शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

अर्ज माघारीसाठी उमेदवारांना लाखोंची ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST

रहिमतपूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी भरलेला अर्ज माघारी घेण्यासाठी विरोधी पॅनेलकडून उमेदवारांना लाखोंची ऑफर दिली जात असल्याची चर्चा आहे. उमेदवारांचा ...

रहिमतपूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी भरलेला अर्ज माघारी घेण्यासाठी विरोधी पॅनेलकडून उमेदवारांना लाखोंची ऑफर दिली जात असल्याची चर्चा आहे. उमेदवारांचा भाव वधारला असला तरी, जनमताच्या पाठबळावर उभ्या राहिलेल्या उमेदवाराकडून लाखोंची ऑफर धुडकावून निवडणुकीच्या मैदानात थेट सामना करण्याचे खुले आव्हान दिले जात आहे.

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील वाठार, किरोली, तारगाव, साप, धामणेर, सायगाव, सासुर्वे, सुर्ली, रिकिबदारवाडी, दुर्गवाडी, काळोशी आदी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. अर्ज माघारी घेण्याचा कालावधी सोमवारी दुपारी तीन वाजता संपला. तत्पूर्वी दोन दिवस काही गावांतील उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखवली जात होती. यामध्ये अगदी एक ते दीड लाख रुपये देतो व सोसायटीध्ये पाच वर्षे चेअरमन करतो, आदी ऑफरचा समावेश आहे. आपल्या वॉर्डामधील मतदारांचे पाठबळ असलेल्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतला, तर आपला मार्ग सुकर होईल, या आशेने आणि लढत झाली तर आपला पराभव अटळ आहे, या भीतीने काही जणांकडून या उचापती केल्या जात होत्या. परंतु कुठल्याही ऑफरला किंवा आमिषाला बळी न पडता निर्भयपणे लढतीला सामोरे जाण्याच्या तयारीमुळे, भानगडी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

काही जणांकडून विरोधी उमेदवाराला अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव टाकण्याचे प्रयत्न केले जात होते. यासाठी उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्याची नोकरी घालविण्याची भीती दाखवली जात होती. मात्र, संबंधित उमेदवारानेही नोकरी घालविण्याची भीती दाखवणाऱ्याच्या वरती आपली पोहोच असल्याचे दाखवून दिल्याने, भानगडखोरीला चांगलाच लगाम बसला आहे. शेरास सव्वाशेर भेटल्याने राजकीय अस्तित्व पणाला लागलेल्या आणि दारुण होणारा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने जनमत नसलेल्या उचापती करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत योग्य उमेदवाराच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहते. मतासाठी जेवणावळी व आमिष दाखविण्याची गरज त्यांनाच पडते, ज्यांच्यामागे जनमत नाही. जेवणावळी घालणाऱ्यांना जनता कधीच पाठबळ देत नाही, याचा प्रत्यय अनेक निवडणुकीत जेवणावळी घालून निवडणुका जिंकण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना आलेला आहे. तरीही निवडणुका आल्या की अंगात येणाऱ्यांच्या गमती जमती पाहून मतदारांसह ग्रामस्थांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. या उचापतखोरांच्या भानगडींची चर्चा गावातील पारावर व चौका-चौकात चांगलीच रंग रंगत आहे.

(ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान असा लोगो वापरावा