शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २ लाख पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

सातारा जिल्ह्यात शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रभाव गत दोन वर्षांत ‌वाढलेला आहे. आत्तापर्यंत ११ लाख ५५ हजार ५२५ जणांची ...

सातारा

जिल्ह्यात शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रभाव गत दोन वर्षांत ‌वाढलेला आहे. आत्तापर्यंत ११ लाख ५५ हजार ५२५ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी २ लाख १ हजार ६६६ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. तर १ लाख ८८ हजार ५१ लोक बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ४ हजार ८६८ जणांचा मृत्यू झाला आहे. २३ मार्च २०२० रोजी जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाची साखळी शोधून ती खंडित करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला होता. पण, नंतरच्या काळात नेमकी बाधा कोणापासून झाली, हेच समजून येणे अवघड झाले. दुसरी लाट येणार याची शक्यता होती. पण, येईलच याची खात्री नव्हती. त्यामुळे काही प्रमाणात मोकळीक देण्यात आली. यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला. तोपर्यंत जिल्ह्यातील कोविड सेंटर बंद करण्यात आली होती. त्यामुळे लोकांवर उपचारास वेळ लागू लागल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले. यामुळे लोक अधिक भयभीत झाले. त्यातच प्रशासनाने विलगीकरण कक्षात लोकांना न ठेवता होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे घरातील इतर लोकांनाही बाधा होऊन दुसऱ्या टप्प्यात बाधित होणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक वाढले. ही संख्या आता २ लाखांच्या पार गेली आहे.

जिल्ह्यातील बाधितांची संख्या

सातारा - ४१९५०

कराड - ३०३७९

फलटण - २९००४

खटाव - २०२७५

कोरेगाव - १७५५३

माण - १३५५५

वाई - १३१९३

खंडाळा - १२१५१

पाटण - ८९४८

जावली - ८८३३

महाबळेश्वर - ४३६९

इतर - १४५०

चौकट

कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ८६८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सातारा तालुक्यातील १२४६, कराडमधील ९०६, फलटण ४७७, माण २८४, जावली १८३, खंडाळा १५४, खटाव ४७५, पाटण ३०१, वाई ३०४, कोरेगाव ३८३ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ८४ जणांचा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील ७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.