानीचे अध्यक्ष सचिन नलवडे, धनाजी शिंदे, भरत गायकवाड, संदीप माने, महेश चव्हाण, महेश कदम, कृष्णत शेडगे, वैभव चव्हाण, रोहित माने, लक्ष्मण ताटे, विकास घोरपडे, अंजनकुमार घाडगे, धनाजी जाधव, सचिन पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. घोरपडे म्हणाले, ‘विद्यमान सत्ताधाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्र्त्यांची ताकद समजली आहे. कमी कालावधीत तुमच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे मला मिळालेली मते नक्कीच दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. प्रस्थापितांच्या विरोधात असणारे नकारात्मक मतदान एकत्रित करण्यात यश आले. तर सह्याद्रीचा निकाल सांगण्याची गरज उरणार नाही. त्यासाठी पाऊल थोडेसे पुढे-मागे करावे लागेल, एकास एकच उमेदवार द्यावा लागेल. यासाठी कार्यकर्त्यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.’ अंजनकुमार घाडगे म्हणाले, ‘सह्याद्री हा जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा कारखाना मानला जातो. मात्र, शेतकऱ्यांना ऊसदर देताना हा त्यांचा क्रमांक कोठे जातो, हे माहीत नाही. यापूर्वी उसाची काटामारी या कारखान्यात नेहमीच झाली आहे. पण यावर्षी एफआरपी चोरण्याचे काम सुरू आहे. गेली दहा वर्षे बिनविरोध सत्ता आयती मिळाल्याने सभासदांना व शेतकऱ्यांना किंमत उरलेली दिसत नाही. त्यामुळे सभासदांना त्यांची किंमत आणि हक्क मिळवून देण्यासाठी ही लढाई महत्त्वाची आहे.’ यावेळी अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कारखान्याच्या एककल्ली कारभारावर टीका केली अन् एकत्र येऊन हे ‘भूत’ एकदा खाली उतरवूया, अशा भावना व्यक्त केल्या.(प्रतिनिधी)