शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २ लाख पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

सातारा जिल्ह्यात शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रभाव गत दोन वर्षांत ‌वाढलेला आहे. आत्तापर्यंत ११ लाख ५५ हजार ५२५ जणांची ...

सातारा

जिल्ह्यात शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रभाव गत दोन वर्षांत ‌वाढलेला आहे. आत्तापर्यंत ११ लाख ५५ हजार ५२५ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी २ लाख १ हजार ६६६ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. तर १ लाख ८८ हजार ५१ लोक बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ४ हजार ८६८ जणांचा मृत्यू झाला आहे. २३ मार्च २०२० रोजी जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाची साखळी शोधून ती खंडित करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला होता. पण, नंतरच्या काळात नेमकी बाधा कोणापासून झाली, हेच समजून येणे अवघड झाले. दुसरी लाट येणार याची शक्यता होती. पण, येईलच याची खात्री नव्हती. त्यामुळे काही प्रमाणात मोकळीक देण्यात आली. यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला. तोपर्यंत जिल्ह्यातील कोविड सेंटर बंद करण्यात आली होती. त्यामुळे लोकांवर उपचारास वेळ लागू लागल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले. यामुळे लोक अधिक भयभीत झाले. त्यातच प्रशासनाने विलगीकरण कक्षात लोकांना न ठेवता होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे घरातील इतर लोकांनाही बाधा होऊन दुसऱ्या टप्प्यात बाधित होणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक वाढले. ही संख्या आता २ लाखांच्या पार गेली आहे.

जिल्ह्यातील बाधितांची संख्या

सातारा - ४१९५०

कराड - ३०३७९

फलटण - २९००४

खटाव - २०२७५

कोरेगाव - १७५५३

माण - १३५५५

वाई - १३१९३

खंडाळा - १२१५१

पाटण - ८९४८

जावली - ८८३३

महाबळेश्वर - ४३६९

इतर - १४५०

चौकट

कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ८६८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सातारा तालुक्यातील १२४६, कराडमधील ९०६, फलटण ४७७, माण २८४, जावली १८३, खंडाळा १५४, खटाव ४७५, पाटण ३०१, वाई ३०४, कोरेगाव ३८३ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ८४ जणांचा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील ७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.