शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

पोषण भत्ता उठू शकतो लेकरांच्या जिवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

सातारा : जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तिसरी लाट लहानग्यांसाठी घातक असल्याने शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ...

सातारा : जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तिसरी लाट लहानग्यांसाठी घातक असल्याने शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे उन्हाळ्यातील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात न आल्याने त्याची रक्कम बँकेत जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे खाते उघडायला पालक मुलांसह बँकेत जाऊन गर्दी करत आहेत. त्यामुळे आहार भत्ता विद्यार्थ्यांच्या जिवावर उठू नये अशी भावना व्यक्त केली जात आहे.

उन्हाळ्यातील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात आला नाही. त्याऐवजी आहाराची तेवढी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या आदेशाने पालक वर्गात गोंधळ उडाला आहे, कारण १५० रुपयांच्या रकमेसाठी बँक खाते उघडावे लागणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी हजार रुपये भरावे लागत आहेत. ही रक्कम खात्यात जमा करण्याऐवजी थेट शाळेतून प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आली असती तर कोविड काळातील पालकांचा हा त्रास वाचला असता.

केंद्राची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आहे. याअंतर्गत शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. शाळा सुरू असते तेव्हा विद्यार्थ्यांना तांदळाचे वाटप केले जाते. मात्र १५ एप्रिल ते १५ जून हा उन्हाळ्याच्या सुट्टीचा काळ व लॉकडाऊन यामुळे विद्यार्थी या आहारापासून वंचित राहिले. या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेच्या खर्चाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे.

पोषण आहारांतर्गत पहिली ते पाचवी इयत्तीतील एका विद्यार्थ्याला ४ रुपये ४० पैसेप्रमाणे ३५ दिवसांचे १५६ रुपये ८ पैसे, तर सहावी ते आठवी इयत्तेतील एका विद्यार्थ्याला ६ रुपये ७१ पैसे एका दिवसाचे देण्यात येणार आहेत. म्हणजे २३४ रुपये ८५ पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. विद्यार्थ्यांच्या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यास हजार रुपये लागतात. यामुळे पालकांसमोर पेच पडला आहे. येणाऱ्या रकमेपेक्षा बँक खाते उघडण्यास जास्त रक्कम द्यावी लागणार आहे. मग बँक खाते उघडावे की नाही, असा प्रश्न पालकांसमोर पडला आहे.

चौकट :

माझी मुलगी पाचवीत शिकते. शालेय पोषण आहाराची रक्कम तिच्या खात्यात १५६ रुपये जमा होणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी गेलो तर हजार रुपये लागतील असे सांगण्यात आले. शून्य टक्के रकमेवर आता खाते काढले जात नाही असे उत्तर बँकेने दिले. आता १५६ रुपयांसाठी हजार रुपये भरावेत का? असा प्रश्न आहे.

- आशा महामुलकर, गोडोली

खाते नाही उघडले तर म्हणे शिक्षक जबाबदार!

एकीकडे तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना कोरोनाचा धोका आहे म्हणून काळजी घ्या म्हणायचे आणि दुसरीकडे बँकेत खाते काढण्यासाठी गर्दीत जाण्यास भाग पाडायचे हे विद्यार्थ्यांना मृत्यूच्या दाढेतून ढकलणाऱ्या अधिकाऱ्यांना काय म्हणायचे? असा प्रश्न पालकांना पडला आहे. शिक्षण विभागातील अधिकारी यांनी सक्त आदेश देत खाती नाही उघडली तर शिक्षक जबाबदार, असे म्हटल्याने पालकांनी खाते उघडावे यासाठी शिक्षकांनी तगादा लावला आहे. यामुळे वैतागलेल्या पालकांनी व्यावहारिकदृष्ट्या हे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले आहे.