शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पोषण भत्ता उठू शकतो लेकरांच्या जिवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

सातारा : जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तिसरी लाट लहानग्यांसाठी घातक असल्याने शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ...

सातारा : जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तिसरी लाट लहानग्यांसाठी घातक असल्याने शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे उन्हाळ्यातील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात न आल्याने त्याची रक्कम बँकेत जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे खाते उघडायला पालक मुलांसह बँकेत जाऊन गर्दी करत आहेत. त्यामुळे आहार भत्ता विद्यार्थ्यांच्या जिवावर उठू नये अशी भावना व्यक्त केली जात आहे.

उन्हाळ्यातील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात आला नाही. त्याऐवजी आहाराची तेवढी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या आदेशाने पालक वर्गात गोंधळ उडाला आहे, कारण १५० रुपयांच्या रकमेसाठी बँक खाते उघडावे लागणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी हजार रुपये भरावे लागत आहेत. ही रक्कम खात्यात जमा करण्याऐवजी थेट शाळेतून प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आली असती तर कोविड काळातील पालकांचा हा त्रास वाचला असता.

केंद्राची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आहे. याअंतर्गत शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. शाळा सुरू असते तेव्हा विद्यार्थ्यांना तांदळाचे वाटप केले जाते. मात्र १५ एप्रिल ते १५ जून हा उन्हाळ्याच्या सुट्टीचा काळ व लॉकडाऊन यामुळे विद्यार्थी या आहारापासून वंचित राहिले. या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेच्या खर्चाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे.

पोषण आहारांतर्गत पहिली ते पाचवी इयत्तीतील एका विद्यार्थ्याला ४ रुपये ४० पैसेप्रमाणे ३५ दिवसांचे १५६ रुपये ८ पैसे, तर सहावी ते आठवी इयत्तेतील एका विद्यार्थ्याला ६ रुपये ७१ पैसे एका दिवसाचे देण्यात येणार आहेत. म्हणजे २३४ रुपये ८५ पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. विद्यार्थ्यांच्या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यास हजार रुपये लागतात. यामुळे पालकांसमोर पेच पडला आहे. येणाऱ्या रकमेपेक्षा बँक खाते उघडण्यास जास्त रक्कम द्यावी लागणार आहे. मग बँक खाते उघडावे की नाही, असा प्रश्न पालकांसमोर पडला आहे.

चौकट :

माझी मुलगी पाचवीत शिकते. शालेय पोषण आहाराची रक्कम तिच्या खात्यात १५६ रुपये जमा होणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी गेलो तर हजार रुपये लागतील असे सांगण्यात आले. शून्य टक्के रकमेवर आता खाते काढले जात नाही असे उत्तर बँकेने दिले. आता १५६ रुपयांसाठी हजार रुपये भरावेत का? असा प्रश्न आहे.

- आशा महामुलकर, गोडोली

खाते नाही उघडले तर म्हणे शिक्षक जबाबदार!

एकीकडे तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना कोरोनाचा धोका आहे म्हणून काळजी घ्या म्हणायचे आणि दुसरीकडे बँकेत खाते काढण्यासाठी गर्दीत जाण्यास भाग पाडायचे हे विद्यार्थ्यांना मृत्यूच्या दाढेतून ढकलणाऱ्या अधिकाऱ्यांना काय म्हणायचे? असा प्रश्न पालकांना पडला आहे. शिक्षण विभागातील अधिकारी यांनी सक्त आदेश देत खाती नाही उघडली तर शिक्षक जबाबदार, असे म्हटल्याने पालकांनी खाते उघडावे यासाठी शिक्षकांनी तगादा लावला आहे. यामुळे वैतागलेल्या पालकांनी व्यावहारिकदृष्ट्या हे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले आहे.