शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २ लाख पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

सातारा जिल्ह्यात शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रभाव गत दोन वर्षांत ‌वाढलेला आहे. आत्तापर्यंत ११ लाख ५५ हजार ५२५ जणांची ...

सातारा

जिल्ह्यात शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रभाव गत दोन वर्षांत ‌वाढलेला आहे. आत्तापर्यंत ११ लाख ५५ हजार ५२५ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी २ लाख १ हजार ६६६ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. तर १ लाख ८८ हजार ५१ लोक बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ४ हजार ८६८ जणांचा मृत्यू झाला आहे. २३ मार्च २०२० रोजी जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाची साखळी शोधून ती खंडित करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला होता. पण, नंतरच्या काळात नेमकी बाधा कोणापासून झाली, हेच समजून येणे अवघड झाले. दुसरी लाट येणार याची शक्यता होती. पण, येईलच याची खात्री नव्हती. त्यामुळे काही प्रमाणात मोकळीक देण्यात आली. यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला. तोपर्यंत जिल्ह्यातील कोविड सेंटर बंद करण्यात आली होती. त्यामुळे लोकांवर उपचारास वेळ लागू लागल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले. यामुळे लोक अधिक भयभीत झाले. त्यातच प्रशासनाने विलगीकरण कक्षात लोकांना न ठेवता होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे घरातील इतर लोकांनाही बाधा होऊन दुसऱ्या टप्प्यात बाधित होणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक वाढले. ही संख्या आता २ लाखांच्या पार गेली आहे.

जिल्ह्यातील बाधितांची संख्या

सातारा - ४१९५०

कराड - ३०३७९

फलटण - २९००४

खटाव - २०२७५

कोरेगाव - १७५५३

माण - १३५५५

वाई - १३१९३

खंडाळा - १२१५१

पाटण - ८९४८

जावली - ८८३३

महाबळेश्वर - ४३६९

इतर - १४५०

चौकट

कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ८६८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सातारा तालुक्यातील १२४६, कराडमधील ९०६, फलटण ४७७, माण २८४, जावली १८३, खंडाळा १५४, खटाव ४७५, पाटण ३०१, वाई ३०४, कोरेगाव ३८३ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ८४ जणांचा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील ७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.