शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

जिल्ह्यातील दगडखाणींच्या लिलावावर हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या दगड खाणींचा लिलावप्रक्रियावर संबंधित व्यावसायिक यांच्या वतीने हरकती नोंदवण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या दगड खाणींचा लिलावप्रक्रियावर संबंधित व्यावसायिक यांच्या वतीने हरकती नोंदवण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महसूलमंत्र्यांनी कोणताही निर्णय घेतला नसताना जिल्हा प्रशासन लिलावप्रक्रिया राबवित असल्याने भविष्यामध्ये मोठा गोंधळ निर्माण होऊन व्यावसायिकांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे या व्यावसायिकांनी हरकती नोंदवलेल्या आहेत.

याप्रकरणी संबंधित व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मौजे नागेवाडी गट नंबर ३०८/१ येथील दगडखाणीपर्यंत जाण्यासाठी कुठलाही सरकारी रस्ता उपलब्ध नाही. सर्व रस्ते हे खासगी मालकीच्या जागेतून जातात. तरी सर्वप्रथम आपण दगडखाणीपर्यंत जाण्यासाठी सरकार रस्ता उपलब्ध करावा.

लिलावासाठीचे प्लॉट पडलेले आहेत, त्याच जागेवर चिन्हांकन केले नाही. त्यामुळे फक्त कागदोपत्री प्लॉट बघून कशाचा अंदाज येत नाही. डोंगरामध्ये पाहिजे असलेला प्लॉट नक्की कुठे येतो, हे कळतच नाही. प्लॉटची लांबी व रुंदी त्याची उंची याचे जागेवर चिन्हांकन केल्याशिवाय कुठल्याही लाभधारकास हा लिलाव घेणे शक्य नाही.

कागदावर नकाशा बघताना डोंगरापर्यंत असे रुंदी कमी आणि लांबीच्या असे प्लॉट पडलेली दिसतात. सध्या जिथे खाणी आहे त्या खाणीकडे जाणारे रस्ते सुद्धा लिलावाच्या प्लॉटमध्ये धरलेले नाहीत आता जेथे खानीसमोर निरुपयोगी मुरूम व दगड साठविण्यासाठी दिलेली मोकळी जागा तेसुद्धा लिलावमध्ये झालेली आहे, हे अतिशय चुकीचे आहे.

या लिलावात जे ब्रास धरलेले आहेत. काही कारणांनी किंवा ओव्हर बर्डन काढताना वेळ लागला आणि अपेक्षित उत्खनन झाले नाही तर किती रॉयल्टी बघायची याचा कुठेही उल्लेख नाही आणि एवढे मोठे प्रमाणात वर झालेले आहेत की बोर ब्लास्टिंग शिवाय खान चालवणे शक्य नाही तरी बोर ब्लास्टिंगची परवानगी मिळणार का याबाबत खुलासा करावा.

खान कामासाठी दोन हेक्टर योग्य क्षेत्र पकडले आहे. मात्र त्यातील ३६ गुंठे क्षेत्र उत्खनन करता येणार आहे. बाकी सर्व क्षेत्रे निरोपयोगी आहे. डिपॉझिट आकारणी मायनिंग प्लॅन व पर्यावरण मंजुरी हे दोन एकरसाठी घ्यावी लागणार आहे, ही बाब अन्यायकारक आहे.

वडार समाज याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे काय

सातारा जिल्हा वडार महासंघ यांनी त्यांच्या मागण्यांसाठी हायकोर्ट येथे पिटीशन दाखल केले होते. या पिटीशनवर हायकोर्ट यांनी, असा आदेश पारित केला की या वडार समाजाच्या मागण्यांवर महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य आणि चार आठवड्यांमध्ये योग्य तो निर्णय घ्यावा, असे असताना महसूलमंत्री यांच्या निर्णयाच्या आधीच प्रशासनाने लिलाव जाहीर केला आहे.