शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

अर्ज माघारीसाठी उमेदवारांना लाखोंची ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST

रहिमतपूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी भरलेला अर्ज माघारी घेण्यासाठी विरोधी पॅनेलकडून उमेदवारांना लाखोंची ऑफर दिली जात असल्याची चर्चा आहे. उमेदवारांचा ...

रहिमतपूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी भरलेला अर्ज माघारी घेण्यासाठी विरोधी पॅनेलकडून उमेदवारांना लाखोंची ऑफर दिली जात असल्याची चर्चा आहे. उमेदवारांचा भाव वधारला असला तरी, जनमताच्या पाठबळावर उभ्या राहिलेल्या उमेदवाराकडून लाखोंची ऑफर धुडकावून निवडणुकीच्या मैदानात थेट सामना करण्याचे खुले आव्हान दिले जात आहे.

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील वाठार, किरोली, तारगाव, साप, धामणेर, सायगाव, सासुर्वे, सुर्ली, रिकिबदारवाडी, दुर्गवाडी, काळोशी आदी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. अर्ज माघारी घेण्याचा कालावधी सोमवारी दुपारी तीन वाजता संपला. तत्पूर्वी दोन दिवस काही गावांतील उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखवली जात होती. यामध्ये अगदी एक ते दीड लाख रुपये देतो व सोसायटीध्ये पाच वर्षे चेअरमन करतो, आदी ऑफरचा समावेश आहे. आपल्या वॉर्डामधील मतदारांचे पाठबळ असलेल्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतला, तर आपला मार्ग सुकर होईल, या आशेने आणि लढत झाली तर आपला पराभव अटळ आहे, या भीतीने काही जणांकडून या उचापती केल्या जात होत्या. परंतु कुठल्याही ऑफरला किंवा आमिषाला बळी न पडता निर्भयपणे लढतीला सामोरे जाण्याच्या तयारीमुळे, भानगडी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

काही जणांकडून विरोधी उमेदवाराला अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव टाकण्याचे प्रयत्न केले जात होते. यासाठी उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्याची नोकरी घालविण्याची भीती दाखवली जात होती. मात्र, संबंधित उमेदवारानेही नोकरी घालविण्याची भीती दाखवणाऱ्याच्या वरती आपली पोहोच असल्याचे दाखवून दिल्याने, भानगडखोरीला चांगलाच लगाम बसला आहे. शेरास सव्वाशेर भेटल्याने राजकीय अस्तित्व पणाला लागलेल्या आणि दारुण होणारा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने जनमत नसलेल्या उचापती करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत योग्य उमेदवाराच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहते. मतासाठी जेवणावळी व आमिष दाखविण्याची गरज त्यांनाच पडते, ज्यांच्यामागे जनमत नाही. जेवणावळी घालणाऱ्यांना जनता कधीच पाठबळ देत नाही, याचा प्रत्यय अनेक निवडणुकीत जेवणावळी घालून निवडणुका जिंकण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना आलेला आहे. तरीही निवडणुका आल्या की अंगात येणाऱ्यांच्या गमती जमती पाहून मतदारांसह ग्रामस्थांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. या उचापतखोरांच्या भानगडींची चर्चा गावातील पारावर व चौका-चौकात चांगलीच रंग रंगत आहे.

(ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान असा लोगो वापरावा